शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

जयाचेनी नामे महादोष जाती, जयाचेनी नामे गती पविजेती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

जयाचेनी नामे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।। ज्याच्या नामस्मरणाने मोठमोठी पातके नाश पावतात. उदाहरणार्थ- अनामेश ...

जयाचेनी नामे घडे पुण्यठेवा । प्रभाते मनी राम चिंतीत जावा ।।

ज्याच्या नामस्मरणाने मोठमोठी पातके नाश पावतात. उदाहरणार्थ- अनामेश आणि वाल्मीक ही साधके भगवंताच्या म्हणजे रामाच्या नामाने जगमान्य झाली. अशा प्रभू रामाच्या नावाने पुण्यसंचय होतो. वर्तमान स्थितीमध्येसुद्धा आपल्यासारख्या जिवांच्या हातात काहीच राहिले नाही. म्हणून निसर्गाच्या प्रकोपापुढे दुसरा उपाय नाही. सद्य:स्थितीला राम नवरात्र चालू आहे. अशा पावन पर्वावर प्रभूंच्या नामाने अंतरिक श्रद्धा जागवून घ्या. आपले धैर्य रामनामाने वाढवा.

समर्थ श्लोकात आपल्या मनाला बळ देत म्हणतात, की अशा प्रभूच्या नावाने साधकांचा पुण्यसंचय वाढतो. साधक मनाने धैर्यवान होऊन पुण्यसंचय होतो. साधक सत्त्वशील सदाचरण करतो. साधक सत्यचरणाने वागायला सुरुवात झाली की, साधकाच्या अंगी आपोआप सामर्थ्य येऊ लागते. कारण, सर्व व्रतांमध्ये सत्य वागणे, सत्य बोलणे, सत्याची साथ न सोडणे, न्यायाने वागणे हे व्रत फार मोठे आहे. मग सत्याने वागणाऱ्या साधकाच्या अंगी सामर्थ्य, धैर्य येते. त्या साधकाचे मनोबल एकदम उंचावून जाते.

रिद्धी-सिद्धी सर्व त्या साधकाजवळ येतात व अशा सत्य वागणाऱ्या साधकाने जर भगवंताचे नाव घेतले, तर त्या साधकाचे दोष जातात. त्या साधकाला पुण्यसंचय प्राप्त होतो. म्हणून समर्थ म्हणतात की, असे नाम आमच्या मुखात आहे.

म्हणून रामाचे स्मरण सकाळी करावे. सगळ्या कामांच्या अगोदर रामाचे स्मरण करावे. ‘राम राम समीर आधी, काळ घालावा तो मुरवनडी’ म्हणून रामाचे स्मरण करून आपल्याला कळी काळावर मात करता येते. म्हणून समर्थ प्रभातसमयी रामाचे चिंतन करायला सांगतात.

निरूपण : ह.भ.प. ऋषिकेश महाराज जोशी