शहरं
Join us  
Trending Stories
1
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
2
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
3
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
4
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
5
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
6
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
7
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
8
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
9
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
10
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
11
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
12
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
13
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
14
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
15
Upcoming Smartphones: वनप्लस १५, विवो एक्स ३०० आणि बरंच काही; ऑक्टोबरमध्ये लॉन्च होत आहेत 'हे' ६ फोन!
16
"गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही"; मोदींनी सांगितली आठवण
17
ST Bus Fare Update: दिवाळासाठी एसटीने केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द; पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी केली घोषणा
18
Dussehra 2025: दसऱ्याला रावण दहनानंतरची राख, घरी का आणतात माहितीय? काय आहे परंपरा?
19
DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
20
खोलीत पेटती लाईट, आत मृतदेह, अन् बाहेरून कुलूप, अशी पकडली गेली १६ वर्षांची आरोपी मुलगी   

जवानांनी केले सहकुटूंब श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 19:11 IST

एकीचे तुफान आलंया: जामद्यात पाणी फाऊंडेशनचा उपक्रम

चाळीसगाव: पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेत सहभागी झालेल्या जामदा गावात रविवारी जवानांनी सहकुटुंब श्रमदान करुन दुष्काळाविरुद्धची लढाई आम्ही जिंकणारच, असा मंत्र जागविला. यामुळे गावात रणरणत्या उन्हातही वेगळा उत्साह संचारला आहे.रविवारी जामदा गावातील २० सैनिकांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन सहकुटुंब श्रमदान केले. याबरोबरच उपक्रमात खारीचा वाटा म्हणून त्यांनी २१ हजाराची देणगीही दिली.देशाच्या सीमांवर शत्रुंशी दोन हात करणाऱ्या सैनिकांनी 'जय जवान...जय किसान' हा नाराच एकप्रकारे खरा करुन दाखविला. शेतकऱ्यांनी माणूस जगविण्याचे काम करावे. आम्ही शत्रुला इंचभरही पुढे सरकू देणार नाही, अशी भावना या स्पधेर्मुळे जागृत झाल्याची प्रतिक्रिया सैनिकांनी यावेळी व्यक्त केली. आम्ही देखील गावाला पाणीदार करण्यासाठी कंबर कसली असल्याचेही ते म्हणाले.गावचे भुमीपुत्र व उद्योजक ठाणसिंग पाटील यांनी देखील श्रमदान करून गावाला १५ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांनी गावकºयांना या कामासाठी एकत्र येऊन श्रमदान करा असे आवाहनही केले. पाणी फाउंडेशन टिमच्या वतीने सर्व सैनिकांचा आणि कुटूंबियांचा टोपी - रूमाल देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी आनंदसिंग राजपूत, अशोक अहिरे, बापू काकडे, रविंद्र सोनवणे, सुनिल पाटील, संतोष अहिरे, दीपक महाले, महेश मांडोळे, शिवाजी कोळी, रविंद्र माळी, गोपाल पाटील, अनिल पाचपुते, मुन्ना खाटिक, प्रकाश गोकुळ, अविनाश जाधव, हर्षल अहिरे, रमेश सावंत, विनोद अहिरे, रविंद्र माळी, श्रीकांत नवले आदी जवान उपस्थित होते. तालुक्याचे समन्वयक विजय कोळी, निलेश पगारे यांनी मार्गदर्शन केले.