शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

जामनेरला कोरडवाहू पिकांची वाढ खुंटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:12 IST

जामनेर : पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या ...

जामनेर : पावसाने दडी मारल्याने कोरडवाहू क्षेत्रातील पिकांची वाढ खुंटली असून, आणखी दोन दिवस पाऊस न झाल्यास दुबार पेरण्या केलेल्यांना पुन्हा पेरणी करावी लागेल, अशी शक्यता आहे. तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, त्यातील सुमारे ४० टक्के शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनीही चिंता वाढली आहे.

बागायती क्षेत्रातील पिकांना ठिबकचा आधार असल्याने ते टिकून आहे. तालुक्यात सुमारे ७५ टक्के क्षेत्र कोरडवाहू असून, पावसाच्या पाण्यावरचा त्यांची भिस्त असते. महागडे बियाणे खरेदी करून, केलेल्या पेरण्या वाया जात असल्याने शेतकरी खचला आहे. वाढलेल्या तापमानाने पिके कोमेजू लागली आहेत. कापूस, मका, ज्वारी आदी पिकांची वाढ खुंटली आहे. पेरणीसाठी सोसायटीकडून घेतलेले कर्ज, सावकाराचे कर्ज, त्यावरचे व्याज कसे फेडावे, ही चिंता लागून असल्याचे शेतकरी सांगतात.

शासनाने आता अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोफत बियाणे द्यावे, अशी मागणी होत आहे. दुष्काळसदृश्य स्थितीची पाहणी कृषी विभागाने करून पंचनामे करावेत व शासनाकडून मदत मिळवून द्यावी, अशी मागणी होत आहे.