शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
5
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
6
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
7
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
8
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
9
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
10
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
11
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
12
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
13
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
14
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
15
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
16
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
17
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
18
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
19
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
20
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...

उपसा योजना रेंगाळल्याने जामनेर तालुका तहानलेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:12 IST

जामनेर : जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्याला लाभदायक ठरलेल्या वाघूर धरणातील पाणीसाठा जामनेर तालुक्यातून वाहणाऱ्या वाघूर नदीच्या ...

जामनेर : जळगाव, जामनेर व भुसावळ तालुक्याला लाभदायक ठरलेल्या वाघूर धरणातील पाणीसाठा जामनेर तालुक्यातून वाहणाऱ्या वाघूर नदीच्या प्रवाहामुळे कायम आहे. असे असले तरी वाघूरच्या पाण्यापासून शेंदुर्णी, पहूर येथील ग्रामस्थ वंचित राहिले आहे. वाघूर वरील उपसा सिंचन योजना निधीअभावी रखडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा पर्वत रांगेतून उगम पावणारी वाघूर नदी वाकोद, पहूर, नेरी परिसरातून वाहते. तालुक्यातील गाव शिवावरून वाघूर वाहत असली तरी या नदीकाठावरील गावांना नेहमीच पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. पंधरा वर्षांपूर्वी नेरी व परिसरातील सात गावांसाठी संयुक्त पाणीपुरवठा योजना सुरु होती. योजनेतील गावांपर्यंत पाणी पोहोचविणारी जलवाहिनी कालबाह्य झाल्याने व काही गावांनी वीज बिल न भरल्याने योजना बंद पडली.

नेरीची योजना अपूर्णच

नेरीसाठी वाघूरवरून स्वतंत्र योजना आणण्यात आली. भूमिपूजन होऊन काही काम सुरु झाले, मात्र योजना अपूर्ण आहे. याचा फटका बसून भाजपला ग्रामपंचायतीची सत्ता गमवावी लागली.

वाकोद व पहूर गाव वाघूर नदीच्या काठावर असले तरी पाणी टंचाई पाचवीलाच पूजलेली आहे. मध्यंतरी आमदार गिरीश महाजन यांनी शेंदुर्णी व पहूरसाठी वाघूरवरून थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवठा करणारी योजना मंजूर करवून घेतली होती. राज्यातील सत्तांतरानंतर योजनेचे काम थंड बस्त्यात पडले आहे. शेंदुर्णी पाणी पुरवठा योजनेला शासनाने तत्वतः मान्यता दिलेली आहे. शासन बदलल्यानंतर निधीअभावी काम रखडले. आमदार गिरीश महाजन यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटून योजनेला निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या योजनेमुळे शेंदुर्णीचा पाणी प्रश्न सुटेल, असे येथील भाजप नेते गोविंद अग्रवाल यांनी सांगितले.

शेंदुर्णी व पहूर येथील पाणी पुरवठा योजनेचे काम पाटबंधारे विभागाचे नसून केवळ पाणी आरक्षण करणे आहे. योजनेच्या कामाशी पाटबंधारे विभागाचा संबंध नाही.

- सी.के.पाटील, अभियंता, पाटबंधारे विभाग

--------

उपसा सिंचन योजना रखडली

वाघूर धरणातील पाणी जलवाहिनीद्वारे थेट शेतकऱ्यांच्या शेतात पोहचविणारी उपसा सिंचन योजना असून ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. सुमारे १२० कोटीच्या निधी अभावी काम थांबले आहे. योजनेचा लाभ सुमारे ३० गावातील शेतकऱ्यांना होईल. २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने योजनेच्या पूर्ततेसाठी शासनाने निधी देणे गरजेचे आहे.

फोटो कॅप्शन

जामनेर उपसा सिंचन योजनेतंर्गत झालेले विद्युतीकरणाचे काम व उपलब्ध यंत्र सामुग्री फोटो नंबर - २३/८/९