शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

जामनेरला यंदा कापूस लागवड घटली, मका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 19:35 IST

कृषी विभागाचा पेरणी अहवाल : बोंडअळीने शेतकरी चिंतेत

जामनेर, जि.जळगाव : गेल्या वर्षी कापसाला मिळालेला कमी हमीभाव व बोंडअळीमुळे झालेले नुकसान यामुळे यंदा खरीप हंगामात तालुक्यात कापूस लागवड क्षेत्र तीन हजार हेक्टरने घटले आहे. याउलट मक्याची लागवड वाढली असल्याचे कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालावरून स्पष्ट होते. १२ जुलैपर्यंत ९८.४८ टक्के पेरण्या झाल्याचे अहवालात नमूद केले आहे.महिन्यापासून होत असलेल्या पावसाने नदी, नाल्यांना पूर आलेले नसले तरी पिकांची स्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले जात आहे.तालुक्याचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १ लाख १ हजार ६६० हेक्टर आहे. १२ जुलैपर्यंत १ लाख ११२ हेक्टरवर लागवड झाली. ज्वारी, बाजरी, मूग, उडीद, तीळ व केळीच्या लागवडीत घट दिसून येत आहे. काही वर्षांपूर्वी केळी लागवड मोठ्या प्रमाणात होत असे. पुरेशा पाण्याअभावी केळीच्या लागवड क्षेत्रात घट होत असल्याचे दिसून येते. या हंगामात फक्त ९२३ हेक्टरमध्ये केळी लागवड झाल्याचे दिसत आहे. वाघूरच्या बँकवॉटर क्षेत्रात केळी लावली जात आहे.गळीत धान्यात वाढगळीत धान्याच्या लागवडीत यंदा चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. भुईमुगाचे सर्वसाधारण लागवड क्षेत्र १२४ हेक्टर असून, यंदा ४४२ हेक्टरमध्ये लागवड झाली आहे. सोयाबीनचे लागवड क्षेत्र १३४८ असून, यंदा २७७६ हेक्टर लागवड झाली. कडधान्यात तूर लागवड वाढली आहे.गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने उन्हाळ्यात शेतातील विहिरींचे पाणी आटल्याने यंदा बागायती कापसाचे लागवड क्षेत्र घटले.दरम्यान, १३ जुलैपर्यंत तालुक्यात १५५.३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, पावसाची सरासरी टक्केवारी २१.५ इतकी आहे. गेल्यावर्षी ही टक्केवारी १५.८ होती.जामनेरला होत असलेल्या पावसाने नद्यांना पूर आलेले नसले तरी पिकांची स्थिती समाधानकारक आहे.