शहरं
Join us  
Trending Stories
1
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
2
"मला नितीश कुमार मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते...", बिहारच्या सीएम पदावर चिराग पासवान यांनी स्पष्टच सांगितले
3
बिहारमध्ये सर्वाधिक जागा जिंकूनही भाजपाची वाढली डोकेदुखी; मंत्रिपदाचा फॉर्म्युला बदलावा लागणार?
4
“तुम्ही चांगल्या योजना आणल्या नाहीत, जो जीता वहीं सिकंदर”; CM फडणवीसांचे शरद पवारांना उत्तर
5
इंदुरीकर महाराजांच्या लेकीच्या साखरपुड्यात किती लोक आले होते? जावयानेच सांगितला खरा आकडा
6
Gold prices today: ३३५१ रुपयांनी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीतही मोठी घसरण; खरेदीदारांनी टाकला सुटकेचा नि:श्वास
7
Elections 2026: आता दक्षिणेत स्वारी! भाजपसाठी 'या' तीन राज्यात सत्तेचं स्वप्न पूर्ण होणार का?
8
IPL 2026 Trades Players Full List : जड्डू-संजूशिवाय 'या' ६ खेळाडूंसाठी झाली कोट्यावधींची डील
9
Union Bank मध्ये जमा करा ₹२,००,०००; मिळेल ₹८५,०४९ चं गॅरंटीड फिक्स व्याज, कोणती आहे स्कीम?
10
Shubman Gill Injury Update : शुभमन गिलनं मैदान सोडलं! पंत झाला कॅप्टन, नेमकं काय घडलं?
11
अमेरिकेत महागाईनं हाहाकार! ट्रम्प यांनी अनेक वस्तूंवरील टॅरिफ केलं कमी, स्वस्त होणार 'या' गोष्टी
12
बिहार निवडणुकीत विरोधात काम, माजी केंद्रीय मंत्री पक्षातून निलंबित; भाजपाची मोठी कारवाई
13
लाल किल्ल्याजवळील स्फोटाने जमीन हादरली; मेट्रो स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज आले समोर
14
बिहारमध्ये सर्वाधिक १ कोटी १५ लाख मते मिळवणारा RJD ठरला नंबर वन पक्ष; भाजपा-जेडीयूला किती मते?
15
कुणी २७, कुणी ९५ मतांनी, तर..., बिहारमधील या मतदारसंघांत माफक फरकाने झाला जय-पराजयाचा फैसला
16
'मारुती सुझुकी'च्या या कारमध्ये मोठा बिघाड, ३९ हजारांहून अधिक गाड्या परत मागवल्या
17
धक्कादायक...! मध्यरात्रीचा थरार...! पूर्वजांना मोक्ष मिळावा म्हणून आईनं पोटच्या २ चिमुकल्यांची केली हत्या, सासरे थोडक्यात बचावले
18
मुदतीपूर्वीच Gen Z कर्मचाऱ्यांना कंपनीतून का काढलं जातंय?; स्टडी रिपोर्टमधून समोर आलं कारण
19
धर्मेंद्र यांच्या ९० व्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन होणार! हेमा मालिनी म्हणाल्या- "आता प्रत्येक दिवस..."
20
New Fastag Rule: आजपासून फास्टॅगच्या नियमांत झाला मोठा बदल; याकडे लक्ष दिलं नाही तर भरावा लागेल दुप्पट टोल
Daily Top 2Weekly Top 5

गिरणेवरील जामदा बंधारा ओसंडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 22:11 IST

कजगावसाठी सावदे केटीवेअर मध्ये सोडले पाणी : पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावाचेही पुनर्रभरण

खेडगाव, ता. भडगाव : गिरणेवरील जामदा बंधारा गुरुवारी ओसंडला. यामुळे कजगावला पाणीपुरवठा करणारा सावदे केटीवेअर आता या पाण्याद्वारे भरण्यात येणार आहे. यानंतर जामदा डावा कालव्याच्या माध्यमातून पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे.बंधाऱ्याच्या वरील भागात चांगला पाऊस झाल्याने बंधारा भरला असल्याची माहिती अशी माहीती कार्यकारी अंभियंता धर्मेंद्रकुमार बेहरे, हेमंत पाटील व एस.आर पाटील यांनी दिली.गिरणा धरणात ८२.४५ टक्के जलसाठा झाला असला तरी सध्या कोणताही विसर्ग धरणातुन केला जाणार नसल्याचेही त्यांनी सांगीतलेचाळीसगाव तालुक्यातील मेहुणबारे भागात चांगला पाऊस झाल्याने नदी - नाले प्रवाहीत झाले आहेत. या भागातील खडकीसिम येथील पाझरतलावही भरुन वाहु लागला आहे.हे पाणी गिरणेवरील जामदा बंधºयात येत आहे. गुरुवारी जामदा बंधारा ओसंडत पाणी सावदे केटीवेअर कडे निघाले. ते शुक्रवारी दुपारी तीन वाजता सावदे केटीवेअरला येवुन मिळाले. या केटीवेअर मधुन कजगावला पाणीपुरवठा होतो. यामुळे कजगावसाठी गिरणा धरणातुन पाणी सोडण्याची हालचाली आता थडांवल्यात.जामदा बंधाºयातुन होत असलेला ओव्हरफ्लो खाली पांढरदपर्यंत येवु देण्याची २२ खेड्यांची मागणी आहे. यामुळे येथील गावांची तहान आता ती या पाण्यातुन भागविण्याची आवश्यकता आहे. गिरणा नदी पावसाच्या पाण्यामुळे ठिकठिकाणी प्रवाहीत झाली आहे. आता फक्त सावदे केटीवेअर ते पांढरद हे १५-२० किमी नदीपात्र पावसाळ्यात देखील कोरडे आहे. त्याचे पुनर्रभरण या पाण्यातुन आवश्यक आहे.‘अंजनी’ला लाभ नाहीम्हसावा व भोकरबारी तलावातील पुनार्भारणासाठी जमादा डावा कालव्याद्वारे सोडलेले पाणी चार दिवसात म्हसावा तलावा पर्यंत पोहचेल. दरम्यान अंजनी धरणाचा पुनार्भारणा मध्ये समावेश नाही.त्यामुळे पुनर्भरण लाभा पासुन अंजनी धरण वंचित राहणार आहे.कालव्यात सोडले १०० क्यूसेस पाणीसावदे केटीवेअर भरल्यानंतर जामदा डावा कालव्यातुन पारोळा तालुक्यातील म्हसवे तलावात पाणी सोडले जाणार आहे. यामुळे चाळीसगाव, भडगाव, पारोळा व एरंडोल तालुक्यातील कालवा मार्गात आपोआप रिचार्जचा लाभ होणार आहे.मात्र पावसाळ्याचे पाणी जामदा बंधाºयात किती दिवस चालु राहते याच्यावर पुढील पुनर्भरण अवलंबून आहे. शुक्रवारी सकाळी कालव्याची वितरण चाचणी घेण्यासाठी १०० क्युसेस पाणी त्यात सोडण्यात आले आहे. यानंतर जामदा बंधाºयात वरुन येणारा पाण्याचा फ्लो सुरुच राहील्यास कालवा ३५० क्युसेसने चालविला जाणार असल्याची माहीती भडगाव-कोळगाव शाखा अभियंता पी.टी.पाटील यांनी लोकमत ला दिली.