शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

जळगावची पॉझिटिव्हिटी ४० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

जळगाव : जळगाव शहरात महापालिकेच्या केंद्रांवर होणाऱ्या तपासण्यांची संख्या तिपटीने वाढली असताना दुसरीकडे यात बाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र ...

जळगाव : जळगाव शहरात महापालिकेच्या केंद्रांवर होणाऱ्या तपासण्यांची संख्या तिपटीने वाढली असताना दुसरीकडे यात बाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र घटली आहे. गेल्या आठवडाभरापासून हे दिलासादायक चित्र असून, ही पॉझिटिव्हिटी ४० टक्क्यांवरून थेट दहा टक्क्यांवर आली आहे. शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख आता घसरत असल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.

जिल्हाभरात मध्यंतरी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून येत होते. यात ही रुग्णसंख्या एका दिवसाला थेट ४०० पर्यंत नोंदविली गेली होती. मात्र, हळूहळू संसर्गाचे प्रमाण घटत असून, आता हीच संख्या अडीचशेपेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत असल्याचे समोर येत आहे. यात हॉटस्पॉट टेस्टिंग, रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या चाचण्या, वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.

...अशी आहे पॉझिटिव्हिटी

सोमवार : चाचण्या ९३७, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १०.३९ टक्के

मंगळवार : चाचण्या ९५०, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १० टक्के

बुधवार : चाचण्या १,५०९, बाधित १२८, पॉझिटिव्हिटी ८.१८ टक्के

गुरुवार : चाचण्या १,६९८, बाधित ११०, पॉझिटिव्हिटी ६.४७ टक्के

शुक्रवार : चाचण्या १,१००, बाधित ८८, पॉझिटिव्हिटी ८ टक्के

शनिवार : चाचण्या ७९९, बाधित ८४, पॉझिटिव्हिटी १०.५१ टक्के

काही दिवसांपूर्वी

पॉझिटिव्हिटी : ३५ ते ५० टक्के (शंभर अहवालांमध्ये ४० पर्यंत रुग्ण आढळून येत होते.)

आता पॉझिटिव्हिटी ६ ते १० टक्के, शंभर अहवालांमध्ये ६ ते १० रुग्ण आढळून येत आहेत.

कारणे

१) शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत आहे.

२) चाचण्यांची संख्या वाढवून बाधितांना विलग केले जात आहे.

३) लॉकडाऊनचा परिणाम समोर येत आहे.

मात्र, हे लक्षात असू द्या...

कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, रुग्णसंख्या कमी होत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण त्या तुलनेत घटले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याला कारणे म्हणजे वेळेवर तपासणी न करणे. यासाठी लक्षणे जाणवल्यास पहिल्याच दिवशी तपासणी करा. बाधित आढळले तर शासकीय नियमानुसार उपचार घ्या, निगेटिव्ह आल्यास नियमित उपचार घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले आहे. अन्य व्याधी असलेले रुग्ण लवकर तपासणी करीत नाहीत व त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लवकर तपासणी करून घेतल्यास रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कितीतरी पटींनी कमी होईल, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.