शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

जळगावची पॉझिटिव्हिटी ४० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

जळगाव : जळगाव शहरात महापालिकेच्या केंद्रांवर होणाऱ्या तपासण्यांची संख्या तिपटीने वाढली असताना दुसरीकडे यात बाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र ...

जळगाव : जळगाव शहरात महापालिकेच्या केंद्रांवर होणाऱ्या तपासण्यांची संख्या तिपटीने वाढली असताना दुसरीकडे यात बाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र घटली आहे. गेल्या आठवडाभरापासून हे दिलासादायक चित्र असून, ही पॉझिटिव्हिटी ४० टक्क्यांवरून थेट दहा टक्क्यांवर आली आहे. शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख आता घसरत असल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.

जिल्हाभरात मध्यंतरी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून येत होते. यात ही रुग्णसंख्या एका दिवसाला थेट ४०० पर्यंत नोंदविली गेली होती. मात्र, हळूहळू संसर्गाचे प्रमाण घटत असून, आता हीच संख्या अडीचशेपेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत असल्याचे समोर येत आहे. यात हॉटस्पॉट टेस्टिंग, रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या चाचण्या, वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.

...अशी आहे पॉझिटिव्हिटी

सोमवार : चाचण्या ९३७, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १०.३९ टक्के

मंगळवार : चाचण्या ९५०, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १० टक्के

बुधवार : चाचण्या १,५०९, बाधित १२८, पॉझिटिव्हिटी ८.१८ टक्के

गुरुवार : चाचण्या १,६९८, बाधित ११०, पॉझिटिव्हिटी ६.४७ टक्के

शुक्रवार : चाचण्या १,१००, बाधित ८८, पॉझिटिव्हिटी ८ टक्के

शनिवार : चाचण्या ७९९, बाधित ८४, पॉझिटिव्हिटी १०.५१ टक्के

काही दिवसांपूर्वी

पॉझिटिव्हिटी : ३५ ते ५० टक्के (शंभर अहवालांमध्ये ४० पर्यंत रुग्ण आढळून येत होते.)

आता पॉझिटिव्हिटी ६ ते १० टक्के, शंभर अहवालांमध्ये ६ ते १० रुग्ण आढळून येत आहेत.

कारणे

१) शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत आहे.

२) चाचण्यांची संख्या वाढवून बाधितांना विलग केले जात आहे.

३) लॉकडाऊनचा परिणाम समोर येत आहे.

मात्र, हे लक्षात असू द्या...

कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, रुग्णसंख्या कमी होत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण त्या तुलनेत घटले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याला कारणे म्हणजे वेळेवर तपासणी न करणे. यासाठी लक्षणे जाणवल्यास पहिल्याच दिवशी तपासणी करा. बाधित आढळले तर शासकीय नियमानुसार उपचार घ्या, निगेटिव्ह आल्यास नियमित उपचार घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले आहे. अन्य व्याधी असलेले रुग्ण लवकर तपासणी करीत नाहीत व त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लवकर तपासणी करून घेतल्यास रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कितीतरी पटींनी कमी होईल, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.