शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जळगावची पॉझिटिव्हिटी ४० टक्क्यांवरून १० टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:14 IST

जळगाव : जळगाव शहरात महापालिकेच्या केंद्रांवर होणाऱ्या तपासण्यांची संख्या तिपटीने वाढली असताना दुसरीकडे यात बाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र ...

जळगाव : जळगाव शहरात महापालिकेच्या केंद्रांवर होणाऱ्या तपासण्यांची संख्या तिपटीने वाढली असताना दुसरीकडे यात बाधित येणाऱ्या रुग्णांची संख्या मात्र घटली आहे. गेल्या आठवडाभरापासून हे दिलासादायक चित्र असून, ही पॉझिटिव्हिटी ४० टक्क्यांवरून थेट दहा टक्क्यांवर आली आहे. शहरात कोरोना रुग्णवाढीचा आलेख आता घसरत असल्याचे या आकडेवारीवरून समोर येत आहे.

जिल्हाभरात मध्यंतरी सर्वाधिक रुग्ण हे जळगाव शहरात आढळून येत होते. यात ही रुग्णसंख्या एका दिवसाला थेट ४०० पर्यंत नोंदविली गेली होती. मात्र, हळूहळू संसर्गाचे प्रमाण घटत असून, आता हीच संख्या अडीचशेपेक्षा कमी नोंदविण्यात येत आहे. शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत असल्याचे समोर येत आहे. यात हॉटस्पॉट टेस्टिंग, रस्त्यांवर फिरणाऱ्यांच्या चाचण्या, वेगवेगळ्या कॅम्पच्या माध्यमातून तपासण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे.

...अशी आहे पॉझिटिव्हिटी

सोमवार : चाचण्या ९३७, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १०.३९ टक्के

मंगळवार : चाचण्या ९५०, बाधित ९५, पॉझिटिव्हिटी १० टक्के

बुधवार : चाचण्या १,५०९, बाधित १२८, पॉझिटिव्हिटी ८.१८ टक्के

गुरुवार : चाचण्या १,६९८, बाधित ११०, पॉझिटिव्हिटी ६.४७ टक्के

शुक्रवार : चाचण्या १,१००, बाधित ८८, पॉझिटिव्हिटी ८ टक्के

शनिवार : चाचण्या ७९९, बाधित ८४, पॉझिटिव्हिटी १०.५१ टक्के

काही दिवसांपूर्वी

पॉझिटिव्हिटी : ३५ ते ५० टक्के (शंभर अहवालांमध्ये ४० पर्यंत रुग्ण आढळून येत होते.)

आता पॉझिटिव्हिटी ६ ते १० टक्के, शंभर अहवालांमध्ये ६ ते १० रुग्ण आढळून येत आहेत.

कारणे

१) शहरातील संसर्गाचे प्रमाण घटत आहे.

२) चाचण्यांची संख्या वाढवून बाधितांना विलग केले जात आहे.

३) लॉकडाऊनचा परिणाम समोर येत आहे.

मात्र, हे लक्षात असू द्या...

कोरोनाचा संसर्ग कमी होत असला, रुग्णसंख्या कमी होत असली तरी रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण त्या तुलनेत घटले नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याला कारणे म्हणजे वेळेवर तपासणी न करणे. यासाठी लक्षणे जाणवल्यास पहिल्याच दिवशी तपासणी करा. बाधित आढळले तर शासकीय नियमानुसार उपचार घ्या, निगेटिव्ह आल्यास नियमित उपचार घ्या, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पाटील यांनी केले आहे. अन्य व्याधी असलेले रुग्ण लवकर तपासणी करीत नाहीत व त्यांचे गंभीर होण्याचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे लवकर तपासणी करून घेतल्यास रुग्ण गंभीर होण्याचे प्रमाण कितीतरी पटींनी कमी होईल, असेही डॉ. पाटील यांनी म्हटले आहे.