शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
4
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
5
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
6
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
9
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
10
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
11
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
12
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
13
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
14
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
15
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
16
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
17
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
18
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
19
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!
20
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो

जळगावच्या अर्चित पाटीलला ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:55 IST

जळगाव : रक्तस्त्रावाची तंतोतंत मोजणी, लवकर निदान आणि उपचार शक्य होण्यासाठी उपयोगी ठरलेल्या पीपीएच कपची निर्मिती करणाऱ्या जळगावातील अर्चित ...

जळगाव : रक्तस्त्रावाची तंतोतंत मोजणी, लवकर निदान आणि उपचार शक्य होण्यासाठी उपयोगी ठरलेल्या पीपीएच कपची निर्मिती करणाऱ्या जळगावातील अर्चित राहुल पाटील या इयत्ता नववीच्या विद्यार्थ्याची पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी निवड झाली. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला झालेल्या ऑनलाइन सोहळ्यात जळगावात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते अर्चितला हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

काय पीपीएच कप?

जगभरात प्रत्येक दर चार मिनिटाला एका मातेचा प्रसूतीनंतर अतिरक्तस्त्रावामुळे मृत्यू होतो. पीपीएच कपमुळे रक्तस्त्रावाची तंतोतंत मोजणी, लवकर निदान आणि उपचार शक्य होते. या यंत्रामुळे किती रक्तस्त्राव झाला हे सारखे-सारखे बघावे लागत नाही, ओलावा नसतो, निर्जंतुक करून १० ते १५ वर्षे हे यंत्र वापरू शकतो, सॅनिटरी पॅडचा वापरही टळतो आणि पर्यायाने पर्यावरणपूरकही हे सयंत्र आहे. भविष्यात हे सयंत्र महिला आरोग्यासाठी वरदान ठरणारे आहे. या सयंत्राचा पेटंट मिळण्यासाठीही नोंद झाली आहे. या संशोधनाची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली.

जळगावसाठी गौरवास्पद सन्मान

अर्चितच्या या संशोधनाबद्दल यापूर्वीही त्याची वेगवेगळ्या पातळीवर दखल घेतली गेली आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार आणि राष्ट्रीय नवीनता संस्था, राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद, महाराष्ट्र यांच्या वतीने गेल्या वर्षी अमरावती येथे आयोजित नवव्या राज्यस्तरीय इंस्पायर अवॉर्ड प्रदर्शन पीपीएच कप पोहोचला होता. या सयंत्रची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्थरावरील प्रदर्शनासाठीही निवड झाली होती. त्यानंतर, आता थेट हे सयंत्र तयार करणाऱ्या अर्चितची ‘पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कारा’साठी निवड झाली. देशातील एकूण ३१ मुलांना हा पुरस्कार घोषित झाला. पुरस्कार वितरणाच्या वेळी अर्चितचे वडील डॉ.राहुल पाटील, आई डॉ.अर्चना पाटील हेही उपस्थित होते.

आई-वडिलांसोबत रुग्णालयात थांबल्याने आली संकल्पना

अर्चित हा जळगावातील काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी आहे. आई-वडील डॉक्टर असल्याने, तो त्यांच्यासोबत रुग्णालयात आल्यानंतर, तेथील मातामृत्यूचे प्रमाण पाहून याविषयी त्याने आई-वडिलांना विचारले. त्यावेळी त्यांनी प्रसूतिपश्चात अतिरक्तस्त्रावामुळे महिलांचा मृत्यू होतो व तो प्रयत्न करूनही रोखता येत नसल्याचे सांगितले. त्याच वेळी अर्चितने यावर संशोधन करण्याचे ठरविले व तो आठवीत असतानाच त्याने हा पीपीएच कप तयार केला.

राष्ट्रसेवेसाठी संशोधन करण्याचा ध्यास

अर्चितला जगातील सर्वोष्कृष्ठ संशोधन संस्थेत संशोधन करायचे असून, याद्वारे देश आणि मानव सेवा घडू शकेल, तसेच सकात्मक बदल घडविण्याचाही त्याचा मानस असून यातून आपल्या देशाला, आई-वडिलांना गर्व वाटावा असे काम करायचे असल्याचे त्याने सांगितले.