शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

भरदुपारी हरविली जळगावकरांची ‘सावली’

By admin | Updated: May 26, 2017 18:05 IST

वर्षातून दोन वेळा घडणारी भौगोलिक घटना : उन्हाची पर्वा न करता खगोलप्रेमींनी अनुभवला दिवस

 ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.26 -‘सावली कधीही आपली साथ सोडत नसते’ अशी म्हण आपल्याकडे कायम आहे. मात्र उन्हाच्या असह्य झळांनी त्रस्त असलेल्या जळगावकरांना शुक्रवारी दुपारी 12.25 वाजता ‘शून्य सावली’ चा अनुभव घेतला. शुक्रवारी आपली स्वत:ची सावली आपल्या पासून अदृश्य झाल्याचा अनुभव जळगावकरांनी घेतला. वर्षातून दोन वेळा घडणा:या या खगोलीय घटनेनिमित्त शुक्रवारी दुपारी 12 वाजून 25 मिनीटांनी सूर्य डोक्यावर आल्याने स्वत:ची सावली हरविल्याचा अनुभव जळगावकरांनी दुपारी 5 ते 6 सेकंदासाठी झाला. 
शुक्रवारी दुपारीच्या सावलीच्या घडय़ाळानुसार दुपारी 12 वाजता आणि मनगटावरील घडय़ानुसार 12.25 वाजता जळगावचा शुन्य सावली दिवस अनुभवास आला.  26 मे रोजी ख:या अर्थाने सूर्य आपल्या डोक्यावर येतो. या दिवश्ी सूर्यकिरण लंबरूप  पडत असल्याने कोणत्याही वस्तूची इकडे-तिकडे न पडता पायापाशी पडते आणि शून्य  सावली ही अनुभवयास मिळते. 
अनेकांनी केले होते नियोजन
शून्य सावलीच्या घटना या वर्षातून दोन वेळा होत असतात. मात्र 18 जूलै रोजी होणा:या या घटनेच्या दिवशी पावसाळा असल्याने ब:याच वेळा आभाळ असते यामुळे या घटनेचा अनुभव घेता येत नसतो. मात्र शुक्रवारी या खगोलीय घटनेच्या अनुभव घेण्यासाठी खगोलप्रेमींमध्ये उत्सुकता दिसून आली. उन्हाचा तडाखा जाणवत असताना शहरातील अनेक खगोलप्रेमींनी दुपारी आपल्या छतावर जावून या ‘शून्य सावली’चा अनुभव घेतला. शहरातील खगोल अभ्यासक अमोघ जोशी, सतीश पाटील यांनी  खास खगोलप्रेमींसाठी या दिवसासाठी खास व्यवस्था केली होती. 
सावली गायब होण्याचे कारण
पृथ्वीचा अक्ष तिच्या सूर्याभोवती परिक्रमा करण्याच्या कक्षेस लंब नसून साडेतेवीस अंशानी कललेला आहे. त्यामुळे पृथ्वीवर ऋतू बदलतात. आणि सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते. दररोज सूर्योदय व सूर्यास्ताची क्षितिजावरची जागा बदलत असते. सुमारे 23 डिसेंबर ते 21 जून सूर्याचे उत्तरायण असते तर त्यानंतर दक्षिणायन. या दरम्यान दोन असे दिवस येतात की मध्यानाच्या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर येतो. त्या वेळी प्रत्येक सरळ उभ्या वस्तूची सावली बरोबर त्याच्या पायाखाली असते आणि काही वेळासाठी ती नाहीशी होते, जळगावचा रेखांश हा 21 अक्षावर आहे. याच अक्षावर शुक्रवारी सूर्योदय झाल्याने जळगावात शून्य दिवस निर्माण झाला. हा दिवस 26 मे व 18 जुलै रोजी अनुभवता येत असतो.