शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

अवघ्या १५ मिनिटांच्या पावसात जळगावही तुंबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:13 IST

मनपाचा नालेसफाईचा दावा ठरला फोल; ठिकठिकाणी साचले डबके; उपनाले ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : पावसाळ्याचा ...

मनपाचा नालेसफाईचा दावा ठरला फोल; ठिकठिकाणी साचले डबके; उपनाले ओव्हरफ्लो झाल्याने पाणी रस्त्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : पावसाळ्याचा तोंडावर दरवर्षी मनपा प्रशासनाकडून नालेसफाईचा दावा केला जात असतो. मात्र, पावसाळ्यात या नालेसफाईचे दावे नेहमी फोल ठरत असतात. यावर्षी तर मनपाने पावसाळा सुरू झाल्यावरदेखील नालेसफाईचे काम पूर्ण केलेले नाही. विशेष म्हणजे उपनाल्यांचा सफाईचे काम पूर्ण झाल्याचा दावा मनपाकडून केला जात असला तरी मात्र गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास झालेल्या १५ मिनिटांच्या पावसात मनपाचे दावे पूर्णपणे फोल ठरले असून, शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी डबके साचले होते. तर अनेक ठिकाणी उपनाले व गटारी ओव्हरफ्लो होऊन वाहत होत्या.

मनपाकडून नालेसफाईवर दरवर्षी २० लाखांचा खर्च केला जात असतो. यावर्षी कोरोनाचे कारण देत नालेसफाईला उशीर झाला. मात्र, जून महिना संपत आला असताना, ही सफाई पूर्ण झालेली नाही. त्यामुळे केवळ १५ मिनिटांच्या पावसात जळगाव शहरातील मुख्य रस्त्यांवर नाले, गटारीचे पाणी येऊ शकते तर शहरात जोरदार पाऊस झाल्यास नाल्याचे पाणीही घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रश्नाकडे मनपा प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. गुरुवारी अनेक भागात गटारीचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना मोठी कसरत करावी लागली.

नवसाचा गणपती मंदिर परिसर

शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटकडून नवसाचा गणपती मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्याची सफाई पूर्ण झालेली नसल्याने थोडाही पाऊस झाला तरी हा नाला ओव्हरफ्लो होतो. गुरुवारीदेखील पावसामुळे नाला ओव्हरफ्लो झाल्यामुळे रस्त्यावर नाल्याचे पाणी वाहू लागले. त्यात रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनधारकांना पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज घेणेदेखील कठीण होऊन गेले होते. त्यातच अवजड वाहतुकीमुळे या ठिकाणी रस्ता पूर्णपणे ब्लॉक होऊन गेला होता.

ख्वॉजामिया रस्त्यावर तर नेहमीच पाणी

ख्वाॅजामिया चौक ते ख्यॉजामिया दर्ग्यापर्यंतच्या रस्त्यालगतदेखील मोठ्या प्रमाणात नाल्याचे व गटारीचे पाणी रस्त्यावर येत असते. गुरुवारी थेट छत्रपती शाहू महाराज संकुलापासून ते पेट्रोलपंपालगतच्या रस्त्यापर्यंत गटारीचे पाणी वाहत होते. तसेच सर्व पाणी गटारीचे असल्याने मोठ्या प्रमाणात घाणदेखील रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधीदेखील पसरली होती.

२० लाख पाण्यात

मनपा प्रशासनाकडून नालेसफाईवर २० लाख रुपये खर्च केला जातो. मात्र, मक्तेदाराकडून नाल्यातून काढण्यात आलेला गाळ हा नाल्याकाठीच फेकला जातो. काही दिवसात पाऊस झाल्यानंतर हाच गाळ नाल्यांमध्ये जातो व पुन्हा नाले ओव्हरफ्लो होतात. अशाच प्रकारे सफाईचे काम राहिल्यास पावसाळ्यात नाल्याचे पाणी रस्त्यावर येते. जोरदार पाऊस झाल्यास मोठ्या नाल्यांना पूर येतो व नाल्याकाठच्या घरांमध्ये पाणी शिरत असते. हीच पद्धत नालेसफाईत सुरू असून, मनपाचे दरवर्षी २० लाख रुपये केवळ पाण्यातच जात आहेत.