शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

वाळूमाफियांच्या टोळक्यातून शोधले ‘अलीबाबा चालीस चोर’; ४० जणांना बजावल्या नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2023 15:31 IST

एक वर्ष मुदतीचे प्रतिज्ञापत्र भरुन घेणार

कुंदन पाटील

जळगाव : वाळूतस्करी उघड केल्यानंतर कायदेशीर कारवाई करुनही अनेक जण पुन्हा या धंद्यात पाय पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे जळगाव तहसीलदारांनी वाळू चोरीची सवय जडलेल्या ४० जणांना फौजदारी स्वरुपाची नोटीस बजावली आहे. त्यानुसार या ४० जणांना १० हजारांच्या शपथपत्रावर यापुढे अवैध वाळू उचल करणार नसल्याचे लिहून द्यावे लागणार आहे.

जळगाव तहसीलदार नामदेव पाटील यांनी गतकाळात वाळूतस्करीत सातत्याने सहभागी असणाऱ्या आरोपींची ‘कुंडली’ काढली. कारवाई करुनही सातत्याने वाळू चोरी करणाऱ्या ४० जणांचा त्यात सहभाग दिसून आला. या ४० जणांच्या मुसक्या आवळण्यासाठी तहसीलदारांनी फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार नोटीस बजावली आहे.

शपथपत्र लिहून घेणारया ४० जणांकडून १० हजारांच्या शपथपत्रावर वर्षभरासाच्या मुदतीसाठी शपथपत्र भरुन घेण्यात येणार आहे. फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार १९७३ चे कलम १०७ नुसार तहसीलदार ४० जणांविरोधात प्रक्रिया पार पाडणार आहेत. त्यानुसार त्यांना मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत ४० जणांना शपथपत्र सादर करावे लागणार आहे.

वाळूचा सातत्याने अवैध उपसा करुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करु पाहणाऱ्या ४० जणांविरोधात फौजदारी संहितेनुसार कारवाई करण्यात येत आहे. शपथपत्र दिल्यानंतरही या गैरप्रकारात त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांच्यावर गंभीर स्वरुपाची कारवाई करण्यात येणार आहे. -नामदेव पाटील, तहसीलदार