शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
3
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
4
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
5
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
6
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
7
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
8
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
9
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
10
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
11
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
12
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
13
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
14
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
15
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
16
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
17
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
18
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
19
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
20
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...

बेस्टच्या सेवेतून जळगाव एस.टी. कर्मचाऱ्यांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश : मुंबईला जात असल्याने अनेकांना झाली होती कोरोनाची बाधा कर्मचाऱ्यांना दिलासा : कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला ...

कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश : मुंबईला जात असल्याने अनेकांना झाली होती कोरोनाची बाधा

कर्मचाऱ्यांना दिलासा : कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला आले यश

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी जाणाऱ्या चालक-वाहकांना यापुढे मुंबईला न पाठविण्याबाबत महामंडळाने जळगाव विभागाला पत्र पाठविले आहे. मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. अखेर महामंडळ प्रशासनाने यापुढे जळगावच्या कर्मचाऱ्यांना न बोलाविण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

कोरोनामुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांसाठी बेस्टतर्फे जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या जादा बससाठी एस.टी. महामंडळाच्या चालक व वाहकांची मदत घेण्यात आली होती. त्याकरिता महामंडळाच्या राज्यातील काही विभागांमधून दर आठवड्याला चालक व वाहकांना बोलाविण्यात येत होते. त्यानुसार जळगाव विभागातून दर आठवड्याला ५० चालक व ५० वाहक मुंबईला जात होते. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना या सेवेसाठी पाठविण्यात येत होते.

इन्फो :

अनेक कर्मचाऱ्यांचा सुरुवातीपासून होता विरोध

मुंबई येथे कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने जळगाव विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी बेस्टच्या सेवेला जाण्याकरिता विरोध दर्शविला होता, तसेच या प्रकाराबाबत सुरुवातीपासूनच इंटक संघटना व सेना कामगार संघटना कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

इन्फो :

...अखेर जळगावच्या कर्मचाऱ्यांना दिलासा

जळगावहून मुंबईला इतक्या लांब अंतरावर बेस्टच्या सेवेसाठी जात असल्याने तेथून आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या परिवारालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकाराला सर्व स्तरातून विरोध दर्शविला जात होता. महामंडळाने हा निर्णय मागे घेण्याबाबत विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

बेस्टसाठी जळगाव विभागातून चालक-वाहकांना नियमित पाठविण्यात येत होते. मात्र, आता यापुढे त्यांना पुढील आदेश येईपर्यंत पाठविण्यात येऊ नये, असे लेखी आदेश जळगाव विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात येणार नाही. या बाबतीत इंटक संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना.

जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना मुंबईला न पाठविण्याबाबत एस.टी. कामगार सेनेतर्फे परिवहनमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर महामंडळाने हा निर्णय मागे घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मुंबईला जाण्याचा त्रास वाचला आहे.

गोपाळ पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख, एस.टी. कामगार सेना.