शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
2
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
3
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
4
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
5
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
6
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
7
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
8
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
9
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
10
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
11
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
12
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
13
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
14
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
15
फेल, फेल, सपशेल...! होंडाने Activa ईव्ही जानेवारीत आणली, आता उत्पादन बंद केले; गिऱ्हाईकच मिळेना...
16
दीपिकाच्या ८ तासांची शिफ्ट अटीवर रेणुका शहाणेची प्रतिक्रिया; म्हणाली, "अमान्य असेल तर..."
17
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
18
‘प्रत्येक विधानसभेत ५०,००० मतं कापण्याचा कट’, अखिलेश यादवांचे भाजपा, निवडणूक आयोगावर गंभीर आरोप  
19
हेडचे टी-२० स्टाईल शतक, पहिल्या ॲशेस कसोटीत ऑस्ट्रेलियाचा सनसनाटी विजय
20
मुक्ता बर्वे ४६ व्या वर्षीही अविवाहित; म्हणाली, "आधी स्थळं यायची अन् आताही येतात पण..."
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टच्या सेवेतून जळगाव एस.टी. कर्मचाऱ्यांना वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:16 IST

कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश : मुंबईला जात असल्याने अनेकांना झाली होती कोरोनाची बाधा कर्मचाऱ्यांना दिलासा : कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला ...

कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश : मुंबईला जात असल्याने अनेकांना झाली होती कोरोनाची बाधा

कर्मचाऱ्यांना दिलासा : कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला आले यश

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मुंबई येथे बेस्टच्या सेवेसाठी जाणाऱ्या चालक-वाहकांना यापुढे मुंबईला न पाठविण्याबाबत महामंडळाने जळगाव विभागाला पत्र पाठविले आहे. मुंबईला बेस्टच्या सेवेसाठी जात असल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली होती. अखेर महामंडळ प्रशासनाने यापुढे जळगावच्या कर्मचाऱ्यांना न बोलाविण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे, तर कामगार संघटनांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

कोरोनामुळे मुंबईत सर्वसामान्य नागरिकांना लोकल सेवा बंद असल्यामुळे मुंबईकरांसाठी बेस्टतर्फे जादा बस सोडण्यात आल्या होत्या. या जादा बससाठी एस.टी. महामंडळाच्या चालक व वाहकांची मदत घेण्यात आली होती. त्याकरिता महामंडळाच्या राज्यातील काही विभागांमधून दर आठवड्याला चालक व वाहकांना बोलाविण्यात येत होते. त्यानुसार जळगाव विभागातून दर आठवड्याला ५० चालक व ५० वाहक मुंबईला जात होते. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना या सेवेसाठी पाठविण्यात येत होते.

इन्फो :

अनेक कर्मचाऱ्यांचा सुरुवातीपासून होता विरोध

मुंबई येथे कोरोना संसर्गाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने जळगाव विभागातील अनेक कर्मचाऱ्यांनी बेस्टच्या सेवेला जाण्याकरिता विरोध दर्शविला होता, तसेच या प्रकाराबाबत सुरुवातीपासूनच इंटक संघटना व सेना कामगार संघटना कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या होत्या. हा निर्णय मागे घेण्याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता.

इन्फो :

...अखेर जळगावच्या कर्मचाऱ्यांना दिलासा

जळगावहून मुंबईला इतक्या लांब अंतरावर बेस्टच्या सेवेसाठी जात असल्याने तेथून आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांच्या परिवारालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे या प्रकाराला सर्व स्तरातून विरोध दर्शविला जात होता. महामंडळाने हा निर्णय मागे घेण्याबाबत विविध कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केल्यामुळे महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.

इन्फो :

बेस्टसाठी जळगाव विभागातून चालक-वाहकांना नियमित पाठविण्यात येत होते. मात्र, आता यापुढे त्यांना पुढील आदेश येईपर्यंत पाठविण्यात येऊ नये, असे लेखी आदेश जळगाव विभागाला देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना बेस्टच्या सेवेसाठी पाठविण्यात येणार नाही. या बाबतीत इंटक संघटनेच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

नरेंद्रसिंह राजपूत, विभागीय सचिव, इंटक संघटना.

जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांना मुंबईला न पाठविण्याबाबत एस.टी. कामगार सेनेतर्फे परिवहनमंत्र्यांकडे पत्रव्यवहार करण्यात आला होता. अखेर महामंडळाने हा निर्णय मागे घेतल्यामुळे कर्मचाऱ्यांचा मुंबईला जाण्याचा त्रास वाचला आहे.

गोपाळ पाटील, राज्य प्रसिद्धी प्रमुख, एस.टी. कामगार सेना.