शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

जळगावात कचराकोंडीला ‘सुकृती’ने दिली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 12:39 IST

स्तुत्य उपक्रम : महिनाभरात 350 क्विंटल कचरा केला गोळा

ठळक मुद्दे अपार्टमेंटमध्येच गोळा केला ओला व सुका स्वतंत्र्यरित्या कचरा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र्य कचराकुंडय़ाओल्या कच:यापासून करणार अपार्टमेंटमध्येच खतनिर्मिती43 कुटुंबांनी उभा केला आदर्श !

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 -  ज्या ठिकाणाहून कचरा निर्माण होतो, त्या ठिकाणापासूनच ओला व सुका कचरा वेगळा करीत त्यांची योग्य विल्हेवाट लावली तर पर्यावरण रक्षणास किती हातभार लागू शकतो, याचा आदर्श जळगावमधील द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीच्या रहिवाशांनी उभा केला आहे.   एक महिन्यापूर्वीच सुरू केलेल्या या आगळ्य़ा-वेगळ्य़ा उपक्रमातून दीडशे क्विंटल सुका तर 200 क्विंटलच्यावर ओल्या कच:यांची स्वत: योग्य विल्हेवाट लावली आहे. सध्या प्रत्येक शहरात कच:याची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यात ओला व सुका कचरा एकत्र झाला तर त्याची विल्हेवाट लावण्यास मोठी अडचण येते व तो कुजून शहरवासीयांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे जळगावातही ही समस्या असल्याने यावर किमान खारीचा वाटा घेत पर्यावरण रक्षणासाठी कॉन्फेडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ही बांधकाम संघटना व अरिहंत डेव्हलपर्स हे संयुक्तपणे सरसावले आहेत. यासाठी क्रेडाईच्या राज्यस्तरीय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिश शहा यांनी द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीपासून या उपक्रमाला सुरुवात केली. कच:यासाठी कोडसुकृती रेसीडेन्सी या ठिकाणी तीन इमारती असून त्यात एकूण 43 कुटुंब राहतात. येथे निघणारा कचरा त्याच ठिकाणी वेगवेगळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रहिवाशांनीही पुढाकार घेतला. यात क्रेडाई संघटनेमार्फत ओला कचरा टाकण्यासाठी हिरव्या रंगाची कचराकुंडी तर सुका कचरा टाकण्यासाठी निळी कचराकुंडी प्रत्येक घरासमोर ठेवण्यात आली. त्यानुसार येथील रहिवासी याच ठिकाणी कचरा वेगवेगळा टाकतात. मनपा कर्मचा:यासाठी रंगाची ओळखया ठिकाणी ठराविक वेळेत महापालिकेची घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येते. या घंटागाडीचा कर्मचारी प्रत्येक घरोघर जाऊन कचरा गोळा करतो. विशेष म्हणजे कचरा गोळा करण्यासाठी या कर्मचा:यालादेखील निळ्य़ा व हिरव्या रंगाची मोठी कचराकुंडी देण्यात आली आहे. त्यात वेगवेगळा कचरा गोळा करून त्याची वेगवेगळी विल्हेवाट लावतो. कच:याची योग्य विल्हेवाटमहिन्याभरापूर्वीच सुरू केलेल्या या उपक्रमास येथील रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व रहिवाशांनी मिळून महिनाभरात 150 क्विंटल सुका व 200 क्विंटलच्यावर ओला कचरा वेगवेगळा गोळा केला. यामुळे या कच:यांची योग्य विल्हेवाट लागण्यास मदत झाली. झाडांसाठी खत निर्मिती करणारया पुढचे पाऊल म्हणजे आता हा कचरा बाहेर न जाता त्याच ठिकाणी ओल्या कच:यापासून बायोगॅस अथवा खत निर्मिती करण्याचा मनोदय अनिश शहा यांनी व्यक्त केला. हे खत झाडांना देण्यासही मदत होईल व महापालिकेचाही भार कमी होईल, या उपक्रमास इमारतीमधील विठ्ठल काबरा, अॅड. राजेंद्र येवले, संदीप पाटील, चंद्रकांत जैन, के.जी. चौधरी, अॅड. बन्सीलाल महाजन यांच्यासह सर्वच रहिवासी हातभार लावत आहे. 

सध्या कच:याची समस्या गंभीर असल्याने प्रत्येकाने ओला व सुका कचरा वेगवेगळा केला तर पर्यावरण रक्षणास हातभार लागू शकतो. या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यास रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. - अनिश शहा, सदस्य, राज्यस्तरीय व्यवस्थापन समिती, क्रेडाई