शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
5
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
6
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
7
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
8
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
9
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
10
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
11
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
12
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
13
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
14
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
15
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
16
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
17
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
18
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
19
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
20
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?

जळगावात कचराकोंडीला ‘सुकृती’ने दिली वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 12:39 IST

स्तुत्य उपक्रम : महिनाभरात 350 क्विंटल कचरा केला गोळा

ठळक मुद्दे अपार्टमेंटमध्येच गोळा केला ओला व सुका स्वतंत्र्यरित्या कचरा कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र्य कचराकुंडय़ाओल्या कच:यापासून करणार अपार्टमेंटमध्येच खतनिर्मिती43 कुटुंबांनी उभा केला आदर्श !

विजयकुमार सैतवाल / ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 20 -  ज्या ठिकाणाहून कचरा निर्माण होतो, त्या ठिकाणापासूनच ओला व सुका कचरा वेगळा करीत त्यांची योग्य विल्हेवाट लावली तर पर्यावरण रक्षणास किती हातभार लागू शकतो, याचा आदर्श जळगावमधील द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीच्या रहिवाशांनी उभा केला आहे.   एक महिन्यापूर्वीच सुरू केलेल्या या आगळ्य़ा-वेगळ्य़ा उपक्रमातून दीडशे क्विंटल सुका तर 200 क्विंटलच्यावर ओल्या कच:यांची स्वत: योग्य विल्हेवाट लावली आहे. सध्या प्रत्येक शहरात कच:याची मोठी डोकेदुखी वाढली आहे. त्यात ओला व सुका कचरा एकत्र झाला तर त्याची विल्हेवाट लावण्यास मोठी अडचण येते व तो कुजून शहरवासीयांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. अशाच प्रकारे जळगावातही ही समस्या असल्याने यावर किमान खारीचा वाटा घेत पर्यावरण रक्षणासाठी कॉन्फेडेरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) ही बांधकाम संघटना व अरिहंत डेव्हलपर्स हे संयुक्तपणे सरसावले आहेत. यासाठी क्रेडाईच्या राज्यस्तरीय व्यवस्थापन समितीचे सदस्य अनिश शहा यांनी द्रौपदीनगरातील सुकृती रेसीडेन्सीपासून या उपक्रमाला सुरुवात केली. कच:यासाठी कोडसुकृती रेसीडेन्सी या ठिकाणी तीन इमारती असून त्यात एकूण 43 कुटुंब राहतात. येथे निघणारा कचरा त्याच ठिकाणी वेगवेगळा करून त्यांची विल्हेवाट लावण्यासाठी रहिवाशांनीही पुढाकार घेतला. यात क्रेडाई संघटनेमार्फत ओला कचरा टाकण्यासाठी हिरव्या रंगाची कचराकुंडी तर सुका कचरा टाकण्यासाठी निळी कचराकुंडी प्रत्येक घरासमोर ठेवण्यात आली. त्यानुसार येथील रहिवासी याच ठिकाणी कचरा वेगवेगळा टाकतात. मनपा कर्मचा:यासाठी रंगाची ओळखया ठिकाणी ठराविक वेळेत महापालिकेची घंटागाडी कचरा उचलण्यासाठी येते. या घंटागाडीचा कर्मचारी प्रत्येक घरोघर जाऊन कचरा गोळा करतो. विशेष म्हणजे कचरा गोळा करण्यासाठी या कर्मचा:यालादेखील निळ्य़ा व हिरव्या रंगाची मोठी कचराकुंडी देण्यात आली आहे. त्यात वेगवेगळा कचरा गोळा करून त्याची वेगवेगळी विल्हेवाट लावतो. कच:याची योग्य विल्हेवाटमहिन्याभरापूर्वीच सुरू केलेल्या या उपक्रमास येथील रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत असून सर्व रहिवाशांनी मिळून महिनाभरात 150 क्विंटल सुका व 200 क्विंटलच्यावर ओला कचरा वेगवेगळा गोळा केला. यामुळे या कच:यांची योग्य विल्हेवाट लागण्यास मदत झाली. झाडांसाठी खत निर्मिती करणारया पुढचे पाऊल म्हणजे आता हा कचरा बाहेर न जाता त्याच ठिकाणी ओल्या कच:यापासून बायोगॅस अथवा खत निर्मिती करण्याचा मनोदय अनिश शहा यांनी व्यक्त केला. हे खत झाडांना देण्यासही मदत होईल व महापालिकेचाही भार कमी होईल, या उपक्रमास इमारतीमधील विठ्ठल काबरा, अॅड. राजेंद्र येवले, संदीप पाटील, चंद्रकांत जैन, के.जी. चौधरी, अॅड. बन्सीलाल महाजन यांच्यासह सर्वच रहिवासी हातभार लावत आहे. 

सध्या कच:याची समस्या गंभीर असल्याने प्रत्येकाने ओला व सुका कचरा वेगवेगळा केला तर पर्यावरण रक्षणास हातभार लागू शकतो. या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्यास रहिवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. - अनिश शहा, सदस्य, राज्यस्तरीय व्यवस्थापन समिती, क्रेडाई