शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

विशेष उत्सव गाड्यांमुळे जळगाव रेल्वे स्टेशनला सव्वा कोटींची कमाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:16 IST

कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेली रेल्वेसेवा, अनलाॅकच्या पाचव्या टप्प्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष प्रवासी ...

कोरोनामुळे गेले काही महिने बंद असलेली रेल्वेसेवा, अनलाॅकच्या पाचव्या टप्प्यानंतर पुन्हा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष प्रवासी गाड्यांसह विशेष उत्सव गाड्यादेखील रेल्वेतर्फे सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या गाड्यांना जनरल तिकिटे देण्याची सुविधा न ठेवता, फक्त तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वे गाडीत प्रवेश देण्यात येत आहे. दसरा, दिवाळीपासून सुरू केलेल्या या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असून, सध्या नाताळ सणानिमित्तही या गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. जळगाव स्टेशनवरून या विशेष उत्सव गाड्यांना भरघोस उत्पन्न मिळाले असून, गेल्या महिन्यात ३२ हजार ३७५ प्रवाशांनी तिकीट खिडकीवर तिकीट काढले होते. यातून रेल्वेला एक कोटी ३२ लाख ६१ हजार ८८५ इतकी कमाई झाली आहे.

इन्फो :

कमी गाड्यांमुळे तिकीट आरक्षित होईना :

सध्या रेल्वेतर्फे विशेष गाड्या आणि विशेष उत्सव प्रवासी गाड्या सुरू असल्या तरी, या गाड्यांची संख्या अपूर्ण असल्यामुळे, तिकीट आरक्षित होत नसल्याच्या प्रवाशांतर्फे तक्रारी करण्यात येत आहेत. चार ते आठ दिवस आधी तिकीट बुकिंग करूनही, आरक्षित होत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच रेल्वेत तिकीट आरक्षित असणाऱ्या प्रवाशांनाच प्रवेश मि‌ळत असल्यामुळे, प्रवाशांना नाइलाजस्त तिकीट रद्द करावे लागत आहे. त्यामुळे आतापर्यंत जळगाव स्टेशनवरून चार हजार २६८ प्रवाशांनी तिकीट रद्द केले असून, यातून १८ लाख ३८ हजार ६९८ रुपयांचा परतावा प्रवाशांना देण्यात आला आहे.

इन्फो :

जनरल तिकीट मात्र बंदच :

सध्या सुरू असलेल्या गाड्यांमध्ये तिकीट खिडकीवरून तात्काळ जनरल तिकीट काढून, प्रवासाला बंदी घालण्यात आली आहे. यामुळे पाचोरा, चाळीसगाव, नाशिक या ठिकाणी जाणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांची व चाकरमान्यांची चांगलीच गैरसोय होत आहे. तरी रेल्वे प्रशासनाने जनरल तिकीट सुरू करण्याची मागणी विविध प्रवासी संघटनांतर्फे करण्यात येत आहे.

इन्फो :

सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्या व उत्सव गाड्यांना प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवाशांची संख्या जास्त असल्यामुळे अनेकांचे तिकीट लवकर आरक्षित होत नाही. मात्र, टप्प्याटप्प्याने जसजशी गाड्यांची संख्या वाढेल, त्यावेळी प्रवाशांची गैरसोय दूर होईल.

युवराज पाटील, वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक, भुसावळ रेल्वे विभाग