शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

जळगाव एलसीबीच्या खुर्चीवर अखेर सुनील कुराडेंचीच वर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 16:06 IST

जिल्हा पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यात सर्वात महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीसाठी जिल्ह्यातील अनेक अधिकारी स्पर्धेत होते. जामनेर, मुक्ताईनगर येथील संबंध तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी असलेली जवळीक कराडे यांना या खुर्चीपर्यंत घेऊन गेली आहे.

ठळक मुद्देजळगाव पोलीस दलात फेरबदल  राजेशसिंह चंदेल मानव संसाधन विभागातएलसीबीसाठी अनेक जण होते रांगेत

आॅनलाईन लोकमतजळगाव दि,१२ : जिल्हा पोलीस अधीक्षकानंतर जिल्ह्यात सर्वात महत्वाचे पद असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील कुराडे यांची वर्णी लागली आहे. या खुर्चीसाठी जिल्ह्यातील अनेक अधिकारी स्पर्धेत होते. जामनेर, मुक्ताईनगर येथील संबंध तसेच पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांच्याशी असलेली जवळीक कराडे यांना या खुर्चीपर्यंत घेऊन गेली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी बुधवारी रात्री उशिरा जिल्हा पोलीस दलात मोठे फेरबदल केले. कुराडे यांना स्थानिक गुन्हे शाखेत संधी दिल्यानंतर तेथील निरीक्षक राजेशसिंह चंदेल यांना मानस संसाधन विभागात पाठविण्यात आले आहे. कुराडे यांच्या जागी रामानंद नगरचे बी.जी.रोहम यांची नियुक्ती केली आहे तर शहर वाहतूक शाखेचे सतीश भामरे यांना रामानंद नगर पोलीस स्टेशन देण्यात आले. जिल्ह्यात नव्याने आलेले व मुळचे जिल्ह्यातीलच असलेले विलास सोनवणे यांची शहर वाहतूक शाखेच्या निरीक्षकपदी नियुक्ती केली आहे. भुसावळ शहरला कार्यरत असलेले वसंत मोरे यांना टीएमसी सेलचे प्रमुख करण्यात आले आहे.

दुय्यम अधिकाºयांच्या बदल्याया प्रभारी अधिकाºयांच्या व्यतिरिक्त जिल्हा नियंत्रण कक्षातील सहायक पोलीस निरीक्षक एकनाथ ढोबळे यांना अमळनेर उपअधीक्षक कार्यालयात वाचक म्हणून नियुक्त देण्यात आली आहे. उपनिरीक्षक मुनसफखा पठाण यांची जिल्हा वाहतूक शाखेत,अनंत नेमाने यांची स्थानिक गुन्हे शाखेतील सायबर कक्षात तर रामानंद नगरचे उपनिरीक्षक राजेश घोळवे यांची चाळीसगाव शहर येथे व रोहीदास ठोंबरे यांची रामानंद नगर पोलीस स्टेशनला नियुक्ती झाली आहे.

एलसीबीसाठी अनेक जण होते रांगेतस्थानिक गुन्हे शाखेत वर्णी लागावी यासाठी जामनेरचे नजीर शेख हे प्रामुख्याने आघाडीवर होते. त्यानंतर बोदवडचे निरीक्षक अनिरुध्द आढाव, नव्याने जिल्ह्यात आलेले विलास सोनवणे, भुसावळ बाजार पेठचे चंद्रकांत सरोदे यांच्यासह आणखी दोन निरीक्षक स्पर्धेत होते. या सर्वांना मुक्ताईनगर, जामनेरसह मुंबई, नाशिक वाºया केल्या मात्र, त्याच वरचढ ठरले ते कुराडेच. दरम्यान, एमआयडीसी येथे बी.जी.रोहम यांची नियुक्ती झालेली असली तरी त्या पोलीस स्टेशनची हद्द व जातीय तणावाच्या घटना पाहता रोहम यांच्या जागी दुसºया अधिकाºयाची नियुक्ती होऊ शकते अशी माहिती मिळाली आहे.