शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव उद्योग क्षेत्राला अजूनही डी दर्जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उद्योगांचा दर्जा डी प्लस करण्याची मागणी केली जात होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उद्योगांचा दर्जा डी प्लस करण्याची मागणी केली जात होती. या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि जळगावातील उद्योजकांची भेट घडवून आणली. त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी जळगावच्या उद्योजकांना डी प्लस दर्जा देण्याचे मान्य केले. त्यानुसार उद्योगांना करात जास्तीची सवलत मिळते. मात्र हे आश्वासन अजूनही हवेतच आहेत. त्याकडे दोन महिन्यात कुणीही लक्ष दिलेले नाही.

जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीला आधीच मरगळ आली आहे. जिल्ह्यात एकेकाळी पाईप्स आणि चटईचे मोठे उद्योग कार्यरत होते. मात्र आता जिल्ह्यातील चटई उद्योगाला अवकळा आली आहे. कोरोनानंतरच्या काळात चटई उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच शसानाने जिल्ह्याच्या उद्योगांचा दर्जा डीप्लस वरून डी केला आहे. त्यामुळे करात जिल्ह्यातील उद्योगांना ७० टक्के रकमेचा परतावा मिळत होता. तो आता डी गटात फक्त ५० टक्केच मिळत आहे. त्यामुळे उद्योगांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

याबाबत जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग मित्रच्या बैठकीत उद्योजकांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या होत्या. त्याची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योजकांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मुंबई येथे नेले. त्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जळगावातील उद्योजकांचे म्हणणे मान्य करत त्यांना डी प्लस दर्जा देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे लवकरात लवकर जळगावकरांना त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

दोन महिन्यांनंतर देखील आश्वासन हवेतच

ही बैठक मुंबईत ३ डिसेंबर २०२० रोजी झाली होती. या बैठकीला आता साठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही त्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.