शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
3
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
4
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
8
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
9
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
12
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
13
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
14
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
15
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
16
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
17
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
18
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
19
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
20
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस

जळगाव उद्योग क्षेत्राला अजूनही डी दर्जाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उद्योगांचा दर्जा डी प्लस करण्याची मागणी केली जात होती. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : जिल्ह्यातील उद्योगांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी उद्योगांचा दर्जा डी प्लस करण्याची मागणी केली जात होती. या मागणीनुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई आणि जळगावातील उद्योजकांची भेट घडवून आणली. त्यावेळी उद्योगमंत्र्यांनी जळगावच्या उद्योजकांना डी प्लस दर्जा देण्याचे मान्य केले. त्यानुसार उद्योगांना करात जास्तीची सवलत मिळते. मात्र हे आश्वासन अजूनही हवेतच आहेत. त्याकडे दोन महिन्यात कुणीही लक्ष दिलेले नाही.

जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसीला आधीच मरगळ आली आहे. जिल्ह्यात एकेकाळी पाईप्स आणि चटईचे मोठे उद्योग कार्यरत होते. मात्र आता जिल्ह्यातील चटई उद्योगाला अवकळा आली आहे. कोरोनानंतरच्या काळात चटई उद्योगासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या अडचणी काही संपण्याचे नाव घेत नाही. त्यातच शसानाने जिल्ह्याच्या उद्योगांचा दर्जा डीप्लस वरून डी केला आहे. त्यामुळे करात जिल्ह्यातील उद्योगांना ७० टक्के रकमेचा परतावा मिळत होता. तो आता डी गटात फक्त ५० टक्केच मिळत आहे. त्यामुळे उद्योगांसमोर अडचणी वाढल्या आहेत.

याबाबत जिल्हा उद्योग केंद्रात उद्योग मित्रच्या बैठकीत उद्योजकांनी आपल्या व्यथा व्यक्त केल्या होत्या. त्याची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्योजकांना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे मुंबई येथे नेले. त्या बैठकीत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जळगावातील उद्योजकांचे म्हणणे मान्य करत त्यांना डी प्लस दर्जा देण्याचे मान्य केले होते. त्यामुळे लवकरात लवकर जळगावकरांना त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

दोन महिन्यांनंतर देखील आश्वासन हवेतच

ही बैठक मुंबईत ३ डिसेंबर २०२० रोजी झाली होती. या बैठकीला आता साठ दिवसांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही त्याबाबत राज्य शासनाच्या उद्योग विभागाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील उद्योजकांनी नाराजी व्यक्त केली आहे.