शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
4
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
5
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
6
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
7
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
8
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
9
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
10
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
11
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
12
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
13
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
14
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
15
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
16
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
17
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
18
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
19
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
20
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर

जळगाव जिल्ह्यातील अपूर्ण ६९ सिंचन प्रकल्पांसाठी अद्यापही ६७१२ कोटींंची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2020 13:21 IST

पूर्णत्वासाठी याच गतीने लागणार २२ वर्षे

जळगाव : जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांचे काम निधी अभावी अत्यंत धीम्यागतीने सुरू असून तापी महामंडळाच्या स्थापनेनंतरही तब्बल २५ वर्षांतही जिल्ह्यातील ६९ सिंचन प्रकल्प अपूर्णच आहेत. त्यांच्या पूर्णत्वासाठी अद्यापही ६७१२ कोटींच्या निधीची गरज आहे. विशेष म्हणजे यापैकी मोठे व मध्यम मिळून १६ प्रकल्पांची मूळ किंमत २७१८.४५ कोटी असताना व त्यावर आतापर्यंत ४४४९.८ कोटी खर्च झालेले असताना आणखी ६ हजार ४६४ कोटींची गरज आहे.जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांना निधीचा मोठा अडसर आहे. जिल्ह्यातील मोठे ८ प्रकल्प, मध्यम ८ प्रकल्प व लघु ५३ प्रकल्प असे ६९ प्रकल्प अद्यापही प्रलंबित आहेत. तापी महामंडळाला जलसंपदा विभागामार्फत दरवर्षी केवळ ३०० कोटींच्या आसपासच निधी मिळतो. त्यातून भूसंपादन, वाढीव मोबदला आदी कामांवरच अधिक निधी खर्च होत असल्यान काम रखडत आहे.गुजरातमध्ये जाणारे पाणी अडविण्याचे आव्हानपाणीवाटप करारानुसार महाराष्टÑाच्या वाट्याला आलेले तापी खोऱ्याचे पाणी जिल्ह्यातील प्रकल्प अपूर्ण असल्याने गुजरातमध्ये वाहून जात आहे. हे पाणी अडवून त्याचा जिल्ह्यातील कृषी सिंचनासाठी लाभ व्हावा यासाठी जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प प्राधान्याने पूर्ण करण्याची मागणी सर्व आमदारांनी नुकत्याच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या आढावा बैठकीतही केली होती. यावर जलसंपदा विभागाच्या सचिवांनी २०२४ पर्यंत हे प्रकल्प पूर्ण करण्याचा कार्यक्रम आखला असल्याचे सांगितले होते. मात्र या प्रकल्पांना आवश्यक असलेला निधी व राज्य शासनाकडून उपलब्ध होणारा निधी, दिवसेंदिवस होत असलेली प्रकल्प किंमतीतील वाढ, यामुळे या मुदतीत हे उद्दीष्ट पूर्ण होणे अशक्य दिसत आहे.हे आहेत अपूर्ण मध्यम प्रकल्पबहुळा, मोर, अंजनी, शेळगाव बॅरेज, वरखेडे लोंढे, पद्मालय उपसा सिंचन योजना, गूळ प्रकल्प, गिरणा ७ बंधारे हे ८ मध्यम प्रकल्प अपूर्ण आहेत. यापैकी शेळगाव बॅरेज, वरखेडे लोंढे हे प्रकल्प केंद्राच्या योजनेत समाविष्ट करण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पांना थेट केंद्राकडून पूर्ण निधी मिळणार आहे. त्यामुळे या प्रकल्पांचे काम गतीने पूर्ण होऊ शकेल.संथगती राहिल्यास प्रकल्पासाठी लागणार २२ वर्षेदिवसेंदिवस या प्रकल्पाच्या किंमतीत वाढच होत आहे. याच गतीने काम चालल्यास हे सर्व अपूर्ण प्रकल्प पूर्ण होण्यास किमान २२ वर्षांचा कालावधी लागेल.जिल्ह्यातील अपूर्णावस्थेत असलेल्या ८ मोठे व ८ मध्यम प्रकल्पांवर आतापर्यंत ४४५० कोटी रूपये खर्च झाला आहे. मूळ किंमत २७१८.४५ कोटी असलेल्या या प्रकल्पांची सुधारीत किंमत गेल्या २५ वर्षात १० हजार ९१४.३ कोटींवर पोहोचली आहे. मात्र मोठ्या प्रकल्पांसाठी अद्यापही ४०७८ कोटी १९ लाख तर मध्यम प्रकल्पांसाठी २३८६.३१ कोटींच्या निधीची गरज आहे. यापैकी काही मोठे प्रकल्प केंद्राच्या बळीराजा जलसंजीवनी योजनेत टाकण्यास मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे त्यांना केंद्राकडून आवश्यक सर्व निधी उपलब्ध होणार आहे.हे आहेत अपूर्ण मोठे प्रकल्पवाघूर, निम्नतापी प्रकल्प, वरणगाव-तळवेल उपसा सिंचन योजना, कुºहा-वढोदा उपसा सिंचन योजना, भागपूर, बोदवड उपसा सिंचन योजना, हतनूर ८ गेट व महाकाय पुनर्भरण योजना हे ८ मोठे प्रकल्प अपूर्ण आहेत. यापैकी महाकाय पुनर्भरण योजना अनेक वर्षांपासून सर्वेक्षणाच्या फेºयातच अडकलेली आहे.प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे अद्याप निधी किती लागणार? हे देखील निश्चित झालेले नाही. मात्र या योजनेमुळे ३ लाख ५७ हजार ७८८ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार असून ८८१.६० दलघमी पाणीसाठा होणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव