शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जळगाव जिल्ह्यात 2 लाख हेक्टरवरील पेरण्या वाया जाण्याची भीती

By admin | Updated: June 28, 2017 12:34 IST

पेरण्या 50 टक्क्यांवर जाऊन थांबल्या. सव्वालाख हेक्टरवरील पूर्वहंगामी कापूस सुस्थितीत; बियाण्यांची पुन्हा मागणी

 ऑनलाईन लोकमत 

जळगाव,दि.28 - जिल्हाभरात 50 टक्के क्षेत्रावर पेरण्या झालेल्या आहेत. पण पावसाने ओढ दिल्याने तब्बल दोन लाख हेक्टरवरील पेरण्या  वाया जाण्याची स्थिती आहे. अनेक ठिकाणी पावसाअभावी व्यवस्थितपणे न अंकुरलेल्या पेरण्या मोडायला सुरुवात झाली आहे. यातच पुरेसा पाऊस नसल्याने पेरण्याही थांबल्या आहेत. 
जिल्हाभरात सात लाख 67 हजार हेक्टरवर पेरण्यांचे उद्दीष्ट कृषी विभागाने ठरविले होते. जूनच्या सुरुवातीला पेरण्या झाल्या. चोपडा, धरणगाव, जळगावमधील तापीकाठ व गिरणा काठावरील गावांमध्ये धूळ पेरण्याही केल्या. पण पाऊस व्यवस्थितपणे न आल्याने पेरण्या वाया गेल्यात जमा आहेत. 
सर्वाधिक फटका सोयाबीनला बसला आहे. सोयाबीन 40 किंवा यापेक्षा अधिक मि.मी. पावसात अंकुरतो, पण अपु:या पावसात सोयाबीन अंकुरलाच नाही. जवळपास 30 हजार हेक्टरवरील सोयाबीन मोडण्याची वेळ आल्याची माहिती आहे. यापाठोपाठ ज्वारी, उडीद, मूग या पिकांची पेरणी वाया गेली आहे. 
एक लाख हेक्टरवरील कोरडवाहू कापूसही कोमेजला
जवळपास एक लाख हेक्टरवरील कापसालाही कमी पावसाचा फटका बसला आहे. 11 जूननंतर अनेक शेतक:यांनी कोरडवाहू क्षेत्रातही कापसाची लागवड केली होती. पण हा कापूस न अंकुरल्याने मोठे आर्थिक नुकसान शेतक:यांना सहन करावे लागले आहे. 
कापूस, सोयाबीन, ज्वारी, उडीद, मूग आदींच्या दोन लाख हेक्टरवरील पेरणीला फटका बसला आहे. तर जवळपास अडीच लाख हेक्टरवरील पिके सुरक्षित आहेत. अर्थातच जिल्ह्यात चोपडा, जळगाव, यावल, रावेरचा काही भाग, मुक्ताईनगर, बोदवड, धरणगाव व एरंडोलमध्ये पाऊसमान नाही. पण पाचोरा, एरंडोलचा पारोळानजीकचा भाग, पारोळा, अमळनेरचा दक्षिणेकडील अर्धा भाग, चाळीसगावचा काही भाग, जामनेर या तालुक्यांमध्ये स्थिती बरी आहे. अधून मधून आलेल्या हलक्या पावसाने या भागातील पिकांना जीवदान दिले. 
बियाण्याची मोठी उचल सध्या बाजारपेठेत सुरू आहे. पाऊसमान काही भागात बरे आहे. पण काही भागात पाऊसच नाही.  कापूस, उडीद, मूग, सोयाबीन या बियाण्यांची दुबार पेरणीसाठी मागणी वाढल्याने जि.प.च्या कृषी विभागाने अधिकचे बियाणे कृषी आयुक्तालयाकडे मागितले आहे. कापसाचे बियाणे पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्याची कुठलीही टंचाई किंवा अडचण नसल्याची माहिती कृषी विभागातून मिळाली.