शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
2
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
3
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
4
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
5
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
6
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
7
"परेश रावल यांच्याशिवाय...", 'हेरा फेरी ३'च्या वादावर सोनाक्षी सिन्हा म्हणाली असं काही...
8
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
9
इराणचा अणुबॉम्बबाबत मोठा निर्णय; अणुनिरीक्षण संस्थेशी संबंध तोडणार!
10
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्ससमोर बोलण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
11
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
12
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
13
उल्हासनगर महापालिका आयुक्त व आमदारात चर्चा, शहर समस्यांचा वाचला पाडा
14
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
15
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
16
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
17
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
18
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
19
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
20
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी

जळगाव जिल्ह्यात १४ दिवसात वाढले १४ टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:32 IST

निवडणूक, सुट्यांमुळे योजनांचे काम रखडले

जळगाव : यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्हाभरात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होतांनाचे चित्र आहे़ गेल्या दोन आठवड्यात जिल्हाभरात टँकरची संख्या १४ ने वाढली आहे़ सध्या जिल्ह्यात १४७ गावांमध्ये १३४ टँकर सुरू आहेत़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातून ही माहिती मिळाली़ आठवड्याला सरासरी पाच टँकर वाढत असल्याचे चित्र आहे़ त्यातच निवडणुका व सलगच्या सुट्या यामुळे दररोज अपडेट होणारी ही आकडेवारीही खोळंबली आहे़ आचारसंहितेमुळे योजना रखडल्या असल्याने टंचाईने अनेक गावांची होरपळ होत आहे़महत्त्वाच्या विभागात शूकशुकाटपाणीटंचाईच्या काळात पाणीपुरवठा व लघूसिंचन या विभागाकडे महत्त््वाच्या जबाबदाऱ्या असतात़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभागात रंगरंगोटीचे काम सुरू आहे़ शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास या विभागात सात कर्मचारी उपस्थित होते़ तर कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात स्वच्छतेचे काम सुरू होते़ याव्यतिरिक्त लघूसिंचनच्या कार्यालयात शूकशुकाट होता़ दोन दिवस सुट्या त्यात निवडणुकीच्या ड्युट्या या सर्वांमुळे जिल्हाभरातील टँकरची आकडेवारी अपडेट करण्याचे काम रखडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले़ तालुकास्तरावरून आढावा घेऊन किती गावांमध्ये किती टँकर सुरू आहे, याची आकडेवारी या विभागाकडून घेतली जाते़ मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत या टँकरची सध्यास्थिती काय याकडे मात्र, दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे़जिल्हा परिषदेत आता विरोधकच नाहीजिल्हाभरात पाण्याचा विषय अतिशय गंभीर असताना राजकीय पदाधिकारीही याबाबतीत पाहिजे तेवढे गंभीर नसल्याचे चित्र आहे़ आचारसंहिता लागताच उमेदवार घोषित होताच पदाधिकारी प्रचारात गुंतले़ जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसच्या सहकार्याने भाजपची सत्ता आहे़ शिवसेना विरोधात आहे, मात्र, लोकसभा निवडणुकीत युतीची घोषणा झाली व शिवसेनेला जिपच्या सत्तेत वाटा मिळेल अशी, आशा निर्माण झाली़ समाननिधी असो किंवा सभा तहकूब होण्याचा विषय असो आक्रमक भूमिका मांडणाºया शिवसेनेनेही आता भाजपची बाजू सावरण्यास सुरूवात केली असल्याने जि.प.त विरोधक नसल्यामुळेही पाणीटंचाई सारख्या अत्यावश्यक विषयावर आक्रमक भूमिका मांडायला कुणीही तयार नाही, अशी स्थिती आहे.गेल्या आठवडाभरात ९ टँकर वाढले होते़ त्यानंतर ११ एप्रिलच्या आकडेवारीनुसार १४३ गावांमध्ये १२९ टँकर सुरू होते़ १५ एप्रिल चार गावांमध्ये चार टँकर वाढले़ ही संख्या अजून वाढण्याचाी शक्यता आहे़निवडणूक ड्युटीविषयी गूढजिल्हा परिषदेतील साधारण ७० टक्के कर्मचाºयांची निवडणूक काळात ड्युटी लावण्यात आलेली आहे़ सामान्य प्रशासन विभागातील 90 टक्के कर्मचारी यात व्यस्त आहेत़ यात अधिकाºयांपासून शिपायांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे़ दरम्यान, निवडणूकीमुळे जिल्हाभरातील पाणीटंचाईचा विषय दुर्लक्षित होत असल्याची ओरड होत असताना पाणीपुरवठा विभागातील नेमक्या किती कर्मचाºयांना निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे याबाबत कर्मचाºयांमध्ये संस्पेन्स आहे़ प्रशिक्षण सर्वांनीच घेतले आहे, मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचीही आॅर्डर निघू शकते, अशी माहिती मिळाली़आचारसंहितेमुळे नव्या योजना मंजूर न करण्याच्या व मंजूर योजनांचे इ टेंडरिंग न करण्याच्या सूचना आहेत़ त्यामुळे विहिरी अधिग्रहन व विहिर खोलीकरणावरच आपला भर आहे़ मंजूर कामांपैकी अधिकांश कामे झालेली आहेत़आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ - एस़ बी़ नरवाडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Jalgaonजळगाव