शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

जळगाव जिल्ह्यात १४ दिवसात वाढले १४ टॅँकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2019 12:32 IST

निवडणूक, सुट्यांमुळे योजनांचे काम रखडले

जळगाव : यंदा कमी पर्जन्यमान झाल्यामुळे जिल्हाभरात दिवसेंदिवस पाण्याचा प्रश्न गंभीर होतांनाचे चित्र आहे़ गेल्या दोन आठवड्यात जिल्हाभरात टँकरची संख्या १४ ने वाढली आहे़ सध्या जिल्ह्यात १४७ गावांमध्ये १३४ टँकर सुरू आहेत़ जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागातून ही माहिती मिळाली़ आठवड्याला सरासरी पाच टँकर वाढत असल्याचे चित्र आहे़ त्यातच निवडणुका व सलगच्या सुट्या यामुळे दररोज अपडेट होणारी ही आकडेवारीही खोळंबली आहे़ आचारसंहितेमुळे योजना रखडल्या असल्याने टंचाईने अनेक गावांची होरपळ होत आहे़महत्त्वाच्या विभागात शूकशुकाटपाणीटंचाईच्या काळात पाणीपुरवठा व लघूसिंचन या विभागाकडे महत्त््वाच्या जबाबदाऱ्या असतात़ मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणीपुरवठा विभागात रंगरंगोटीचे काम सुरू आहे़ शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास या विभागात सात कर्मचारी उपस्थित होते़ तर कार्यकारी अभियंत्यांच्या कार्यालयात स्वच्छतेचे काम सुरू होते़ याव्यतिरिक्त लघूसिंचनच्या कार्यालयात शूकशुकाट होता़ दोन दिवस सुट्या त्यात निवडणुकीच्या ड्युट्या या सर्वांमुळे जिल्हाभरातील टँकरची आकडेवारी अपडेट करण्याचे काम रखडल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले़ तालुकास्तरावरून आढावा घेऊन किती गावांमध्ये किती टँकर सुरू आहे, याची आकडेवारी या विभागाकडून घेतली जाते़ मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत या टँकरची सध्यास्थिती काय याकडे मात्र, दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे़जिल्हा परिषदेत आता विरोधकच नाहीजिल्हाभरात पाण्याचा विषय अतिशय गंभीर असताना राजकीय पदाधिकारीही याबाबतीत पाहिजे तेवढे गंभीर नसल्याचे चित्र आहे़ आचारसंहिता लागताच उमेदवार घोषित होताच पदाधिकारी प्रचारात गुंतले़ जिल्हा परिषदेत सध्या काँग्रेसच्या सहकार्याने भाजपची सत्ता आहे़ शिवसेना विरोधात आहे, मात्र, लोकसभा निवडणुकीत युतीची घोषणा झाली व शिवसेनेला जिपच्या सत्तेत वाटा मिळेल अशी, आशा निर्माण झाली़ समाननिधी असो किंवा सभा तहकूब होण्याचा विषय असो आक्रमक भूमिका मांडणाºया शिवसेनेनेही आता भाजपची बाजू सावरण्यास सुरूवात केली असल्याने जि.प.त विरोधक नसल्यामुळेही पाणीटंचाई सारख्या अत्यावश्यक विषयावर आक्रमक भूमिका मांडायला कुणीही तयार नाही, अशी स्थिती आहे.गेल्या आठवडाभरात ९ टँकर वाढले होते़ त्यानंतर ११ एप्रिलच्या आकडेवारीनुसार १४३ गावांमध्ये १२९ टँकर सुरू होते़ १५ एप्रिल चार गावांमध्ये चार टँकर वाढले़ ही संख्या अजून वाढण्याचाी शक्यता आहे़निवडणूक ड्युटीविषयी गूढजिल्हा परिषदेतील साधारण ७० टक्के कर्मचाºयांची निवडणूक काळात ड्युटी लावण्यात आलेली आहे़ सामान्य प्रशासन विभागातील 90 टक्के कर्मचारी यात व्यस्त आहेत़ यात अधिकाºयांपासून शिपायांपर्यंत सर्वांचाच समावेश आहे़ दरम्यान, निवडणूकीमुळे जिल्हाभरातील पाणीटंचाईचा विषय दुर्लक्षित होत असल्याची ओरड होत असताना पाणीपुरवठा विभागातील नेमक्या किती कर्मचाºयांना निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे याबाबत कर्मचाºयांमध्ये संस्पेन्स आहे़ प्रशिक्षण सर्वांनीच घेतले आहे, मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत कोणाचीही आॅर्डर निघू शकते, अशी माहिती मिळाली़आचारसंहितेमुळे नव्या योजना मंजूर न करण्याच्या व मंजूर योजनांचे इ टेंडरिंग न करण्याच्या सूचना आहेत़ त्यामुळे विहिरी अधिग्रहन व विहिर खोलीकरणावरच आपला भर आहे़ मंजूर कामांपैकी अधिकांश कामे झालेली आहेत़आगामी काळात टँकरची संख्या वाढण्याची शक्यता आहे़ - एस़ बी़ नरवाडे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग

टॅग्स :Jalgaonजळगाव