शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

जळगाव झाले जलगाव

By विलास.बारी | Updated: August 20, 2017 20:04 IST

८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ; वाघूर धरणात ९३ टक्के तर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त जलसाठा

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के जलसाठागिरणा धरणात ५२ तर हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठाजिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने पोळ्याचा आनंद झाला द्विगुणितरविवारी दुपारी तब्बल अर्धा तास पावसाने जळगावकर चिंब

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२० : जिल्हाभरात पावसाचे सुखद पुनरागमन झाले आहे. शनिवारी  दिवसभर झालेल्या पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त साठा निर्माण झाला आहे. जळगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के तर गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त जलसाठा निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे शुभागमन झाले. शनिवारी झालेल्या भीज पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजाला आनंद झाला आहे.८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीशनिवार १९ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात जळगाव तालुक्यात ८१ मिमी.,  एरंडोल १८१, धरणगाव १४९, मुक्ताईनगर ६७, बोदवड १६९, पाचोरा १९३, चाळीसगाव १३५, भडगाव ८९ मिमी पाऊस झाला.वाघूर धरण ९३ टक्के भरलेजळगाव शहरासह भुसावळला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण दोन दिवस झालेल्या पावसामुळे ९३ टक्के भरले आहे. तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा,जळगाव तालुका, धरणाव तालुक्यातील अनेक पाणी योजना अवलंबून असलेल्या गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे.पोळ्याचा आनंद द्विगुणितगेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाचे पोळ्याच्या मुहूर्तावर आगमण झाल्याने बळीराजा आनंदी झाला आहे. वर्षभर शेतीत राबणाºया बैलाचा पोळ्याच्या निमित्ताने सन्मान आणि पावसाचे पुनरागमन यामुळे बळीराजाचा आनंद द्विगुणित झाला आहे.रविवारी जळगावकर चिंबशनिवारच्या जोरदार पावसानंतर रविवारी सकाळपासून कमी अधिक प्रमाणात जळगावात पाऊस सुरु होता. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरात तब्बल अर्धा तास पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रविवारची सुटी जोरदार पाऊस यामुळे जळगावकरांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाभरात कोठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.- नरविरसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.