शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

जळगाव झाले जलगाव

By विलास.बारी | Updated: August 20, 2017 20:04 IST

८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ; वाघूर धरणात ९३ टक्के तर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त जलसाठा

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के जलसाठागिरणा धरणात ५२ तर हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठाजिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने पोळ्याचा आनंद झाला द्विगुणितरविवारी दुपारी तब्बल अर्धा तास पावसाने जळगावकर चिंब

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२० : जिल्हाभरात पावसाचे सुखद पुनरागमन झाले आहे. शनिवारी  दिवसभर झालेल्या पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त साठा निर्माण झाला आहे. जळगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के तर गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त जलसाठा निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे शुभागमन झाले. शनिवारी झालेल्या भीज पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजाला आनंद झाला आहे.८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीशनिवार १९ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात जळगाव तालुक्यात ८१ मिमी.,  एरंडोल १८१, धरणगाव १४९, मुक्ताईनगर ६७, बोदवड १६९, पाचोरा १९३, चाळीसगाव १३५, भडगाव ८९ मिमी पाऊस झाला.वाघूर धरण ९३ टक्के भरलेजळगाव शहरासह भुसावळला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण दोन दिवस झालेल्या पावसामुळे ९३ टक्के भरले आहे. तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा,जळगाव तालुका, धरणाव तालुक्यातील अनेक पाणी योजना अवलंबून असलेल्या गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे.पोळ्याचा आनंद द्विगुणितगेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाचे पोळ्याच्या मुहूर्तावर आगमण झाल्याने बळीराजा आनंदी झाला आहे. वर्षभर शेतीत राबणाºया बैलाचा पोळ्याच्या निमित्ताने सन्मान आणि पावसाचे पुनरागमन यामुळे बळीराजाचा आनंद द्विगुणित झाला आहे.रविवारी जळगावकर चिंबशनिवारच्या जोरदार पावसानंतर रविवारी सकाळपासून कमी अधिक प्रमाणात जळगावात पाऊस सुरु होता. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरात तब्बल अर्धा तास पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रविवारची सुटी जोरदार पाऊस यामुळे जळगावकरांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाभरात कोठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.- नरविरसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.