शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव झाले जलगाव

By विलास.बारी | Updated: August 20, 2017 20:04 IST

८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ; वाघूर धरणात ९३ टक्के तर जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त जलसाठा

ठळक मुद्देजळगाव जिल्ह्यातील ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीजळगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के जलसाठागिरणा धरणात ५२ तर हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठाजिल्ह्यात पावसाच्या पुनरागमनाने पोळ्याचा आनंद झाला द्विगुणितरविवारी दुपारी तब्बल अर्धा तास पावसाने जळगावकर चिंब

आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.२० : जिल्हाभरात पावसाचे सुखद पुनरागमन झाले आहे. शनिवारी  दिवसभर झालेल्या पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. तर शनिवारी व रविवारी सलग दोन दिवस सुरु असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये ५९ टक्के उपयुक्त साठा निर्माण झाला आहे. जळगाव शहरासाठी पाणी पुरवठा करणाºया वाघूर धरणात ९३ टक्के तर गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त जलसाठा निर्माण झाला आहे.गेल्या काही दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातून पाऊस गायब झाला होता. शुक्रवारपासून जळगाव जिल्ह्यातील विविध भागात पावसाचे शुभागमन झाले. शनिवारी झालेल्या भीज पावसामुळे पिकांना दिलासा मिळाला असून बळीराजाला आनंद झाला आहे.८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीशनिवार १९ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे ८ तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे. त्यात जळगाव तालुक्यात ८१ मिमी.,  एरंडोल १८१, धरणगाव १४९, मुक्ताईनगर ६७, बोदवड १६९, पाचोरा १९३, चाळीसगाव १३५, भडगाव ८९ मिमी पाऊस झाला.वाघूर धरण ९३ टक्के भरलेजळगाव शहरासह भुसावळला पाणी पुरवठा करणारे वाघूर धरण दोन दिवस झालेल्या पावसामुळे ९३ टक्के भरले आहे. तर चाळीसगाव, भडगाव, पाचोरा,जळगाव तालुका, धरणाव तालुक्यातील अनेक पाणी योजना अवलंबून असलेल्या गिरणा धरणात ५२ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे. हतनूर धरणात ४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पात ५९ टक्के उपयुक्त पाणीसाठा तयार झाला आहे.पोळ्याचा आनंद द्विगुणितगेल्या अनेक दिवसांपासून गायब असलेल्या पावसाचे पोळ्याच्या मुहूर्तावर आगमण झाल्याने बळीराजा आनंदी झाला आहे. वर्षभर शेतीत राबणाºया बैलाचा पोळ्याच्या निमित्ताने सन्मान आणि पावसाचे पुनरागमन यामुळे बळीराजाचा आनंद द्विगुणित झाला आहे.रविवारी जळगावकर चिंबशनिवारच्या जोरदार पावसानंतर रविवारी सकाळपासून कमी अधिक प्रमाणात जळगावात पाऊस सुरु होता. दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास जळगाव शहरात तब्बल अर्धा तास पाऊस सुरु होता. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले होते. रविवारची सुटी जोरदार पाऊस यामुळे जळगावकरांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला.

शनिवारी झालेल्या जोरदार पावसामुळे तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाभरात कोठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.- नरविरसिंह रावळ, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, जळगाव.