शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
5
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
6
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
7
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
8
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
9
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
10
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
11
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
12
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
13
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
14
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
15
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
16
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
17
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
18
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
19
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक
20
Pranjal Khewalkar: रोहिणी खडसेंचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयाकडून जामीन मंजूर

जळगावला जपलंय हृदयाचा कप्प्यात

By admin | Updated: April 17, 2017 11:24 IST

रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले.

सिने अभिनेता जितेंद्र जोशी : जुन्या आठवणींना दिला उजाळा; शहरातील विक्रमी तापमानाची भितीजळगाव :  लहानपणी सुटय़ांमध्ये जळगावातील पुष्पा मावशीकडे यायचो.. इथल्या रस्त्यांवर भटकायचो.. रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले. पांडे कुटुंबिय माङो नातेवाईक.. रंगकर्मी प्रविण पांडे हा माझा  मित्र..  या शहराने कधीही बोलवले तर येईन..राजकमल टॉकीज परिसर असो वा भैय्याजीच्या कुल्फीची चव, लहानपणी होती तशीच आजही आहे. दहा वर्षानंतर मी जळगावात आलो. गेल्या पंधरा-वीस वर्षात शहरात फार काही बदल झाला नसला तरी जळगावच्या उन्हाळ्यात मात्र मोठा बदल झाला आहे. यंदाच्या उन्हाची तर भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया  मराठी सिनेअभिनेता जितेंद्र जोशी यांनी रविवारी महावीर ज्वेलर्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  एका शाळेच्या कार्यक्रमासाठी रविवारी ते शहरात आले असता जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाती कधीही तुटत नसतातजितेंद्र जोशी म्हणाले की, जळगावात आल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाची भेट घेतली.  रथ चौकात गेल्यानंतर परिसरातील मित्रांशी गप्पा मारल्या. त्यांच्या दृष्टीने जितेंद्र जोशी मोठा अभिनेता असला तरी मी त्यांना केवळ माङो नातेवाईक व मित्रच मानतो. व्यस्त वेळात संबध जोपासणे सर्वात मोठे काम असते. कारण स्टारपण आज आहे, उद्या नाही. मात्र नाती ही कधीच तुटत नाही.सोशल नेटवर्किग साईट्सवर विचारवंत तयार सध्या युवक सोशल साईट्सवर आपला वेळ वाया घालवितात. मात्र यामुळे घरा-घरातला संवाद हरविला आहे. तसेच अनेक सोशल साईट्सवर अनेक ‘विचारवंत’ देखील तयार झाले आहेत. यामुळे अनेकदा वाद देखील उद्भवतात. हे युवकांनी टाळले पाहिजे असे आवाहन  जोशी यांनी केले. चित्रपटासाठी दिग्दर्शकाकडे जात नाहीमराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले की हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे असा समज कलाकारांमध्ये आहे. मात्र मला तसे काही वाटत नसून चित्रपटात काम करायला मिळावे म्हणून मी कोणत्याही दिग्दर्शकाकडे गेलो नसल्याचे जितेंद्र जोशी यांनी सांगितले.  भविष्यात जळगावात ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या प्रयोग करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असे आश्वासन देखील जितेंद्र जोशी यांनी दिले. मुलांना मोकळीक द्या जळगावात गेल्या काही वर्षापासून येण्याचे ठरविले होते. मात्र वेळच मिळत नव्हता. मुलांचा कार्यक्रम असल्याने जळगावला आलो. मुलांच्या कार्यक्रमात पालकांशी संवाद साधण्याची कोणतीही संधी हुकू देत नाही. पालकांमध्ये मीपणा निर्माण झाला आहे, आपला पाल्य एक नंबर कसा येईल हाच विचार त्यांच्या मनात आहे. मुलांना मोकळीक देण्याची गरज असून, त्यांना मनाप्रमाणे जगू द्या असे आवाहन त्यांनी केले. दुष्काळ येण्यापूर्वीच दोन हात करण्याची तयारी ठेवागेल्या काही वर्षापासून पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात :हास होत आहे. यामुळे वातावरणात देखील अनेक बदल होत आहेत. दुष्काळ येण्याची वाट न पाहता त्याआधी दुष्काळाशी दोन हात करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक शेतक:याने, ग्रामस्थांनी जलसंधारणाचे काम केले पाहिजे. पाणी फाउंडेशन चे काम हे कोणत्याही फायदा तोटय़ासाठी नसून केवळ पाण्यासाठी असल्याचे जोशी यांनी सांगितले.