शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

जळगावला जपलंय हृदयाचा कप्प्यात

By admin | Updated: April 17, 2017 11:24 IST

रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले.

सिने अभिनेता जितेंद्र जोशी : जुन्या आठवणींना दिला उजाळा; शहरातील विक्रमी तापमानाची भितीजळगाव :  लहानपणी सुटय़ांमध्ये जळगावातील पुष्पा मावशीकडे यायचो.. इथल्या रस्त्यांवर भटकायचो.. रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले. पांडे कुटुंबिय माङो नातेवाईक.. रंगकर्मी प्रविण पांडे हा माझा  मित्र..  या शहराने कधीही बोलवले तर येईन..राजकमल टॉकीज परिसर असो वा भैय्याजीच्या कुल्फीची चव, लहानपणी होती तशीच आजही आहे. दहा वर्षानंतर मी जळगावात आलो. गेल्या पंधरा-वीस वर्षात शहरात फार काही बदल झाला नसला तरी जळगावच्या उन्हाळ्यात मात्र मोठा बदल झाला आहे. यंदाच्या उन्हाची तर भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया  मराठी सिनेअभिनेता जितेंद्र जोशी यांनी रविवारी महावीर ज्वेलर्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  एका शाळेच्या कार्यक्रमासाठी रविवारी ते शहरात आले असता जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाती कधीही तुटत नसतातजितेंद्र जोशी म्हणाले की, जळगावात आल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाची भेट घेतली.  रथ चौकात गेल्यानंतर परिसरातील मित्रांशी गप्पा मारल्या. त्यांच्या दृष्टीने जितेंद्र जोशी मोठा अभिनेता असला तरी मी त्यांना केवळ माङो नातेवाईक व मित्रच मानतो. व्यस्त वेळात संबध जोपासणे सर्वात मोठे काम असते. कारण स्टारपण आज आहे, उद्या नाही. मात्र नाती ही कधीच तुटत नाही.सोशल नेटवर्किग साईट्सवर विचारवंत तयार सध्या युवक सोशल साईट्सवर आपला वेळ वाया घालवितात. मात्र यामुळे घरा-घरातला संवाद हरविला आहे. तसेच अनेक सोशल साईट्सवर अनेक ‘विचारवंत’ देखील तयार झाले आहेत. यामुळे अनेकदा वाद देखील उद्भवतात. हे युवकांनी टाळले पाहिजे असे आवाहन  जोशी यांनी केले. चित्रपटासाठी दिग्दर्शकाकडे जात नाहीमराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले की हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे असा समज कलाकारांमध्ये आहे. मात्र मला तसे काही वाटत नसून चित्रपटात काम करायला मिळावे म्हणून मी कोणत्याही दिग्दर्शकाकडे गेलो नसल्याचे जितेंद्र जोशी यांनी सांगितले.  भविष्यात जळगावात ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या प्रयोग करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असे आश्वासन देखील जितेंद्र जोशी यांनी दिले. मुलांना मोकळीक द्या जळगावात गेल्या काही वर्षापासून येण्याचे ठरविले होते. मात्र वेळच मिळत नव्हता. मुलांचा कार्यक्रम असल्याने जळगावला आलो. मुलांच्या कार्यक्रमात पालकांशी संवाद साधण्याची कोणतीही संधी हुकू देत नाही. पालकांमध्ये मीपणा निर्माण झाला आहे, आपला पाल्य एक नंबर कसा येईल हाच विचार त्यांच्या मनात आहे. मुलांना मोकळीक देण्याची गरज असून, त्यांना मनाप्रमाणे जगू द्या असे आवाहन त्यांनी केले. दुष्काळ येण्यापूर्वीच दोन हात करण्याची तयारी ठेवागेल्या काही वर्षापासून पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात :हास होत आहे. यामुळे वातावरणात देखील अनेक बदल होत आहेत. दुष्काळ येण्याची वाट न पाहता त्याआधी दुष्काळाशी दोन हात करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक शेतक:याने, ग्रामस्थांनी जलसंधारणाचे काम केले पाहिजे. पाणी फाउंडेशन चे काम हे कोणत्याही फायदा तोटय़ासाठी नसून केवळ पाण्यासाठी असल्याचे जोशी यांनी सांगितले.