शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जळगावला जपलंय हृदयाचा कप्प्यात

By admin | Updated: April 17, 2017 11:24 IST

रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले.

सिने अभिनेता जितेंद्र जोशी : जुन्या आठवणींना दिला उजाळा; शहरातील विक्रमी तापमानाची भितीजळगाव :  लहानपणी सुटय़ांमध्ये जळगावातील पुष्पा मावशीकडे यायचो.. इथल्या रस्त्यांवर भटकायचो.. रथचौक.. सुभाष चौक. बळीरामपेठ..सगळसगळ आठवतंय.. अस सांगताना सिनेअभिनेता जितेंद्र जोशी गहिवरले. पांडे कुटुंबिय माङो नातेवाईक.. रंगकर्मी प्रविण पांडे हा माझा  मित्र..  या शहराने कधीही बोलवले तर येईन..राजकमल टॉकीज परिसर असो वा भैय्याजीच्या कुल्फीची चव, लहानपणी होती तशीच आजही आहे. दहा वर्षानंतर मी जळगावात आलो. गेल्या पंधरा-वीस वर्षात शहरात फार काही बदल झाला नसला तरी जळगावच्या उन्हाळ्यात मात्र मोठा बदल झाला आहे. यंदाच्या उन्हाची तर भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया  मराठी सिनेअभिनेता जितेंद्र जोशी यांनी रविवारी महावीर ज्वेलर्समध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  एका शाळेच्या कार्यक्रमासाठी रविवारी ते शहरात आले असता जुन्या आठवणींना उजाळा दिला. नाती कधीही तुटत नसतातजितेंद्र जोशी म्हणाले की, जळगावात आल्यानंतर प्रत्येक नातेवाईकाची भेट घेतली.  रथ चौकात गेल्यानंतर परिसरातील मित्रांशी गप्पा मारल्या. त्यांच्या दृष्टीने जितेंद्र जोशी मोठा अभिनेता असला तरी मी त्यांना केवळ माङो नातेवाईक व मित्रच मानतो. व्यस्त वेळात संबध जोपासणे सर्वात मोठे काम असते. कारण स्टारपण आज आहे, उद्या नाही. मात्र नाती ही कधीच तुटत नाही.सोशल नेटवर्किग साईट्सवर विचारवंत तयार सध्या युवक सोशल साईट्सवर आपला वेळ वाया घालवितात. मात्र यामुळे घरा-घरातला संवाद हरविला आहे. तसेच अनेक सोशल साईट्सवर अनेक ‘विचारवंत’ देखील तयार झाले आहेत. यामुळे अनेकदा वाद देखील उद्भवतात. हे युवकांनी टाळले पाहिजे असे आवाहन  जोशी यांनी केले. चित्रपटासाठी दिग्दर्शकाकडे जात नाहीमराठी चित्रपटांमध्ये यश मिळाले की हिंदी चित्रपटांमध्ये काम करायचे असा समज कलाकारांमध्ये आहे. मात्र मला तसे काही वाटत नसून चित्रपटात काम करायला मिळावे म्हणून मी कोणत्याही दिग्दर्शकाकडे गेलो नसल्याचे जितेंद्र जोशी यांनी सांगितले.  भविष्यात जळगावात ‘दोन स्पेशल’ या नाटकाच्या प्रयोग करण्याची संधी मिळाली तर नक्की करेन असे आश्वासन देखील जितेंद्र जोशी यांनी दिले. मुलांना मोकळीक द्या जळगावात गेल्या काही वर्षापासून येण्याचे ठरविले होते. मात्र वेळच मिळत नव्हता. मुलांचा कार्यक्रम असल्याने जळगावला आलो. मुलांच्या कार्यक्रमात पालकांशी संवाद साधण्याची कोणतीही संधी हुकू देत नाही. पालकांमध्ये मीपणा निर्माण झाला आहे, आपला पाल्य एक नंबर कसा येईल हाच विचार त्यांच्या मनात आहे. मुलांना मोकळीक देण्याची गरज असून, त्यांना मनाप्रमाणे जगू द्या असे आवाहन त्यांनी केले. दुष्काळ येण्यापूर्वीच दोन हात करण्याची तयारी ठेवागेल्या काही वर्षापासून पर्यावरणाचा मोठय़ा प्रमाणात :हास होत आहे. यामुळे वातावरणात देखील अनेक बदल होत आहेत. दुष्काळ येण्याची वाट न पाहता त्याआधी दुष्काळाशी दोन हात करण्याची गरज आहे. यासाठी प्रत्येक शेतक:याने, ग्रामस्थांनी जलसंधारणाचे काम केले पाहिजे. पाणी फाउंडेशन चे काम हे कोणत्याही फायदा तोटय़ासाठी नसून केवळ पाण्यासाठी असल्याचे जोशी यांनी सांगितले.