शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गूळ मध्यम प्रकल्पात यंदा शून्य टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवर तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती ...

चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवर तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पात यंदा जुलैअखेर शून्य टक्के जलसाठा आहे. यापुढे पावसाचे पाणी आले नाही तर मात्र शून्य साठा हा गंभीर चिंतेचा विषय ठरणार आहे. या प्रकल्पात सध्या डबके साचल्यागत पाणीसाठा दिसत आहे.

चोपडा तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची गूळ नदीवर निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता २३.२५ दशलक्ष घनमीटर आहे. आतापर्यंत केवळ मृत म्हणजे पाणीच नसल्यागत स्थिती धरणात आहे. म्हणजेच शून्य टक्के पाण्याचा साठा यावर्षी पावसाळा अर्धा संपण्याच्या स्थितीला आहे. यापैकी गेल्या दोन वर्षापासून चोपडा शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगरपालिकेसाठी ०३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा राखीव करण्यात आला आहे. गेल्यावर्षी चोपडा तालुक्यात जुलै महिनाअखेर ६६८.६२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र जुलैअखेर केवळ १७४.०३ मिलीमीटर पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत यंदा चोपडा तालुक्यात कमी प्रमाणात पावसाची नोंद गेल्या वर्षाच्या तुलनेत झाल्याचे दिसते. पुढील काही दिवसांत जर पावसाने पुन्हा दडी मारली तर मात्र तालुक्यातील महत्त्वाकांक्षी असलेला गूळ प्रकल्पातील नसलेला पाणीसाठा प्रशासनासह तालुकावासीयांसाठी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.

गूळ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप

गूळ प्रकल्पात धरणाची जास्तीत जास्त उंची ३१.३३ मीटर आणि १७५ मीटर लांबीचा दगडी बांध आणि २८.७६ मीटर जास्तीत जास्त उंचीचा कॉंक्रीट धरणाचा समावेश आहे. ४२ मीटर लांबीच्या गेटमधून १८३०.३० क्यूसेकचे निर्वहन करण्याची क्षमता आहे.

चोपडा तालुक्यातील ११ गावांमधील ३७०८ हेक्टर क्षेत्रातील सिंचन करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पात ३.६७ किमी लांबीचा डावा कालवा (एलबीसी) आणि ४.६२ किमी लांबीचा उजवा कालवा (आरबीसी) यांचा समावेश आहे. या प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता ३०२५ हेक्टर आहे.

या प्रकल्पावर आधारित इतर फायदे मत्स्य व्यवसाय हा आहे. धरणात पाणीसाठाच झाला नाही तर वरीलपैकी एकही लाभ मिळणार तर नाहीच, उलट चोपडा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. म्हणून दमदार पाऊस पडावा, अशी वरुणराजाला आळवणी केली जात आहे.