शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
3
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
4
गुंतवणूकदार होणार मालामाल! 'ही' ऑटोमोबाईल कंपनी देणार प्रति शेअर १०० रुपये लाभांश, तुम्हालाही संधी?
5
मोठी नाचक्की...! ऑपरेशन सिंदूरवेळी कराची बंदरातून पाकिस्तानी नौदल पळून गेलेले; कुठे लपलेले...
6
Russia-Ukraine War : एकीकडे शांतता चर्चा, दुसरीकडे बॉम्ब वर्षाव: झेलेन्स्की अमेरिकेत असताना रशियाने युक्रेनला हादरवले!
7
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
8
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
9
दहावीतील विद्यार्थ्याची नववीतील विद्यार्थ्याने केली हत्या, चाकूने सपासप वार केले आणि...  
10
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
11
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
12
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
13
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
14
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
15
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
16
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
17
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
18
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
19
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
20
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...

गूळ मध्यम प्रकल्पात यंदा शून्य टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:16 IST

चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवर तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती ...

चोपडा : सातपुडा पर्वतात शेकडो किलोमीटर अंतरावरून पाणी घेऊन येणार्‍या गूळ नदीवर तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पात यंदा जुलैअखेर शून्य टक्के जलसाठा आहे. यापुढे पावसाचे पाणी आले नाही तर मात्र शून्य साठा हा गंभीर चिंतेचा विषय ठरणार आहे. या प्रकल्पात सध्या डबके साचल्यागत पाणीसाठा दिसत आहे.

चोपडा तालुक्यातील मालापूर येथे गूळ मध्यम प्रकल्पाची गूळ नदीवर निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकल्पाची पाणीसाठा क्षमता २३.२५ दशलक्ष घनमीटर आहे. आतापर्यंत केवळ मृत म्हणजे पाणीच नसल्यागत स्थिती धरणात आहे. म्हणजेच शून्य टक्के पाण्याचा साठा यावर्षी पावसाळा अर्धा संपण्याच्या स्थितीला आहे. यापैकी गेल्या दोन वर्षापासून चोपडा शहराला पाणीपुरवठा व्हावा म्हणून नगरपालिकेसाठी ०३ दशलक्ष घनमीटर पाण्याचा साठा राखीव करण्यात आला आहे. गेल्यावर्षी चोपडा तालुक्यात जुलै महिनाअखेर ६६८.६२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली होती. यंदा मात्र जुलैअखेर केवळ १७४.०३ मिलीमीटर पावसाची नोंद शासकीय दप्तरी करण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत यंदा चोपडा तालुक्यात कमी प्रमाणात पावसाची नोंद गेल्या वर्षाच्या तुलनेत झाल्याचे दिसते. पुढील काही दिवसांत जर पावसाने पुन्हा दडी मारली तर मात्र तालुक्यातील महत्त्वाकांक्षी असलेला गूळ प्रकल्पातील नसलेला पाणीसाठा प्रशासनासह तालुकावासीयांसाठी व परिसरातील शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरणार आहे.

गूळ प्रकल्प : एक दृष्टिक्षेप

गूळ प्रकल्पात धरणाची जास्तीत जास्त उंची ३१.३३ मीटर आणि १७५ मीटर लांबीचा दगडी बांध आणि २८.७६ मीटर जास्तीत जास्त उंचीचा कॉंक्रीट धरणाचा समावेश आहे. ४२ मीटर लांबीच्या गेटमधून १८३०.३० क्यूसेकचे निर्वहन करण्याची क्षमता आहे.

चोपडा तालुक्यातील ११ गावांमधील ३७०८ हेक्टर क्षेत्रातील सिंचन करण्याची क्षमता आहे. या प्रकल्पात ३.६७ किमी लांबीचा डावा कालवा (एलबीसी) आणि ४.६२ किमी लांबीचा उजवा कालवा (आरबीसी) यांचा समावेश आहे. या प्रकल्पाची अंतिम सिंचन क्षमता ३०२५ हेक्टर आहे.

या प्रकल्पावर आधारित इतर फायदे मत्स्य व्यवसाय हा आहे. धरणात पाणीसाठाच झाला नाही तर वरीलपैकी एकही लाभ मिळणार तर नाहीच, उलट चोपडा शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होईल. म्हणून दमदार पाऊस पडावा, अशी वरुणराजाला आळवणी केली जात आहे.