शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

जागर भुलाबाईचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:39 IST

‘लोकमत’च्या वीकेण्ड स्पेशलमध्ये सांस्कृतिक या सदरात शैलजा सतीश पप्पू यांचा लेख.

भाद्रपद पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेर्पयत खान्देशात, व:हाड व पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे भुलाबाईची स्थापना होते. महिनाभर घरात उत्साहाचे वातावरण असते. भिल्लीणीचा वेष घेऊन भिल्लरुपी शंकराला (भुलोबा) भुलवायला आलेल्या पार्वतीचे हे नाव भुलाबाई. भुलोबा- भुलाबाईची मातीची मूर्ती सजवलेल्या मखरात बसवली जाते. रोज संध्याकाळी गल्लीतल्या मुली एकमेकींच्या घरी जाऊन फेर धरुन टिप:या वाजवून गाणी म्हणतात. पहिली गं भुलाबाई, देवा देवा साजे.. या गाण्याने सुरुवात होते. महाराष्ट्रातील या परंपरेला विविध नावांनी संबोधले जाते. जसं भोंडला आणि हादगा. यातही अशीच गाणी असतात. नवरात्रात रोज भोंडला खेळला जातो. हस्त नक्षत्र असल्याने पाटावर हत्तीचे चित्र काढतात. मुली त्याची पूजा करतात. हातात हात धरून फेर धरून पाटाभोवती गाणी म्हणतात. पहिल्या दिवशी एक गाणं, दुस:या दिवशी दोन गाणी अशी गाण्यांची संख्या वाढवत नेतात. दस:याला 10 गाणी म्हणतात. गाणी म्हटल्यावर भोंडल्याची खिरापत म्हणजेच खाऊ ओळखून तो वाटला जातो. ‘ऐलोमा पैलोमा गणेश देवा..’ या गाण्याने भोंडल्याची गाणी सुरू करतात. आपल्या घरी खूप मोठ्ठा भोंडला व्हावा म्हणून चढाओढही लागते. ‘हादगा’ हासुद्धा भोंडल्यासारखाच असतो. हस्त नक्षत्रात दिवसभर कडकडीत ऊन आणि संध्याकाळी धो धो पाऊस पडतो. असं म्हणतात की, हत्ती समुद्रावरुन सोंड भरून पाणी आणतो आणि आपल्या इथे टाकतो. पाऊस हा सर्व सृष्टीत नवचैतन्य निर्माण करतो आणि अश्विन महिन्याच्या सौंदर्यात आणखीनच भर घालतो. ‘धो, धो, धो पडतील हस्ती, भरतील धान्याचा पोती’ हस्ताच्या पावसाचे असे सुंदर वर्णन या गीतात केले आहे. ‘हादगा’ म्हणजे हत्तीची केलेली पूजा. हत्तीचे चित्र बाजारात मिळते. एक हत्ती किंवा समोरासमोर तोंड करून सोंडेत माळ धरलेले हत्ती उभे असतात. असे हादग्याचे चित्र असते. याला ङोंडूची फुले वाहतात. तसंच या दिवसात मिळणा:या फळभाज्यांची माळ करून घालतात. ‘हादगा देव मी पूजिते, सख्यांना बोलवते..’ भुलाबाई महाराष्ट्रात व मध्य प्रदेशातही खेळली जाते. महिनाभर घरोघरी भुलाबाईची पूजा करतात, गाणी म्हणतात आणि खिरापत वाटतात. रोज नवनवीन खाऊ हे याचे वैशिष्टय़ असते. शेवटच्या दिवशी गाणी रात्री म्हटली जातात. ही रात्र असते कोजागिरी पौर्णिमेची. या दिवशी सगळ्याजणी एकत्र येतात. गाणी म्हणतात. 33 प्रकारचे खाऊ बनवतात. काही ठिकाणी फुलोराही करतात आणि गाणी म्हणून जागरण करतात. अशाप्रकारे हादगा, भोंडला, भुलाबाई या वेगवेगळ्या नावांनी जरी हा उत्सव होत असला तरी संस्कृती व परंपरा इ. वसा पुढील पिढीकडे संक्रमित होत असतो. आज धकाधकीच्या जीवनात आपण वेळेअभावी अनेक गोष्टी करत नाही. सोडून देतो आणि जीवनातला आनंद हरवून बसतो. परंपरा पुढे जाण्यासाठी सण, उत्सव व महोत्सव यांची गरज असते. समाजात अनेक लोक, संस्था विविध उपक्रमातून अशा परंपरा पुढे नेत आहेत. केशवस्मृती प्रतिष्ठानही गेल्या 15 वर्षापासून अत्यंत यशस्वीपणे भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करीत आहे. वय विसरून लहान मोठय़ा सर्व मैत्रिणी यात सहभागी होत आहेत. घरात, गल्लीत आता भुलाबाईची स्थापना होत आहे. गाणी म्हणायला मैत्रिणी जमत आहेत. आज सगळेच जण यात सहभागी होत आहे. जे अजून सहभागी नसतील त्यांनी सहभागी व्हावे आणि आपल्या समृध्द मौखिक परंपरेचे एक भाग व्हावे. चला तर मग सगळ्याजणी जमूयात.