शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

समिती नसताना ५ पट दंड रद्दचा अहवाल स्वीकारणे चुकीचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:34 IST

मनपा उपायुक्तांचा अहवाल : ठराव विखंडनाचा चेंडू नव्या आयुक्तांकडे

जळगाव : महानगरपालिकेच्या २० फेब्रुवारी रोजी झालेल्या महासभेत गाळेधारकांवरील पाच पट दंड रद्द करण्याचा केलेला ठराव मनपाकडून विखंडनासाठी पाठविण्याची संपूर्ण प्रक्रिया पार पडली आहे. ५ पट दंड रद्दसाठी जी समिती स्थापन केली होती, त्यासमितीचा ठराव शासनाकडे विखंडनासाठी पाठविला असताना, त्यासमितीच्या अहवालावरून ५ पट दंड रद्दचा ठराव करणे चुकीचे असून हा ठराव विखंडनासाठी पाठविण्याचा अहवाल उपायुक्त चंद्रकांत खोसे यांनी दिला आहे.दरम्यान, उपायुक्तांनी आपला अहवाल तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे ८ मार्च रोजीच दिला होता. मात्र, डांगे यांनी या प्रकरणी सत्ताधाऱ्यांशी वैर न पत्करता हा ठराव विखंडनाची जबाबदारी नवीन आयुक्त उदय टेकाळे यांच्यावर सोपविला आहे. ५ पट दंड रद्दचा ठरावाप्रकरणी आता आयुक्त टेकाळे काय निर्णय घेतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ठराव विखंडनासाठी जावा ही तर ‘भाजपा’चीच इच्छा ?५ पट दंड रद्दच्या ठरावावेळी भाजपाचे आठ नगरसेवक गैरहजर होते. तसेच जे नगरसेवक हजर होते, त्यांना देखील अजूनही या ठरावाबाबत न्यायालयात कोणी याचिका दाखल केली तर किं वा लेखापरीक्षात काही त्रुटी निघाल्या तर अडचण निर्माण होण्याची भिती आहे.त्यामुळे ५ पट दंड रद्दचा ठराव प्रशासनाने विखंडनासाठी पाठवावा अशी इच्छा भाजपा नगरसेवकांचीच असल्याची माहिती भाजपाच्या सूत्रांनी दिली आहे. भाजपाकडे आता गाळेधारकांना आपण ठराव केला असे सांगण्यासाठी असून, ठराव विखंडनासाठी पाठवला तर सर्व खापर प्रशासनावर फोडण्याचीही तयारी भाजपाने सुरु केली आहे.आयुक्त टेकाळेंच्या निर्णयाकडे लक्षगाळेधारकांवरील ५ पट दंड रद्दचा ठरावासाठी सत्ताधारी भाजपाने प्रयत्न केला होता. तसेच गाळेधारकांना अनेकदा भाजपाने ५ पट दंड रद्दबाबत आश्वासने देखील दिली होती. त्यामुळे हा ठराव सत्ताधारी भाजपासाठी महत्वाचा आहे. मात्र, प्रशासनाने हा ठराव विखंडनासाठी पाठवला तर गाळेधारकांसह सत्ताधाऱ्यांनाही धक्का बसल्यासारखाच राहणार आहे. त्यातच तत्कालीन आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी या ठरावावर सावध भूमिका घेत विधीतज्ज्ञांचा सल्ला घेतला. मात्र, विखंडनाची जबाबदारी दोन दिवसांपुर्वी मनपात रुजू झालेले आयुक्त उदय टेकाळे यांच्यावर टाकून दिली आहे. त्यामुळे हा ठराव विखंडनासाठी पाठविल्यास आयुक्त सत्ताधाऱ्यांची नाराजी ओढवून घेवू शकतात. त्यामुळे टेकाळे हा ठराव विखंडनासाठी पाठविण्यासाठी किती काळ घेतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.विधी तज्ज्ञांनी मनपा प्रशासनावर सोपविला निर्णयमनपा प्रशासनाने गाळेधारकांवरील ५ पट दंड रद्दसाठी करण्यात आलेल्या ठरावाबाबत विधीतज्ज्ञांकडून अभिप्राय मागितला होता. गेल्या आठवठ्यात विधीतज्ज्ञांकडून या ठरावाबाबत आपले मत मनपाला कळविले. यामध्ये म्हटले आहे की, प्रशासनाने समिती गठीत करण्याचा ठराव विखंडनासाठी पाठविला आहे. त्यामुळे प्रशासनाकडे समिती ठराव मंजूर झाल्याचा ठराव नाही. तसेच महासभा ठराव क्रमांक ११२ हा प्रशासनाचा मुळ विषय नसून, शासनाच्या १८ डिसेंबर २०१८ व १० डिसेंबर २०१८ च्या आदेशाच्या विचार करता हा ठराव विखंडनासाठी पाठविण्याचा अधिकार मनपा प्रशासनाचा असल्याचे मनपाचे विधीतज्ज्ञ अ‍ॅड.केतन ढाके यांनी आपल्या अभिप्रायात म्हटले आहे.