शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

धर्म रक्षण कर्त्याचेच होते रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:04 IST

जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर्व कलेवर धर्म कला विजय प्राप्त करते. अशाच प्रकारे सर्व कथांना एक धर्म कथा विजय प्राप्त ...

जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर्व कलेवर धर्म कला विजय प्राप्त करते. अशाच प्रकारे सर्व कथांना एक धर्म कथा विजय प्राप्त करते, सर्व शक्तींवर धर्म शक्ती विजय मिळविते, संसाराच्या सर्व सुखांवर धर्म सुख विजय प्राप्त करते. या बाबत जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी आपल्या अंतिम वाणीत उत्तराध्ययन सूत्राच्या अकराव्या अध्यायात म्हटले आहे की, ‘धर्मो रक्षती रक्षित:....’ अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण होते. अशाच प्रकारे महाभारतात वेद व्यास यांनी म्हटले आहे की, ‘धर्म एवं हतो हन्ती, धर्म रक्षती रक्षित:...’याचा अर्थ आम्ही धर्मास सुरक्षित ठेवले तर तो आमचे संरक्षण करेल, अर्थात आम्ही धर्माचे रक्षण-पालन केले नाही तर तो आमचे अस्तित्त्व नष्ट करेल. यासाठी प्रत्येकाने धर्माच्या रहस्याला जाणावे, त्याला जीवनात उतरवावे आणि त्याचे प्रत्यक्ष संरक्षण करण्याचे प्रयत्न करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.संसारात प्र्रत्येक व्यक्ती लहानात लहान सूक्ष्म वस्तूंपासून मोठ्या वस्तू, ज्या अध:पतनाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, त्यांना सुरक्षित ठेवत असतो. मात्र धर्म शाश्वत आहे, जीवनास उन्नत करणारा आहे, त्याला मात्र सुरक्षित ठेवत नाही.धर्म अशी वस्तू नाही की, जी कपाटात अथवा तिजोरीत सुरक्षित ठेवू शकतो. त्यासाठी धर्मास प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, जीवनात उतरावयाचे आहे. जी व्यक्ती धर्मास आपल्या जीवनात उतरवत नाही, त्याचे रक्षण करीत नाही त्याचे जीवन निरर्थक आहे. पवित्रता, मदत, विश्वास, न्यायबुद्धी, औदार्य, एकता, दक्षता, वास्तविकता, समर्पण भावना इत्यादींच्या सुरक्षिततेसाठी धर्माच्या वेगेवगेळ््या व्याख्या आहेत.आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवाश्री कुंदकुंदाचार्यांनी धर्माची एक छोटीसी परिभाषा मांडताना म्हटले आहे की, आपला स्वभाव हाच धर्म आहे. ज्या प्रमाणे पाण्याचा स्वभाव शीतलता, अग्नीचा स्वभाव उष्णता, साखरेचा स्वभाव स्निग्धता, गोडपणा आणि मीठाचा स्वभाव खारटपणा आहे, त्याचप्रमाणे आत्म्याचा स्वभाव ज्ञान दर्शन आणि चारित्र्यमय आहे, सत्, चित आणि आनंदमय आहे. आत्मा आपल्या शुद्ध व पवित्रमय स्वभावात राहिला तर निश्चितच धर्ममय आहे. त्यासाठी आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.दान कार्यास सुरक्षित ठेवामदर टेरेसा, बाबा आमटे यांनी आपल्या कार्यातून दानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातून दीन-दु:खीतांची सेवा करण्यात मोठे पुण्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे दानाचेही महत्त्व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या सोबतच विश्वास, न्यायबुद्धी, दानशुरता, एकता, सावधानता, वास्तवता, समर्पण यांनाही सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.- प्रेमचंद बरडिया, निवृत्त प्राध्यापक