शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

धर्म रक्षण कर्त्याचेच होते रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:04 IST

जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर्व कलेवर धर्म कला विजय प्राप्त करते. अशाच प्रकारे सर्व कथांना एक धर्म कथा विजय प्राप्त ...

जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर्व कलेवर धर्म कला विजय प्राप्त करते. अशाच प्रकारे सर्व कथांना एक धर्म कथा विजय प्राप्त करते, सर्व शक्तींवर धर्म शक्ती विजय मिळविते, संसाराच्या सर्व सुखांवर धर्म सुख विजय प्राप्त करते. या बाबत जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी आपल्या अंतिम वाणीत उत्तराध्ययन सूत्राच्या अकराव्या अध्यायात म्हटले आहे की, ‘धर्मो रक्षती रक्षित:....’ अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण होते. अशाच प्रकारे महाभारतात वेद व्यास यांनी म्हटले आहे की, ‘धर्म एवं हतो हन्ती, धर्म रक्षती रक्षित:...’याचा अर्थ आम्ही धर्मास सुरक्षित ठेवले तर तो आमचे संरक्षण करेल, अर्थात आम्ही धर्माचे रक्षण-पालन केले नाही तर तो आमचे अस्तित्त्व नष्ट करेल. यासाठी प्रत्येकाने धर्माच्या रहस्याला जाणावे, त्याला जीवनात उतरवावे आणि त्याचे प्रत्यक्ष संरक्षण करण्याचे प्रयत्न करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.संसारात प्र्रत्येक व्यक्ती लहानात लहान सूक्ष्म वस्तूंपासून मोठ्या वस्तू, ज्या अध:पतनाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, त्यांना सुरक्षित ठेवत असतो. मात्र धर्म शाश्वत आहे, जीवनास उन्नत करणारा आहे, त्याला मात्र सुरक्षित ठेवत नाही.धर्म अशी वस्तू नाही की, जी कपाटात अथवा तिजोरीत सुरक्षित ठेवू शकतो. त्यासाठी धर्मास प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, जीवनात उतरावयाचे आहे. जी व्यक्ती धर्मास आपल्या जीवनात उतरवत नाही, त्याचे रक्षण करीत नाही त्याचे जीवन निरर्थक आहे. पवित्रता, मदत, विश्वास, न्यायबुद्धी, औदार्य, एकता, दक्षता, वास्तविकता, समर्पण भावना इत्यादींच्या सुरक्षिततेसाठी धर्माच्या वेगेवगेळ््या व्याख्या आहेत.आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवाश्री कुंदकुंदाचार्यांनी धर्माची एक छोटीसी परिभाषा मांडताना म्हटले आहे की, आपला स्वभाव हाच धर्म आहे. ज्या प्रमाणे पाण्याचा स्वभाव शीतलता, अग्नीचा स्वभाव उष्णता, साखरेचा स्वभाव स्निग्धता, गोडपणा आणि मीठाचा स्वभाव खारटपणा आहे, त्याचप्रमाणे आत्म्याचा स्वभाव ज्ञान दर्शन आणि चारित्र्यमय आहे, सत्, चित आणि आनंदमय आहे. आत्मा आपल्या शुद्ध व पवित्रमय स्वभावात राहिला तर निश्चितच धर्ममय आहे. त्यासाठी आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.दान कार्यास सुरक्षित ठेवामदर टेरेसा, बाबा आमटे यांनी आपल्या कार्यातून दानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातून दीन-दु:खीतांची सेवा करण्यात मोठे पुण्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे दानाचेही महत्त्व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या सोबतच विश्वास, न्यायबुद्धी, दानशुरता, एकता, सावधानता, वास्तवता, समर्पण यांनाही सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.- प्रेमचंद बरडिया, निवृत्त प्राध्यापक