शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

धर्म रक्षण कर्त्याचेच होते रक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2018 22:04 IST

जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर्व कलेवर धर्म कला विजय प्राप्त करते. अशाच प्रकारे सर्व कथांना एक धर्म कथा विजय प्राप्त ...

जीवनात सुरक्षिततेला अनन्य साधारण महत्त्व आहे. त्या श्रृंखलेत धर्म कसा सुरक्षित राहील, हेदेखील महत्त्वाचे आहे. धर्मरक्षणाचे महत्त्व पाहता त्याचा उल्लेख ग्रंथांमध्येही आढळतो. त्यानुसार गौतमकुलक ग्रंथात म्हटले आहे की, ‘सव्व कला धम्म कला जिणाई’ अर्थात सर्व कलेवर धर्म कला विजय प्राप्त करते. अशाच प्रकारे सर्व कथांना एक धर्म कथा विजय प्राप्त करते, सर्व शक्तींवर धर्म शक्ती विजय मिळविते, संसाराच्या सर्व सुखांवर धर्म सुख विजय प्राप्त करते. या बाबत जैन धर्मियांचे चोवीसावे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी यांनी आपल्या अंतिम वाणीत उत्तराध्ययन सूत्राच्या अकराव्या अध्यायात म्हटले आहे की, ‘धर्मो रक्षती रक्षित:....’ अर्थात जो धर्माचे रक्षण करतो, त्याचे रक्षण होते. अशाच प्रकारे महाभारतात वेद व्यास यांनी म्हटले आहे की, ‘धर्म एवं हतो हन्ती, धर्म रक्षती रक्षित:...’याचा अर्थ आम्ही धर्मास सुरक्षित ठेवले तर तो आमचे संरक्षण करेल, अर्थात आम्ही धर्माचे रक्षण-पालन केले नाही तर तो आमचे अस्तित्त्व नष्ट करेल. यासाठी प्रत्येकाने धर्माच्या रहस्याला जाणावे, त्याला जीवनात उतरवावे आणि त्याचे प्रत्यक्ष संरक्षण करण्याचे प्रयत्न करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे.संसारात प्र्रत्येक व्यक्ती लहानात लहान सूक्ष्म वस्तूंपासून मोठ्या वस्तू, ज्या अध:पतनाकडे घेऊन जाणाऱ्या आहेत, त्यांना सुरक्षित ठेवत असतो. मात्र धर्म शाश्वत आहे, जीवनास उन्नत करणारा आहे, त्याला मात्र सुरक्षित ठेवत नाही.धर्म अशी वस्तू नाही की, जी कपाटात अथवा तिजोरीत सुरक्षित ठेवू शकतो. त्यासाठी धर्मास प्रत्यक्ष आचरणात आणायचे आहे, जीवनात उतरावयाचे आहे. जी व्यक्ती धर्मास आपल्या जीवनात उतरवत नाही, त्याचे रक्षण करीत नाही त्याचे जीवन निरर्थक आहे. पवित्रता, मदत, विश्वास, न्यायबुद्धी, औदार्य, एकता, दक्षता, वास्तविकता, समर्पण भावना इत्यादींच्या सुरक्षिततेसाठी धर्माच्या वेगेवगेळ््या व्याख्या आहेत.आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवाश्री कुंदकुंदाचार्यांनी धर्माची एक छोटीसी परिभाषा मांडताना म्हटले आहे की, आपला स्वभाव हाच धर्म आहे. ज्या प्रमाणे पाण्याचा स्वभाव शीतलता, अग्नीचा स्वभाव उष्णता, साखरेचा स्वभाव स्निग्धता, गोडपणा आणि मीठाचा स्वभाव खारटपणा आहे, त्याचप्रमाणे आत्म्याचा स्वभाव ज्ञान दर्शन आणि चारित्र्यमय आहे, सत्, चित आणि आनंदमय आहे. आत्मा आपल्या शुद्ध व पवित्रमय स्वभावात राहिला तर निश्चितच धर्ममय आहे. त्यासाठी आत्म्याच्या पवित्रतेस सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.दान कार्यास सुरक्षित ठेवामदर टेरेसा, बाबा आमटे यांनी आपल्या कार्यातून दानाचे महत्त्व पटवून दिले आहे. त्यातून दीन-दु:खीतांची सेवा करण्यात मोठे पुण्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे दानाचेही महत्त्व सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे. या सोबतच विश्वास, न्यायबुद्धी, दानशुरता, एकता, सावधानता, वास्तवता, समर्पण यांनाही सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.- प्रेमचंद बरडिया, निवृत्त प्राध्यापक