शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

दु:ख उगाळण्याची नव्हे गाळून घेण्याची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 00:51 IST

चाळीसगाव येथे रोटरी व्याख्यानमालेत डॉ.संजय उपाध्ये यांचे उद्बोधन

चाळीसगाव (जि.जळगाव) : जशी विनोदाची कारणे वेगळी असतात. त्याचप्रमाणे दु:खाकडे पहावे. तथापि, आपण दु:ख उगाळत राहतो आणि पुन्हा दु:खी होतो. प्रसन्नचित्त जगायचे असेल तर दु:ख गाळून घ्यायला शिका. इतरांना ‘तुमचं बरोबर आहे...’ असं म्हणा. हेच मन प्रसन्न करण्याचे सूत्र असल्याचे उद्बोधन डॉ.संजय उपाध्ये यांनी येथे केले.राजपूत लोकमंगल कार्यालयात रविवारी सायंकाळी रोटरी क्लब आॅफ चाळीसगाव आयोजित व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुंफताना त्यांनी श्रोत्यांशी संवादही साधला. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे.व्यासपीठावर डॉ.सुनील राजपूत, मनीष शहा, संग्रामसिंह शिंदे, डॉ.संदीप देशमुख, हिंमत पटेल, नीलेश कांकरिया, ब्रिजेश पाटील, कांतीलाल पटेल उपस्थित होते.डॉ.उपाध्ये यांनी मनाच्या अप्रसन्नतेची कारणे सांगून त्यावर उपाय सांगताना श्रोत्यांना खळखळून हसविले. टीव्ही मालिकांनी भारतीय कुटूंब व्यवस्थेचा पायाच खिळखिळा केला.मालिकांमधील गोंधळ दुर्जन विचारांना चालना देणारा आहे. मनोरंजनात ज्ञान आणि प्रबोधन हे दोन्ही घटक आवश्यक आहे. मात्र याचा विसर पडला आहे.माणसे अप्रसन्न का होतात? याची कारणे सांगताना उपाध्ये म्हणाले, मनासारखी माणसं न मिळणं, नात्यांमधील जिव्हाळा संपणे, प्रतिष्ठा मिरवणे, घरात शिरताना वेगवेगळ्या प्रश्नांचं भेंडोळ घेऊन येणे. यामुळे संवाद हरविला. एकोपा नाहीसा झाला. इंग्रजी भाषेच्या अट्टाहासाने शिक्षणातील गोडवा संपला आहे. भाषा जरुर बदला, पण त्यातील आशय मातीशी जोडणारा असावा. सुरुवातीला ‘मन करा रे प्रसन्न’ आणि शेवटी ‘झालं गेलं विसरुन जा’ या कविताही त्यांनी सामूहिक म्हणून घेतल्या. सूत्रसंचालन विजय गर्गे यांनी केले.कसे रहाल प्रसन्न?आयुष्य प्रसन्न करायचे असेल तर त्याचे सूत्र आहे. ते समाजावून सांगताना उपाध्ये म्हणाले, मी जिवंत आहे ५० टक्के, आतून आनंदी असणे २५ टक्के, आहे ते स्वीकारणे २० टक्के. असे ९५ टक्के प्रसन्न असणे आपल्याच हाती आहे. उरलेले पाच टक्के नशिब म्हणून सोडून द्या. तुमचं बरोबर आहे. आयुष्यभर विद्यार्थी म्हणून जगा. तुम्ही शिकवा. ही समर्पणाची वृत्ती ठेवा. कर्म करा. मीच एकटा शहाणा हे टाळून वयोवृद्धांचे अनुभव बोल ऐकावे, अशी मन प्रसन्न करण्याची क्लृप्तीही डॉ.उपाध्ये यांनी उलगडून दाखवली.आज अहिरे यांचे व्याख्यानसोमवारी वाल्मीक अहिरे यांचे 'अहाणा, उखाणा, हासू फुटाण... घाट्यावरला गाना.. ना... ना.. तर्हाना' यावर व्याख्यान होणार आहे.