शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
4
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
5
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
6
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
7
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
8
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
9
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
10
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
11
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
12
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
13
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
14
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
15
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
16
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
17
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
18
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
19
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
20
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...

सततच्या वाचनातून लिहिते झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:51 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत कथाकार अश्विनी करंके...

सन २००० साली पदवी घेऊन कॉलेज सोडलं, पण वाचनात खंड पडू दिला नाही. त्यातच २००३ साली माझ्या मिस्टरांचा लेख नियतकालिकात झळकला. तेव्हापासून मी थोडा लिखाणाचा प्रयत्न सुरू केला. ‘हुंडा’ या सामाजिक विषयावर एक लेख लिहिला. मात्र तो व्यवस्थित मांडलाय की नाही हे माझं मलाच कळत नव्हतं. मी घाबरत-घाबरतच लेख मिस्टरांना दाखविला. त्यांनी तो वाचून त्यातील थोडी शब्दरचना स्वत: करून लिखाणासाठी प्रोत्साहीत केलं. त्यानंतर गावातील वाचनालयातून पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली. त्यात कादंबरी, कथासंग्रह होते. मला वाचनाची आवड तर होती, पण पुढे-पुढे नियमित विविध पुस्तके उपलब्ध होत असल्याने वाचनात विविधता आणली. यातच सन २००५ उजाडले आणि मिस्टरांनी लिखाणासाठी प्रयत्न करण्याविषयी सांगितलं. आधी तर मनात भीती होती की, मी लिखाण करू शकेन का? पण त्यांनी प्रोत्साहन दिलं की, तू लिहू शकतेस, प्रयत्न करून बघ. मी तुझ्यासोबत आहेच.’ मग काय? सतत चार महिने फक्त डोक्यात आलेले विचार माझ्या शब्दात कागदावर उतरविले. लेखणी चालत होती, शब्द उमटत होते, कागदं भरत होती. पण विषयाला धरुन हवं तसं लिखाण मात्र होत नव्हतं. एका विषयाला धरुन त्यात कथानक साकारण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातच एक मनासारखा विषय मिळाला. निपुत्रिक असणाऱ्याला समाज कसा वागवतो? आणि मग पहिली कथा साकारली ‘दत्तक’. तोवर दिवाळी अंक कथा स्पर्धा जाहीर झालेली होती. मी ती कथा स्पर्धेसाठी पाठवली. माझी पहिलीच कथा द्वितीय पारितोषिक प्राप्त म्हणून प्रसिद्ध झाली. वाचकांना विषय आणि मांडणी खूपच आवडली. अनेक वाचकांनी दूरध्वनी तसेच पत्रव्यवहारच्या माध्यमातून माझ्या कथेचं कौतुक केलं. यातून प्रोत्साहन मिळत गेलं. नवीन काही तरी करण्याची ऊर्जा या प्रोत्साहनाच्या माध्यमातून मिळत गेली. त्यानंतर मात्र लिखाणाची गोडी लागली. विविध विषयांकडे मी चौकस दृष्टीने पाहून स्थानिक, ग्रामीण, सामाजिक विषयावर लिखाण सुरू केलं. आज माझ्या अनेक कथांना विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे लिखाण असंच सुरू रहावं, अशी इच्छा आहे. कारण यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रोत्साहन मिळतं. यापेक्षा आणखी दुसरं काही पाहिजे?-अश्विनी करंके, मलोणी, ता.शहादा, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार