शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

सततच्या वाचनातून लिहिते झाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 01:51 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात लिहिताहेत कथाकार अश्विनी करंके...

सन २००० साली पदवी घेऊन कॉलेज सोडलं, पण वाचनात खंड पडू दिला नाही. त्यातच २००३ साली माझ्या मिस्टरांचा लेख नियतकालिकात झळकला. तेव्हापासून मी थोडा लिखाणाचा प्रयत्न सुरू केला. ‘हुंडा’ या सामाजिक विषयावर एक लेख लिहिला. मात्र तो व्यवस्थित मांडलाय की नाही हे माझं मलाच कळत नव्हतं. मी घाबरत-घाबरतच लेख मिस्टरांना दाखविला. त्यांनी तो वाचून त्यातील थोडी शब्दरचना स्वत: करून लिखाणासाठी प्रोत्साहीत केलं. त्यानंतर गावातील वाचनालयातून पुस्तकं वाचायला उपलब्ध करून दिली. त्यात कादंबरी, कथासंग्रह होते. मला वाचनाची आवड तर होती, पण पुढे-पुढे नियमित विविध पुस्तके उपलब्ध होत असल्याने वाचनात विविधता आणली. यातच सन २००५ उजाडले आणि मिस्टरांनी लिखाणासाठी प्रयत्न करण्याविषयी सांगितलं. आधी तर मनात भीती होती की, मी लिखाण करू शकेन का? पण त्यांनी प्रोत्साहन दिलं की, तू लिहू शकतेस, प्रयत्न करून बघ. मी तुझ्यासोबत आहेच.’ मग काय? सतत चार महिने फक्त डोक्यात आलेले विचार माझ्या शब्दात कागदावर उतरविले. लेखणी चालत होती, शब्द उमटत होते, कागदं भरत होती. पण विषयाला धरुन हवं तसं लिखाण मात्र होत नव्हतं. एका विषयाला धरुन त्यात कथानक साकारण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातच एक मनासारखा विषय मिळाला. निपुत्रिक असणाऱ्याला समाज कसा वागवतो? आणि मग पहिली कथा साकारली ‘दत्तक’. तोवर दिवाळी अंक कथा स्पर्धा जाहीर झालेली होती. मी ती कथा स्पर्धेसाठी पाठवली. माझी पहिलीच कथा द्वितीय पारितोषिक प्राप्त म्हणून प्रसिद्ध झाली. वाचकांना विषय आणि मांडणी खूपच आवडली. अनेक वाचकांनी दूरध्वनी तसेच पत्रव्यवहारच्या माध्यमातून माझ्या कथेचं कौतुक केलं. यातून प्रोत्साहन मिळत गेलं. नवीन काही तरी करण्याची ऊर्जा या प्रोत्साहनाच्या माध्यमातून मिळत गेली. त्यानंतर मात्र लिखाणाची गोडी लागली. विविध विषयांकडे मी चौकस दृष्टीने पाहून स्थानिक, ग्रामीण, सामाजिक विषयावर लिखाण सुरू केलं. आज माझ्या अनेक कथांना विविध स्पर्धांमध्ये पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे लिखाण असंच सुरू रहावं, अशी इच्छा आहे. कारण यातून सकारात्मक ऊर्जा मिळते. प्रोत्साहन मिळतं. यापेक्षा आणखी दुसरं काही पाहिजे?-अश्विनी करंके, मलोणी, ता.शहादा, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यnandurbar-pcनंदुरबार