शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

मनुष्यबळाचा मुद्दा रुग्णांच्या जिवाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : ज्या पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे रूप पालटले होते. त्याच जोरात याठिकाणी अगदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : ज्या पद्धतीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे रूप पालटले होते. त्याच जोरात याठिकाणी अगदी पंधराच दिवसांत अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. मनुष्यबळच नसल्याने जागा असूनही त्याचा वापर होत नाहीय व गंभीर रुग्णांनाही थेट परत जावे लागत आहे. यातून प्रशासकीय नियोजनाचा अभाव समोर आला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात गेल्या आठ दिवसांमध्ये तीसपेक्षा अधिक डॉक्टर व अन्य कर्मचारी २० ते २२, अशा प्रकारे ५० पेक्षा अधिक जण बाधित आढळून आले आहेत. आधीच कोविड, नॉनकोविडची कसरत सुरू असताना व मनुष्यबाळ विभागले गेले असताना, अशा स्थितीत कोविडचे रुग्ण हाताळणार कसे? असा गंभीर प्रश्न यंत्रणेसमोर उभा आहे.

किमान तीन दिवस वेगळे राहावे लागेल

जे डॉक्टर सद्य:स्थितीत कोविड रुग्णांवर उपचार करीत आहेत. त्यांना आठवड्यातून किमान तीन दिवस तरी सुटी द्यावीच लागणार आहे; अन्यथा व्हायरल लोडमुळे तेही बाधित होतील, आणि मग उपचार करणार कोण? असा गंभीर प्रश्न याठिकाणी निर्माण होणार आहे. आधी हे रोटेशन ७ दिवसांचे होते. मात्र, मनुष्यबळच नसल्याने ते घटवून ३ दिवसांचे करण्यात आले आहे. ही बाब डॉक्टरांच्या आरोग्यासाठीही घातक असल्याचे मत काही तज्ज्ञ व्यक्त करतात. त्यामुळे तातडीने याठिकाणी मनुष्यबळाचे नियोजन होणे अत्यावश्यक असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

गेल्या वर्षी काय?

गेल्या वर्षीही रुग्णांची फरपट झाली होती, सामान्य रुग्णांना कोणीच दाद देत नव्हते, काही रुग्णांचा यात मृत्यू झाला होता. त्यावेळी खासगी रुग्णालयांना रुग्णांना दाखल करून घेणे बंधनकारक केले होते. तक्रार निवारण्यासाठी वॉररूम उघडण्यात आली होती. वर्षभराच्या कालावधीने पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना राबविणे गरजेचे बनले आहे.