शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:44 IST

पाणी प्रश्नांसंदर्भात बैठक

ठळक मुद्देपाणी आवर्तनाची पूर्तता होईनाआंदोलन नाही, कॅनॉलच तोडणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- जिल्ह्यात पाण्याचे आवर्तन सोडण्याची पूर्तता तर होत नाही व पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर दुरावस्था झालेल्या चा:यांमुळे बहुतांश पाणी वायाच जाते. यास   जलसंपदा विभागाचा नियोजन शून्य कारभार कारणीभूत असून जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टीका शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी बुधवारी केली. पाचोरा-भडगाव तालुक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला  आमदार  किशोर पाटील हेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गिरणा धरणातून दोन आवर्तन सोडण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात यापूर्वी तीन-तीन वेळा आवर्तन सोडले जात होते. त्यामुळे पाचोरा-भडगाव परीसरातील शेतक:यांना शेतीला पाणी मिळत होते. त्यात आता कापसावरील बोंडअळीमुळे कृषी विभागाने कापूस उपटून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेतक:याला फरदडही घेता येत नाही. अशात पाणी आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचा गलथान कारभार असून दोनच आवर्तन सोडणार असल्याने 50 टक्के शेतक:यांनी अर्जच भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. पाचोरा-भडगाव परिसरात कालव्यांचीदेखील दुरूस्ती झालेली  नसून चा:यांनाही गळती लागली  असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जलसंपदा विभागाची ऐपत नसेल तर आमदार निधीतून या चारी दुरूस्त करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे ते म्हणाले.  त्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. बहुळा धरण ज्यावेळी बांधले गेले त्यावेळी त्याच्यावर धरण नव्हते. मात्र आता बहुळा धरणाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. नवीन कामांचे सोडा पण  जिल्ह्यात जे जुने प्रकल्प आहेत ते तरी पूर्णत्वास नेले पाहीजे असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. आवर्तन सोडूनही शेतक:याला यंदा रब्बी पीक घेता येणार नसल्याचे ते म्हणाले.  जलसंपदा खात्याचे मंत्री आपल्याच जिल्ह्याचे असूनही अशी दुरवस्था का, असा प्रश्न आमदार पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, मी त्यांच्याबद्दल नाही जलसंपदा विभागाबाबत बोलत आहे, असे सांगून त्यांनी राज्याचा जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टिका शेवटी केली.  

आंदोलन नाही, कॅनॉलच तोडणारपाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण आंदोलन, उपोषण वैगेरे काही करणार नाहीतर थेट कॅनॉल तोडू, असा इशारा आमदार पाटील यांनी या वेळी दिला.