शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:44 IST

पाणी प्रश्नांसंदर्भात बैठक

ठळक मुद्देपाणी आवर्तनाची पूर्तता होईनाआंदोलन नाही, कॅनॉलच तोडणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- जिल्ह्यात पाण्याचे आवर्तन सोडण्याची पूर्तता तर होत नाही व पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर दुरावस्था झालेल्या चा:यांमुळे बहुतांश पाणी वायाच जाते. यास   जलसंपदा विभागाचा नियोजन शून्य कारभार कारणीभूत असून जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टीका शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी बुधवारी केली. पाचोरा-भडगाव तालुक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला  आमदार  किशोर पाटील हेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गिरणा धरणातून दोन आवर्तन सोडण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात यापूर्वी तीन-तीन वेळा आवर्तन सोडले जात होते. त्यामुळे पाचोरा-भडगाव परीसरातील शेतक:यांना शेतीला पाणी मिळत होते. त्यात आता कापसावरील बोंडअळीमुळे कृषी विभागाने कापूस उपटून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेतक:याला फरदडही घेता येत नाही. अशात पाणी आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचा गलथान कारभार असून दोनच आवर्तन सोडणार असल्याने 50 टक्के शेतक:यांनी अर्जच भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. पाचोरा-भडगाव परिसरात कालव्यांचीदेखील दुरूस्ती झालेली  नसून चा:यांनाही गळती लागली  असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जलसंपदा विभागाची ऐपत नसेल तर आमदार निधीतून या चारी दुरूस्त करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे ते म्हणाले.  त्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. बहुळा धरण ज्यावेळी बांधले गेले त्यावेळी त्याच्यावर धरण नव्हते. मात्र आता बहुळा धरणाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. नवीन कामांचे सोडा पण  जिल्ह्यात जे जुने प्रकल्प आहेत ते तरी पूर्णत्वास नेले पाहीजे असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. आवर्तन सोडूनही शेतक:याला यंदा रब्बी पीक घेता येणार नसल्याचे ते म्हणाले.  जलसंपदा खात्याचे मंत्री आपल्याच जिल्ह्याचे असूनही अशी दुरवस्था का, असा प्रश्न आमदार पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, मी त्यांच्याबद्दल नाही जलसंपदा विभागाबाबत बोलत आहे, असे सांगून त्यांनी राज्याचा जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टिका शेवटी केली.  

आंदोलन नाही, कॅनॉलच तोडणारपाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण आंदोलन, उपोषण वैगेरे काही करणार नाहीतर थेट कॅनॉल तोडू, असा इशारा आमदार पाटील यांनी या वेळी दिला.