शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

जलसंपदा विभाग म्हणजे ‘अंधेर नगरी चौपट राजा’ - शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 12:44 IST

पाणी प्रश्नांसंदर्भात बैठक

ठळक मुद्देपाणी आवर्तनाची पूर्तता होईनाआंदोलन नाही, कॅनॉलच तोडणार

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28- जिल्ह्यात पाण्याचे आवर्तन सोडण्याची पूर्तता तर होत नाही व पाण्याचे आवर्तन सोडल्यानंतर दुरावस्था झालेल्या चा:यांमुळे बहुतांश पाणी वायाच जाते. यास   जलसंपदा विभागाचा नियोजन शून्य कारभार कारणीभूत असून जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टीका शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी बुधवारी केली. पाचोरा-भडगाव तालुक्यातील पाणी प्रश्नांसंदर्भात आज जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला  आमदार  किशोर पाटील हेदेखील उपस्थित होते. बैठकीनंतर आमदार पाटील यांनी पत्रकारांना माहिती देताना सांगितले की, गिरणा धरणातून दोन आवर्तन सोडण्यासंदर्भात कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला होता. प्रत्यक्षात यापूर्वी तीन-तीन वेळा आवर्तन सोडले जात होते. त्यामुळे पाचोरा-भडगाव परीसरातील शेतक:यांना शेतीला पाणी मिळत होते. त्यात आता कापसावरील बोंडअळीमुळे कृषी विभागाने कापूस उपटून टाकण्याचा सल्ला दिला. त्यामुळे शेतक:याला फरदडही घेता येत नाही. अशात पाणी आवर्तन सोडण्याबाबत जलसंपदा विभागाचा गलथान कारभार असून दोनच आवर्तन सोडणार असल्याने 50 टक्के शेतक:यांनी अर्जच भरले नसल्याचे त्यांनी सांगितले. पाचोरा-भडगाव परिसरात कालव्यांचीदेखील दुरूस्ती झालेली  नसून चा:यांनाही गळती लागली  असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जलसंपदा विभागाची ऐपत नसेल तर आमदार निधीतून या चारी दुरूस्त करण्यासाठी परवानगी मागितली असल्याचे ते म्हणाले.  त्यासाठी प्रस्ताव तयार केला जाणार असल्याचेही ते म्हणाले. बहुळा धरण ज्यावेळी बांधले गेले त्यावेळी त्याच्यावर धरण नव्हते. मात्र आता बहुळा धरणाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. नवीन कामांचे सोडा पण  जिल्ह्यात जे जुने प्रकल्प आहेत ते तरी पूर्णत्वास नेले पाहीजे असा टोलाही आमदार पाटील यांनी लगावला. आवर्तन सोडूनही शेतक:याला यंदा रब्बी पीक घेता येणार नसल्याचे ते म्हणाले.  जलसंपदा खात्याचे मंत्री आपल्याच जिल्ह्याचे असूनही अशी दुरवस्था का, असा प्रश्न आमदार पाटील यांना विचारला असता ते म्हणाले, मी त्यांच्याबद्दल नाही जलसंपदा विभागाबाबत बोलत आहे, असे सांगून त्यांनी राज्याचा जलसंपदा विभाग म्हणजे अंधेर नगरी, चौपट राजा असल्याची टिका शेवटी केली.  

आंदोलन नाही, कॅनॉलच तोडणारपाणी प्रश्न मार्गी लागला नाही तर आपण आंदोलन, उपोषण वैगेरे काही करणार नाहीतर थेट कॅनॉल तोडू, असा इशारा आमदार पाटील यांनी या वेळी दिला.