शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ग्रामीण भागातील रस्त्यांवर काटेरी झुडपांमुळे अपघातांना निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2020 15:01 IST

ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना काटेरी झाडेझझुडपांनी चांगलाच विळखा घातल्याने काटे लागून एसटी बसमधील प्रवासी जखमी होत आहे.

ठळक मुद्देएसटी बसमधील प्रवाशांना होते दुखापतसार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

अमळनेर : तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना काटेरी झाडेझझुडपांनी चांगलाच विळखा घातल्याने काटे लागून एसटी बसमधील प्रवासी जखमी होत आहे. अनेक गावांच्या रस्त्यावर दुचाकी व इतर वाहनांचे अपघातदेखील होत आहेत.सार्वजनिक बांधकाम विभागाची ही जबाबदारी असताना या विभागाचे याकडे सोईस्कर दुर्लक्ष होत आहे. विशेष म्हणजे विद्यमान आमदारांचे गाव असलेल्या दोधवद हिंगोना रस्त्यावरदेखील अशीच परिस्थिती आहे. याशिवाय कलाली, निम, तांदळी, कळमसरे परिसर, मुडी मांडळ परिसर, मंगरूळ परिसर, फाफोरे परिसर, पातोंडा व टाकरखेडा परिसर आदी गावांकडील रस्त्यांवर हेच चित्र असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.ग्रामीण भागात आताच एस टी बस सुरू झाल्या आहेत. प्रवास करताना एसटीच्या खिडक्या उघड्या राहत असल्याने वाटेत अचानक काटेरी बाभूळ आले असता, ते खिडकीतून आत घुसून अनेक प्रवाशांना डोळ्यांना अथवा चेहऱ्याला इजा होत असते. विशेष करून बालके खिडकीतच बसत असल्याने ते यात जखमी होत असतात. यामुळे संतप्त भावना व्यक्त होत आहे.याशिवाय अनेक गावांच्या रस्त्यावर वळणे असून याठिकाणीच ही काटेरी झुडपे वाढली असल्याने समोरून येणारी वाहने दिसत नाहीत. यामुळे दुचाकी व इतर वाहने एकमेकांना धडकून अपघात होत असतात. काही दिवसांपूर्वी मारवड बोहरा रस्त्यावरदेखील झाडे झुडपांमुळे दुचाकीस्वारांचे दोन अपघात झाले होते. यात दोन जण गंभीर जखमी झाल्याने ते अनेक दिवस खाजगी रुग्णालयात दाखल होते. यामुळे ग्रामस्थांची ओरड होऊनदेखील संबंधित विभागाने झाडे झुडपे काढली नाहीत. अखेर बोहरा ग्रा.पं.चे पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी स्वखर्चाने ही झाडे झुडपे काढली होती.

बांधकाम विभागास दिल्या स्पष्ट सूचना-आ.अनिल पाटीलअमळनेर तालुका व परिसरात अनेक गावांच्या रस्त्यालगत काटेरी झाडे झुडपे वाढल्याचे मी स्वतः पाहिले असून यासंदर्भात अनेक गावातून तक्रारीदेखील माझ्याकडे प्राप्त झाल्या आहेत,यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागास झाडे झुडपे काढण्याबाबत आधीच पत्र दिले आहे. अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष तशा सूचनादेखील केल्या आहेत.-आमदार अनिल पाटील, अमळनेर

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाAmalnerअमळनेर