शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

दोन वर्षानंतर होणार 'आविष्कार' संशोधन स्पर्धा; १८ ऑक्टोंबरला जिल्हास्तरीय स्पर्धा, स्वतंत्र पोर्टलची निर्मिती....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2022 16:00 IST

विद्यार्थीदशेत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यपालांनी दरवर्षी विद्यापीठ स्तरावर व त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धा सुरू केलेली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्यावतीने दि. १८ ऑक्टोबर रोजी जिल्हास्तरीय अविष्कार संशोधन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षापासून ही संशोधन स्पर्धा होवू शकली नव्हती.

विद्यार्थीदशेत संशोधनाची आवड निर्माण व्हावी यासाठी राज्यपालांनी दरवर्षी विद्यापीठ स्तरावर व त्यानंतर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर अविष्कार संशोधन स्पर्धा सुरू केलेली आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने यंदा १८ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी जळगाव,धुळे व नंदुरबार या तिन्ही जिल्ह्यांसाठी त्या त्या जिल्ह्यात ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यानंतर २० ऑक्टोबर रोजी विद्यापीठातील प्रशाळांसाठी ही संशोधन स्पर्धा होईल. जिल्हा स्तरावरील अविष्कार स्पर्धा झाल्यांनतर त्यातील विजेत्यांची स्पर्धा ११ व १२ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

विषय निहाय सहा गट...या स्पर्धेत विषय निहाय सहा गट करण्यात आले आहेत. त्यामध्ये पहिल्या गटात सामाजिकशास्त्र, शिक्षण, भाषा, मानव्यविद्या, ललित कला, दुसऱ्या गटात वाणिज्य, व्यवस्थापन आणि विधी, तिसऱ्या गटात विज्ञान ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जैवशास्त्र, गणित, पर्यावरणशास्त्र, गृह आणि संगणशास्त्र, चौथ्या गटात कृषी आणि पशुसंवर्धन, पाचव्या गटात. अभियांत्रिकी व तंत्रज्ञान, व सहाव्या गटात औषधिनिर्माणशास्त्र यांचा समोवश आहे.  ही स्पर्धा पदवी, पदव्युत्तर, पदव्युत्तरपदवी आणि शिक्षक या चार संवर्गात होणार आहे.

१५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले...जिल्हा स्तरावर होणाऱ्या स्पर्धेचे संयोजकत्व स्विकारण्यासाठी महाविद्यालयांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. १५ सप्टेंबर पर्यंत महाविद्यालयांनी हे प्रस्ताव सादर करावयाचे आहेत.

८ ऑक्टोंबरपर्यंत नाव नोंदणी करावी लागणारया स्पर्धेसाठी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अविष्कार या नावाने स्वतंत्र पोर्टल तयार करण्यात आले आहे. या पोर्टलवर स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १० सप्टेंबरपासून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. ८ ऑक्टोबर पर्यंत विद्यार्थ्यांना नाव नोंदणी व शुल्क भरता येईल, अशी माहिती स्पर्धेचे समन्वयक व संगणकशास्त्र प्रशाळेचे संचालक प्रा. सतीष कोल्हे, पदार्थ विज्ञान विभागाप्रमुख प्रा. जयदीप साळी व विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा. सुनील कुलकर्णी यांनी केले आहे.