शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
2
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
3
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
4
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
5
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
6
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
7
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
8
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
9
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
10
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
11
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
12
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
14
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
15
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
16
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
17
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
18
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
19
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
20
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे

पोलीस दलातील अंतर्गत राजकारण उठले जीवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST

जळगाव : पोलीस दल हे शिस्तीचे खाते मानले जाते. त्यामुळे राज्यात सर्वच विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटना असताना पोलीस दल ...

जळगाव : पोलीस दल हे शिस्तीचे खाते मानले जाते. त्यामुळे राज्यात सर्वच विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटना असताना पोलीस दल त्याला अपवाद आहे. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांना या ब्रीद वाक्याचा विसर पडलेला दिसतो. आपल्याच खात्यातील लोकांना ठेचण्याचे कार्य सुरू झाल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत हे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. या शाखेत सेनापती बदलतो, मात्र प्यादे तेच राहतात. त्यामुळे अंतर्गत राजकारणाला अधिक खतपाणी घातले जाते. सध्या नरेंद्र पाटील (वारुळे) यांच्यावर अश्लील संदेश पाठविल्याचा आरोप आहे, त्यात त्यांना अटक झालेली आहे. प्रथमदर्शी पुराव्यावरून वारुळे यांना अटक झाली असे तपासाधिकारी सांगतात, तपासात पुढे काय निष्पन्न होते हे येणारा काळ सांगेलच. दोषी असतील तर त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. याआधी देखील अनेक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्यातील काहींना निलंबित करण्यात आले आहे तर काहींना बडतर्फ. आधीच्या घटनांवर नजर टाकली तर वर्चस्वावरून अंतर्गत गटबाजी हेच कारण पुढे आलेले आहे. त्यातही या गटबाजीला अर्थकारण हेच कारण आहे. त्याशिवाय एकाच जागेवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी कायम राहिली आहे. यावेळी काही प्रमाणात ती मोडण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केला असला तरी अजूनही ती पूर्णपणे मोडीत निघालेली नाही.

निनावी अर्जाचा शस्त्र म्हणून वापर

एकमेकांचा काटा काढण्यासाठी निनावी अर्ज हे एक मोठे शस्त्र कर्मचाऱ्यांकडून वापरले जाते. खास करून स्थानिक गुन्हे शाखेच्याबाबतीतच हा प्रकार घडतो. बदली प्रक्रियेच्या काळात तर त्याला पेवच फुटते. पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व महासंचालक स्तरावर असे अर्ज यापूर्वी झालेले आहेत. आतादेखील निनावी अर्जाची चर्चा आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांनी खातरजमा न करता त्यावर निर्णय घेतल्याची उदहारणे आहेत. अर्जात तथ्य असेल तर कारवाई झालीच पाहिजे, मात्र नाहक कोणाचा काटा काढण्याचा एखाद्याचा हेतू असेल तर तेदेखील चुकीचे आहे. गेल्या काही वर्षाच्या काळात अनेकांवर अन्याय झालेला आहे.

एसीबीचा वापर करून संपविले

गेल्या दोन वर्षात एसीबीचा वापर करून पोलिसांनीच पोलिसांना संपविल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भलेही तक्रारदार दुसरा असेल मात्र त्यामागचा बोलावता धनी हा पोलीसच निघालेला आहे. अवैध धंदेचालक व पोलीस यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. जो मुळात अवैध धंदे करतो, तोच एसीबीकडे तक्रार कशी करू शकतो, हे सर्वसामान्यांना कळतं तर पोलिसांना कळत नसावे का?