शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariffs: 'चीनवरील टॅरिफ कमी करण्यास तयार, कारण...'; डोनाल्ड ट्रम्प यांची अचानक नरमाईची भूमिका
2
Video: चीनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
3
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...
4
"२ वर्ष अख्खं जग थांबलं होतं तेव्हा माझं घर यांच्यामुळे चाललं", प्रसाद ओकने कोणाला दिलं श्रेय?
5
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
6
'पाकिस्तान भारताविरुद्ध ४ दिवसही टीकू शकत नाही, कराची अन् लाहोरमध्ये गुरुकुल उघडणार'; बाबा रामदेव यांनी सुनावले
7
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
8
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
9
...म्हणून बाबिलने अर्जुन कपूर, अनन्या पांडेचं नाव घेतलं; अभिनेत्याच्या 'त्या' व्हिडिओनंतर टीमकडून स्पष्टीकरण
10
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
11
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
12
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
13
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
14
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
15
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
16
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
17
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
18
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
19
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
20
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 

पोलीस दलातील अंतर्गत राजकारण उठले जीवावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:20 IST

जळगाव : पोलीस दल हे शिस्तीचे खाते मानले जाते. त्यामुळे राज्यात सर्वच विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटना असताना पोलीस दल ...

जळगाव : पोलीस दल हे शिस्तीचे खाते मानले जाते. त्यामुळे राज्यात सर्वच विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या संघटना असताना पोलीस दल त्याला अपवाद आहे. ‘सदरक्षणाय, खलनिग्रहणाय...’ असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेवून ‘खल’वृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे; परंतु गेल्या काही वर्षांत पोलिसांना या ब्रीद वाक्याचा विसर पडलेला दिसतो. आपल्याच खात्यातील लोकांना ठेचण्याचे कार्य सुरू झाल्याचे काही घटनांवरून दिसून येत आहे.

स्थानिक गुन्हे शाखेत हे राजकारण मोठ्या प्रमाणात आहे. या शाखेत सेनापती बदलतो, मात्र प्यादे तेच राहतात. त्यामुळे अंतर्गत राजकारणाला अधिक खतपाणी घातले जाते. सध्या नरेंद्र पाटील (वारुळे) यांच्यावर अश्लील संदेश पाठविल्याचा आरोप आहे, त्यात त्यांना अटक झालेली आहे. प्रथमदर्शी पुराव्यावरून वारुळे यांना अटक झाली असे तपासाधिकारी सांगतात, तपासात पुढे काय निष्पन्न होते हे येणारा काळ सांगेलच. दोषी असतील तर त्याचे समर्थन कोणीच करणार नाही. याआधी देखील अनेक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. गुन्ह्याचे स्वरूप पाहता त्यातील काहींना निलंबित करण्यात आले आहे तर काहींना बडतर्फ. आधीच्या घटनांवर नजर टाकली तर वर्चस्वावरून अंतर्गत गटबाजी हेच कारण पुढे आलेले आहे. त्यातही या गटबाजीला अर्थकारण हेच कारण आहे. त्याशिवाय एकाच जागेवर वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची मक्तेदारी कायम राहिली आहे. यावेळी काही प्रमाणात ती मोडण्याचा प्रयत्न पोलीस अधीक्षकांनी केला असला तरी अजूनही ती पूर्णपणे मोडीत निघालेली नाही.

निनावी अर्जाचा शस्त्र म्हणून वापर

एकमेकांचा काटा काढण्यासाठी निनावी अर्ज हे एक मोठे शस्त्र कर्मचाऱ्यांकडून वापरले जाते. खास करून स्थानिक गुन्हे शाखेच्याबाबतीतच हा प्रकार घडतो. बदली प्रक्रियेच्या काळात तर त्याला पेवच फुटते. पोलीस अधीक्षक, विशेष पोलीस महानिरीक्षक व महासंचालक स्तरावर असे अर्ज यापूर्वी झालेले आहेत. आतादेखील निनावी अर्जाची चर्चा आहे. बऱ्याच अधिकाऱ्यांनी खातरजमा न करता त्यावर निर्णय घेतल्याची उदहारणे आहेत. अर्जात तथ्य असेल तर कारवाई झालीच पाहिजे, मात्र नाहक कोणाचा काटा काढण्याचा एखाद्याचा हेतू असेल तर तेदेखील चुकीचे आहे. गेल्या काही वर्षाच्या काळात अनेकांवर अन्याय झालेला आहे.

एसीबीचा वापर करून संपविले

गेल्या दोन वर्षात एसीबीचा वापर करून पोलिसांनीच पोलिसांना संपविल्याच्या घटना घडलेल्या आहेत. भलेही तक्रारदार दुसरा असेल मात्र त्यामागचा बोलावता धनी हा पोलीसच निघालेला आहे. अवैध धंदेचालक व पोलीस यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. जो मुळात अवैध धंदे करतो, तोच एसीबीकडे तक्रार कशी करू शकतो, हे सर्वसामान्यांना कळतं तर पोलिसांना कळत नसावे का?