शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

सुसंवाद आणि समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:55 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘जगण्याचे अंतरंग’ या सदरात लिहिताहेत प्रा.विनायक त्र्यंबक पाटील.

आपण स्वत:ला अशाच कार्यात गुंतवून घेतले पाहिजे की, जेथे आपली प्रवृत्ती, चित्त आणि बुद्धी एक समन्वयाने कार्यरत असेल. असे कार्य कोणते? आपण आपल्या समोर वेळोवेळी ठेवलेले ध्येय आपले ध्येय आपणच ठरवायला हवे. इतर कुणी सांगतात म्हणून जे ध्येय ठरवले तर ते चुकीचे होईल. एक तर ते लादलेले होईल. ते साध्य करताना आपले चित्त बंडखोरी करायचा निश्चित प्रयत्न करेल.आपण आपले ध्येय ठरविले म्हणजे ते आपणाला हवे असते. ते साध्य झाल्यावर त्यापासून आपणाला समाधान मिळणार असते. आनंदाची प्राप्ती होणार असते. असे ध्येय साध्य झाले नाहीतरी साध्य करण्याच्या प्रयत्नात केले यातही आनंद मिळतो. याचा अर्थ नाही की आपण असाध्य किंवा कधीच पूर्ण होणार नाही असे ध्येय ठेवावे.ध्येय असे ठेवा जे प्रयत्न साध्य आहे. असाध्य ध्येय ठेवल्याने शेवटी दमछाक होऊन, निराश होण्याची वेळ येऊ शकते. निराश होणे म्हणजे दु:ख प्राप्ती. दु:ख झाले म्हणजे आपल्या आयुष्याचा नाश. तेव्हा प्रयत्न साध्य ध्येय असू द्या. त्या ध्येय प्राप्तीचा मार्ग ठरवा. त्या मार्गावर चालताना छोटे छोटे टप्पे ठरवा. असे टप्पे ठरविल्याने अंती आपला फायदाच होतो. एक टप्पा गाठल्याचे समाधान मिळते आणि त्याचवेळी पुढील टप्पा आपणास खुणावत राहील. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.याचवेळी हेही लक्षात ठेवा ध्येय ठरवताना ते अल्प प्रयत्नाने साध्य असेल असे ध्येय ठेवू नका. नाही तर होते असे की, असे ध्येय प्राप्त केल्यावर त्यापुढे ध्येय नसेल तर आपण तेवढ्याच ध्येय प्राप्तीच्या आनंदात वाहून जावू. आपले मन पुन्हा स्वैर होईल. स्वैर मनाच्या अपेक्षा पूर्ण करायला तुमच्या प्रवृत्ती कामाला लागतील आणि तुम्ही बुद्धीचा वापर थांबवाल. तुम्ही भरकटून जावून भान हरवून बसाल. याचा अर्थ असा आहे की, आपले ध्येय ठरवताना ते प्रयत्न साध्य असेलच पण त्यासाठी दीर्घावधी प्रयत्नांची गरज असेल.- प्रा.विनायक त्र्यंबक पाटील