शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
3
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
4
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
6
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
7
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
8
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
9
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
10
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
11
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
12
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
13
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
14
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
15
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
16
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
17
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
18
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
19
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
20
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग

सुसंवाद आणि समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:55 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘जगण्याचे अंतरंग’ या सदरात लिहिताहेत प्रा.विनायक त्र्यंबक पाटील.

आपण स्वत:ला अशाच कार्यात गुंतवून घेतले पाहिजे की, जेथे आपली प्रवृत्ती, चित्त आणि बुद्धी एक समन्वयाने कार्यरत असेल. असे कार्य कोणते? आपण आपल्या समोर वेळोवेळी ठेवलेले ध्येय आपले ध्येय आपणच ठरवायला हवे. इतर कुणी सांगतात म्हणून जे ध्येय ठरवले तर ते चुकीचे होईल. एक तर ते लादलेले होईल. ते साध्य करताना आपले चित्त बंडखोरी करायचा निश्चित प्रयत्न करेल.आपण आपले ध्येय ठरविले म्हणजे ते आपणाला हवे असते. ते साध्य झाल्यावर त्यापासून आपणाला समाधान मिळणार असते. आनंदाची प्राप्ती होणार असते. असे ध्येय साध्य झाले नाहीतरी साध्य करण्याच्या प्रयत्नात केले यातही आनंद मिळतो. याचा अर्थ नाही की आपण असाध्य किंवा कधीच पूर्ण होणार नाही असे ध्येय ठेवावे.ध्येय असे ठेवा जे प्रयत्न साध्य आहे. असाध्य ध्येय ठेवल्याने शेवटी दमछाक होऊन, निराश होण्याची वेळ येऊ शकते. निराश होणे म्हणजे दु:ख प्राप्ती. दु:ख झाले म्हणजे आपल्या आयुष्याचा नाश. तेव्हा प्रयत्न साध्य ध्येय असू द्या. त्या ध्येय प्राप्तीचा मार्ग ठरवा. त्या मार्गावर चालताना छोटे छोटे टप्पे ठरवा. असे टप्पे ठरविल्याने अंती आपला फायदाच होतो. एक टप्पा गाठल्याचे समाधान मिळते आणि त्याचवेळी पुढील टप्पा आपणास खुणावत राहील. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.याचवेळी हेही लक्षात ठेवा ध्येय ठरवताना ते अल्प प्रयत्नाने साध्य असेल असे ध्येय ठेवू नका. नाही तर होते असे की, असे ध्येय प्राप्त केल्यावर त्यापुढे ध्येय नसेल तर आपण तेवढ्याच ध्येय प्राप्तीच्या आनंदात वाहून जावू. आपले मन पुन्हा स्वैर होईल. स्वैर मनाच्या अपेक्षा पूर्ण करायला तुमच्या प्रवृत्ती कामाला लागतील आणि तुम्ही बुद्धीचा वापर थांबवाल. तुम्ही भरकटून जावून भान हरवून बसाल. याचा अर्थ असा आहे की, आपले ध्येय ठरवताना ते प्रयत्न साध्य असेलच पण त्यासाठी दीर्घावधी प्रयत्नांची गरज असेल.- प्रा.विनायक त्र्यंबक पाटील