शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

सुसंवाद आणि समन्वय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2018 18:55 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘जगण्याचे अंतरंग’ या सदरात लिहिताहेत प्रा.विनायक त्र्यंबक पाटील.

आपण स्वत:ला अशाच कार्यात गुंतवून घेतले पाहिजे की, जेथे आपली प्रवृत्ती, चित्त आणि बुद्धी एक समन्वयाने कार्यरत असेल. असे कार्य कोणते? आपण आपल्या समोर वेळोवेळी ठेवलेले ध्येय आपले ध्येय आपणच ठरवायला हवे. इतर कुणी सांगतात म्हणून जे ध्येय ठरवले तर ते चुकीचे होईल. एक तर ते लादलेले होईल. ते साध्य करताना आपले चित्त बंडखोरी करायचा निश्चित प्रयत्न करेल.आपण आपले ध्येय ठरविले म्हणजे ते आपणाला हवे असते. ते साध्य झाल्यावर त्यापासून आपणाला समाधान मिळणार असते. आनंदाची प्राप्ती होणार असते. असे ध्येय साध्य झाले नाहीतरी साध्य करण्याच्या प्रयत्नात केले यातही आनंद मिळतो. याचा अर्थ नाही की आपण असाध्य किंवा कधीच पूर्ण होणार नाही असे ध्येय ठेवावे.ध्येय असे ठेवा जे प्रयत्न साध्य आहे. असाध्य ध्येय ठेवल्याने शेवटी दमछाक होऊन, निराश होण्याची वेळ येऊ शकते. निराश होणे म्हणजे दु:ख प्राप्ती. दु:ख झाले म्हणजे आपल्या आयुष्याचा नाश. तेव्हा प्रयत्न साध्य ध्येय असू द्या. त्या ध्येय प्राप्तीचा मार्ग ठरवा. त्या मार्गावर चालताना छोटे छोटे टप्पे ठरवा. असे टप्पे ठरविल्याने अंती आपला फायदाच होतो. एक टप्पा गाठल्याचे समाधान मिळते आणि त्याचवेळी पुढील टप्पा आपणास खुणावत राहील. त्यासाठी प्रयत्न करावे लागतील.याचवेळी हेही लक्षात ठेवा ध्येय ठरवताना ते अल्प प्रयत्नाने साध्य असेल असे ध्येय ठेवू नका. नाही तर होते असे की, असे ध्येय प्राप्त केल्यावर त्यापुढे ध्येय नसेल तर आपण तेवढ्याच ध्येय प्राप्तीच्या आनंदात वाहून जावू. आपले मन पुन्हा स्वैर होईल. स्वैर मनाच्या अपेक्षा पूर्ण करायला तुमच्या प्रवृत्ती कामाला लागतील आणि तुम्ही बुद्धीचा वापर थांबवाल. तुम्ही भरकटून जावून भान हरवून बसाल. याचा अर्थ असा आहे की, आपले ध्येय ठरवताना ते प्रयत्न साध्य असेलच पण त्यासाठी दीर्घावधी प्रयत्नांची गरज असेल.- प्रा.विनायक त्र्यंबक पाटील