शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

आंतर जातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेनेच ओलांडले नाही माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल ३०० प्रस्ताव रखडले आहे. आंतरजातीय विवाह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल ३०० प्रस्ताव रखडले आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना अनुदान देण्यासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकारकडून तर ५० टक्के निधी राज्य सरकारकडून येतो. या योजनेतील केंद्र सरकारचा हिस्सा गेल्या आर्थिक वर्षात आलेला नाही. तर राज्य सरकारने आधी केंद्राचा हिस्सा येऊ द्या मग बघु, अशी भुमिका घेतल्याने सर्व प्रस्ताव रखडले आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना राबवली जाते. त्यात आंतरजातीय विवाह केलेल्या प्रत्येक जोडप्याला ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. या योजनेत मार्च २०२० च्या आधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने १६० जोडप्यांना अनुदानाची रक्कम दिली होती. जिल्हाभरात दरवर्षी सुमारे २०० च्या वर आंतरजातीय विवाह केले जातात. त्यात प्रस्ताव सादर करणाऱ्यांना हे अनुदान दिले जाते.

गेल्या वर्षभरात या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योजनेची रक्कमच मिळालेली नाही. जिल्हा परिषदेत आज या योजनेतील अनुदान मिळावे यासाठी ३०० पेक्षा जास्त दाम्पत्यांचे प्रस्ताव पडून आहेत.

काय आहेत निकष

या योजनेत प्रस्ताव दाखल करण्यासाठी पती किंवा पत्नी यांच्यापैकी एक जण मागास प्रवर्गांतील असावा किंवा दोन्ही मागास प्रवर्गातील असतील तर त्यांची जात वेगवेगळी असावी. असे असेल तर ते जोडपे या योजनेसाठी पात्र ठरते. त्यासाठी दोघांचे लग्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे दाखले सादर करणे गरजेचे असते.

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० च्या आधी आंतरजातीय विवाह झाला असेल तर १५ हजार रुपये दिले जातात. किंवा त्यानंतर विवाह झाला असेल तर ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.

दोन वर्षात झालेले आंतरजातीय विवाह ४००

मार्च २०२० मध्ये जोडप्यांना मिळाली मदत १६०

कोट - या योजनेत पात्र असलेले ३०० पेक्षा जास्त प्रस्ताव आमच्या कार्यालयात तयार आहेत. मात्र केंद्र शासनाचे अनुदान अजून आलेले नाही. त्यात ५० टक्के रक्कम ही केंद्र शासनाकडून येते तर उरलेली ५० टक्के रक्कम राज्य शासन देते. मात्र केंद्राकडून रक्कम आल्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही. - विजय रायसिंग, जि.प. समाजकल्याण अधिकारी