शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

आंतर जातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेनेच ओलांडले नाही माप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल ३०० प्रस्ताव रखडले आहे. आंतरजातीय विवाह ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल ३०० प्रस्ताव रखडले आहे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांना अनुदान देण्यासाठी ५० टक्के निधी केंद्र सरकारकडून तर ५० टक्के निधी राज्य सरकारकडून येतो. या योजनेतील केंद्र सरकारचा हिस्सा गेल्या आर्थिक वर्षात आलेला नाही. तर राज्य सरकारने आधी केंद्राचा हिस्सा येऊ द्या मग बघु, अशी भुमिका घेतल्याने सर्व प्रस्ताव रखडले आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागामार्फत आंतरजातीय विवाह प्रोत्साहनपर योजना राबवली जाते. त्यात आंतरजातीय विवाह केलेल्या प्रत्येक जोडप्याला ५० हजार रुपये प्रोत्साहन पर अनुदान दिले जाते. या योजनेत मार्च २०२० च्या आधी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाने १६० जोडप्यांना अनुदानाची रक्कम दिली होती. जिल्हाभरात दरवर्षी सुमारे २०० च्या वर आंतरजातीय विवाह केले जातात. त्यात प्रस्ताव सादर करणाऱ्यांना हे अनुदान दिले जाते.

गेल्या वर्षभरात या योजनेतील पात्र लाभार्थ्यांना योजनेची रक्कमच मिळालेली नाही. जिल्हा परिषदेत आज या योजनेतील अनुदान मिळावे यासाठी ३०० पेक्षा जास्त दाम्पत्यांचे प्रस्ताव पडून आहेत.

काय आहेत निकष

या योजनेत प्रस्ताव दाखल करण्यासाठी पती किंवा पत्नी यांच्यापैकी एक जण मागास प्रवर्गांतील असावा किंवा दोन्ही मागास प्रवर्गातील असतील तर त्यांची जात वेगवेगळी असावी. असे असेल तर ते जोडपे या योजनेसाठी पात्र ठरते. त्यासाठी दोघांचे लग्नाचे प्रमाणपत्र आणि जातीचे दाखले सादर करणे गरजेचे असते.

अशी मिळते मदत

१ फेब्रुवारी २०१० च्या आधी आंतरजातीय विवाह झाला असेल तर १५ हजार रुपये दिले जातात. किंवा त्यानंतर विवाह झाला असेल तर ५० हजार रुपयांचे अनुदान मिळते.

दोन वर्षात झालेले आंतरजातीय विवाह ४००

मार्च २०२० मध्ये जोडप्यांना मिळाली मदत १६०

कोट - या योजनेत पात्र असलेले ३०० पेक्षा जास्त प्रस्ताव आमच्या कार्यालयात तयार आहेत. मात्र केंद्र शासनाचे अनुदान अजून आलेले नाही. त्यात ५० टक्के रक्कम ही केंद्र शासनाकडून येते तर उरलेली ५० टक्के रक्कम राज्य शासन देते. मात्र केंद्राकडून रक्कम आल्याशिवाय पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देता येणार नाही. - विजय रायसिंग, जि.प. समाजकल्याण अधिकारी