शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

धार्मिक कार्यक्रम, सोहळे रद्द केल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती भीषण होती. त्यामुळे राज्य शासनाने पंढरपूरची वारी रद्द केल्याच्या निर्णयाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती भीषण होती. त्यामुळे राज्य शासनाने पंढरपूरची वारी रद्द केल्याच्या निर्णयाला वारकऱ्यांनीदेखील समर्थन दिले होते. मात्र, आता कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. लसीकरणदेखील चांगल्या प्रकारे होत आहे. मात्र, तरीही शासनाने वारी रद्द करून राज्यभरातील वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. भविष्यात राज्य शासनाने जर धार्मिक कार्यक्रम, सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास त्या विरोधात वारकरी संप्रदायाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वारकरी संप्रदायाचे आळंदी येथील हभप नरहर चौधरी महाराज यांनी दिला आहे.

मंगळवारी पत्रकार भवनात याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी हभप भरत महाराज बेडीकर, दिनकर महाराज, अंकुश महाराज मनवेलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हभप नरहर महाराजांनी सांगितले की, राज्य शासनाने सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातली असती तर वारकरी संप्रदायाने राज्य शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला असता. मात्र, राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. निवडणुका घेतल्या जात आहेत. लग्न सोहळे थाटा-माटात पार पडत असताना, केवळ पंढरपूरची वारी बंद करण्याचा शासनाचा निर्णय अमान्य आहे. त्यामुळे राज्य शासनाचा वारकरी संप्रदायाकडून तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. तसेच पुढील काळात संतांचे सोहळे, समारंभ कोरोनाचे नाव सांगून रद्द करण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी दिला आहे.