शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक कार्यक्रम, सोहळे रद्द केल्यास तीव्र आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती भीषण होती. त्यामुळे राज्य शासनाने पंढरपूरची वारी रद्द केल्याच्या निर्णयाला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या वर्षी कोरोनाची परिस्थिती भीषण होती. त्यामुळे राज्य शासनाने पंढरपूरची वारी रद्द केल्याच्या निर्णयाला वारकऱ्यांनीदेखील समर्थन दिले होते. मात्र, आता कोरोनाची परिस्थिती बऱ्यापैकी आटोक्यात आली आहे. लसीकरणदेखील चांगल्या प्रकारे होत आहे. मात्र, तरीही शासनाने वारी रद्द करून राज्यभरातील वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या आहेत. भविष्यात राज्य शासनाने जर धार्मिक कार्यक्रम, सोहळे रद्द करण्याचा निर्णय घेतल्यास त्या विरोधात वारकरी संप्रदायाकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा वारकरी संप्रदायाचे आळंदी येथील हभप नरहर चौधरी महाराज यांनी दिला आहे.

मंगळवारी पत्रकार भवनात याबाबत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी हभप भरत महाराज बेडीकर, दिनकर महाराज, अंकुश महाराज मनवेलकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना हभप नरहर महाराजांनी सांगितले की, राज्य शासनाने सर्वच कार्यक्रमांवर बंदी घातली असती तर वारकरी संप्रदायाने राज्य शासनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला असता. मात्र, राज्यात सर्वच राजकीय पक्षांकडून आंदोलने केली जात आहेत. निवडणुका घेतल्या जात आहेत. लग्न सोहळे थाटा-माटात पार पडत असताना, केवळ पंढरपूरची वारी बंद करण्याचा शासनाचा निर्णय अमान्य आहे. त्यामुळे राज्य शासनाचा वारकरी संप्रदायाकडून तीव्र निषेध यावेळी करण्यात आला. तसेच पुढील काळात संतांचे सोहळे, समारंभ कोरोनाचे नाव सांगून रद्द करण्याचा प्रयत्न केला तर त्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असाही इशारा वारकरी संप्रदायाच्या प्रतिनिधींनी दिला आहे.