शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

७७ वर्षांच्या सीएमव्हीचा प्रसार करणाऱ्या ६० किडी व त्यांच्या आश्रयाच्या ८०० वनस्पतींचे एकात्मिक कीड नियंत्रण गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 00:44 IST

जगातील कृषी वा केळी संशोधन करणाºया कोणत्याही संशोधन केंद्रात सीएमव्हीला प्रतिरोध करणारे केळीचे वाण विकसित करण्यासंदर्भात संशोधन नाही.

ठळक मुद्देलोकमत संडे स्पेशल मुलाखतशासनमान्य प्रयोगशाळा त्या वारंवार आलेले नमुने प्रमाणित करण्यास असक्षमआंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांचे मत

किरण चौधरीरावेर : १९४३ पासून सुमारे ७७ वर्षांचा इतिहास असलेल्या कुक्कुंबर मोझॅक व्हायरसचा प्रसार करणाºया ६० प्रकारच्या रसशोषक किडींचे एकात्मिक नियंत्रण व त्यांना आश्रय देणाºया ८०० प्रकारच्या वनस्पतींचे नीट व्यवस्थापन करणे हेच सीएमव्ही नियंत्रणाचे गमक असल्याने जगातील कृषी वा केळी संशोधन करणाºया कोणत्याही संशोधन केंद्रात सीएमव्हीला प्रतिरोध करणारे केळीचे वाण विकसित करण्यासंदर्भात संशोधन करण्याची तसदी घेतली नसल्याचे मत आंतरराष्ट्रीय केळीतज्ज्ञ डॉ.के.बी.पाटील यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.प्रश्न : सीएमव्हीचा प्रादुर्भाव केळीवर पहिल्यांदा कुठे व केव्हा झाला?उत्तर : सीएमव्हीचा प्रादुर्भाव पहिल्यांदा १९४३ मध्ये आढळला. तब्बल ७७ वर्षांचे जीवनमान असलेल्या सीएमव्हीचा प्रादुर्भाव भारतात मोठ्या प्रमाणात आढळला होता. त्यावेळी भारतीय कृषी अनुसंधान परिषदेतर्फे नियंत्रणाची व्यापक मोहीम राबविण्यात आली होती. तद्नंतर १९७४ मध्ये गुजरात मधील सुरत, भरूच व रामपिपल्या या जिल्ह्यात आढळला होता. सन १९८० साली भारतात ७० टक्के सीएमव्हीचा प्रादुर्भाव आढळल्याचा अहवाल विषाणू तज्ज्ञ डॉ.सुमनवार यांनी शासनाकडे सादर केला आहे. तद्नंतर सन २००२, २००३, २०१५ व २०१९ साली चापोरा, दापोरा व रावेर तालुक्यातील केळी बागांमध्ये आढळला.प्रश्न : सीएमव्हीने बाधित खोडं उपटून फेकावे लागत असल्याने असे नेमके कोणते दुष्परिणाम आढळतात?उत्तर : सीएमव्ही विषाणू झाडात शिरला म्हणजे केळीच्या पानाच्या शिरा पिवळ्या व पांढºया पडून त्यावर काळे ठिपके पडू लागतात व नवीन येणारी पाने चिरोटी निघू लागतात. ढगाळ व झिमझिम पावसानंतर तापमानात वाढ होऊन पोषक वातावरण निर्माण झाले तरी केळीचे खोडं चांगली पानं काढू लागतात. म्हणून शेतकºयाचा गैरसमज होतो की सीएमव्ही नियंत्रणात आला.मात्र त्याच ठिकाणी फसगत होते. सीएमव्हीने बाधित खोड निसवल्यानंतर वापसी केळीपेक्षाही निकृष्ट घड निसवत असल्याने शेतकऱ्यांचा खर्च व मेहनत व्यर्थ ठरते. म्हणून सीएमव्हीचे लवकरात लवकर शोध घेऊन त्या खोडांना उपटून फेकणे, रसशोषक किडींचे एकात्मिक कीड नियंत्रण करणे, शिवार तणमुक्त करते व रसशोषक किडींचे आश्रयस्थान असलेल्या पिकांवर वेळीच एकात्मिक किड नियंत्रण करणे आवश्यक आहे.प्रश्न : अत्याधुनिक केळी उत्पादनाचे तंत्रज्ञान अंमलात आणले जात असताना व जिल्ह्यात केळी संशोधन केंद्र असताना सीएमव्हीवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरल्याबाबत आपणास काय वाटते?उत्तर : मूळात केळीवर अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित असले तरी जगाच्या पाठीवर असलेल्या कोर्बाना, इतिहब, बायोव्हर्सिटी इंटरनॅशनल, आयबीआयके, इंब्राफब्राड यासारख्या कृषी वा केळी संशोधन करणाºया आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संस्थांनी सीएमव्हीला रोगप्रतिकार करणाºया केळीच्या वाणांचे संशोधन करण्यासाठी शक्ती वाया घातली नाही. कारण, या विषाणूचा प्रसार पाण्यातून वा जमिनीतून होत नसल्याने या रोगाचे व्यवस्थापन सोपे आहे. व्हायरस इंडेक्स केलेली रोपांची लागवड केल्यास, तणविरहीत शिवार ठेवल्यास व सीएमव्हीचा प्रादुर्भाव करणाºया ६० किडींचे एकात्मिक कीड नियंत्रण केल्यास व त्यांना आश्रय देणाºया २०० वनस्पतींचे एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास सीएमव्हीवर नियंत्रण ठेवणे सोपे आहे.प्रश्न : उतीसंवर्धित केळी बागांवर देशी वाणांच्या बेणे लागवडीखालील केळी बागांपेक्षा सीएमव्हीचे प्रमाण जास्त असल्याने केळीरोपांची निर्मिती करणाºया कंपन्या नुकसानीला जबाबदार असल्याचा आरोप होत आहे. आपले मत काय?उत्तर : सन १९६५ मध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या सर्व्हेक्षणात ९ हजार ४० हेक्टर केळी बागांपैकी हेक्टर १ हजार ४५० क्षेत्रातील बसराई व हरीसाल वाणांच्या केळीबागा बळी पडल्याचे निष्पन्न झाले होते. डिसेंबर २०१५ व जानेवारी २०१६ मध्ये जामनेर तालुक्यातील हिवरखेडा, नेरी, पहूर येथील बेणे लागवडीखालील १४० केळीबागा बाधित झालेल्या आढळून आले होते. मध्य प्रदेशातील चापोरा, दापोरा, फोफनार भागातील उतीसंवर्धित केळी बागांएवढाच प्रादुर्भाव कंद लागवडीखाली बागांवर दिसतो. बेणे वा कंद लागवडी खालील केळीच्या खोडाचे बीजांकुरण होताना नाही तर तीन चार कोवळ्या पानांवर आल्यावर विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यासाठी अनुकूल वातावरण लाभले म्हणजे हा विषाणू रोपाखालील की बेणे लागवडीखालील केळीबागा आहे याबाबत कोणताही भेदभाव करीत नाहीत. तो शेतकरी बांधवांचा गैरसमज आहे.प्रश्न : विषाणू निर्देशांकाबाबत शासनाने नेमकी काय भूमिका घेतली पाहिजे व शासनाकडून काय अपेक्षा आहेत?उत्तर : उतीसंवर्धित केळी रोपांची निर्मिती करताना ती १०० टक्के विषाणू निर्देशांंकाने प्रमाणित करणे शासनाने अनिवार्य केले आहे. किंबहुना त्यानुसार विषाणू निर्देशांंकाने रोपांना शासनाच्या शासनमान्य प्रयोगशाळेतून प्रमाणित करण्यात येते. मात्र शासनाने निर्धारित केलेल्या या प्रयोगशाळांमधून अत्यावश्यक त्या काळातच रोपनिर्मिती करणाºया कंपन्यांनी पाठवलेल्या चाचणीचे नमुन्यांची संख्या मोठ्या प्रमाणात येत असल्याने व त्या शासनमान्य प्रयोगशाळा त्या वारंवार आलेले नमुने प्रमाणित करण्यास सक्षम नसल्याने संबंधित प्रयोगशाळांची क्षमतावर्धित करण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाने त्रिची येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्राच्या सर्वोच्च संस्थेतील विषाणू निर्देशांकाने प्रमाणित करणाºया प्रयोगशाळेची रद्दबातल केलेली मान्यता कायम करण्याची गरज आहे. कृषी विद्यापीठ तथा जळगाव केळी संशोधन केंद्रात विषाणूंचा शोध घेणे, विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव करणाºया किडींचा शोध घेणारे संशोधन करण्यासाठी बळकटीकरण करण्याची गरज असल्याचे मत डॉ.के.बी.पाटील यांनी व्यक्त केले.

टॅग्स :interviewमुलाखतRaverरावेर