शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

प्रवाही सिंचनावर खर्च टाळून अयशस्वी ‘उपसां’ना प्राधान्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 19:11 IST

नार-पार-गिरणा उपसाच्या डीपीआरसाठी १३ कोटींची खैरात

ठळक मुद्देयुती शासनाकडूनही आघाडीचाच कित्ता बोदवड उपसाचे काम ‘तापी’च्याच माजी अभियंत्याकडे जिल्ह्यातील ६४ सहकारी उपसांचे जिवंत उदाहरण

जळगाव: तापी पाटबंधारे महामंडळाने प्रवाही सिंचनाच्या कामांना प्राधान्य देणे आवश्यक असतानाही राज्यपालांचा आदेश डावलून अल्प सिंचन क्षमतेच्या उपसा सिंचन योजनांसाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध आघाडी सरकारने उपलब्ध करून दिला होता. मात्र त्यानंतरही सत्तेवर आलेल्या युती शासनाकडून तोच कित्ता गिरवणे सुरू असल्याचे दिसून येत आहे.उपसा सिंचन योजना हा प्रकार अपयशी ठरलेला असतानाही नार, पार, औरंगा, अंबिका या खोऱ्यातील पाणी पूर्वेकडील तापी खोºयातील नदीखोºयातून गिरणा उपखोºयात उपसा पद्धतीने वळविण्यासाठी डीपीआर तयार करण्याच्या १३ कोटी ५१ लाख २५ हजार ३५५ रूपये खर्चाच्या कामाच्या अंदाजपत्रकास शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे हा निधी अक्षरश: वाया जाणार असल्याचे जाणकारांचे मत आहे.तापीच्या अनेक मोठ्या उपसा सिंचन योजनांना पाणी उपलब्धता प्रमाणपत्र प्राप्तच नसताना त्यावर कोट्यवधींचा खर्च झाला आहे. अंदाजपत्रके वाढविण्याचे उपसा योजना हे उत्तम उदाहरण आहे. आधीच उपसा सिंचन योजना हा एक फेल गेलेला प्रकार आहे. तरीही उपसा सिंचनावर राज्यभरात २५-३० हजार कोटींचा खर्च केला जात आहे. याबाबत मेरीचे तत्कालीन मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी जाहीर आरोप केले होते. एका टप्प्याच्या उपसा योजना चालत नाहीत हे माहीत असतानाही तीन, चार टप्प्यांच्या हजारो कोटींच्या योजनांची कामे सुरू केली. त्यामुळे या उपसा सिंचन योजनांचा ९० टक्के खर्च वाया जाणार यात शंकाच नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. त्यात वरणगाव तळवेल, कुºहावढोदा उपसा, सुलवाडे, बोदवड उपसा सिंचन योजनांचा समावेश आहे. जिल्हावासीयांना विकासाचे स्वप्न दाखवित तापी खोरे विकास महामंडळाने २१७९ कोटी ८३ लाख रुपयांची बोदवड सिंचन योजना शासनाकडे मंजुरीसाठी पाठविली व तत्कालीन सरकारनेही तिला मंजुरी दिली. धक्कादायक म्हणजे या योजनेसाठी पाणी उपलब्ध नसताना ही योजना तयार करण्याचा ‘पराक्रम’ तापी महामंडळाने केला. या सर्व उपसा योजनांवरील खर्च वाया जाणार असल्याचा दावाही पांढरे यांनी केला होता. मात्र त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपाने आता सत्तेवर येताच तोच कित्ता गिरवणे सुरू ठेवले असल्याचे नार-पार-गिरणा च्या उपसा सिंचन योजनेच्या मंजुरीवरून दिसून येत आहे.बोदवड उपसाचे काम ‘तापी’च्याच माजी अभियंत्याकडेजिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पैसा नसताना बोदवड उपसा सिंचन योजना हाती घेण्याची गरजच नव्हती. १४२ कोटींचे पाडळसे धरण १५ वर्षात पूर्ण होऊ शकले नाही तर २१७९ कोटींची अवाढव्य अशी बोदवड उपसा योजना कधी पूर्ण होणार? राज्यातील हजारों उपसा योजनांपैकी ९९ टक्के बंद पडल्या असतानाही कोट्यवधीची योजना तयार करण्याचे कारण काय? असा सवाल उपस्थित होत होता. मात्र तापी महामंडळातील तेव्हा सर्वेसर्वा असलेल्या अभियंत्यानेच या योजनेचे काम पाणी वाटपात पाणी नसतानाही ते इतर प्रकल्पांमधून पळवून या योजनेला मंजुरी मिळविली. नातलगाच्या नावावर याच अभियंत्याने या योजनेचे काम घेतले असल्याचे समजते. त्यावरून या योजनेसाठी धडपड का होती? ते दिसून येते.जिल्ह्यातील ६४ सहकारी उपसांचे जिवंत उदाहरणधुळे, नंदुरबार व जळगाव जिल्ह्यातील बंद पडलेल्या ६४ सहकारी उपसा सिंचन योजना तापी महामंडळाकडे २००५ मध्येच वर्ग करण्याचा निर्णय झालेला असताना तेव्हा त्यादृष्टीने प्रयत्न न झाल्याने आता या सहकार उपसा योजना पुनरूज्जीवीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांच्या पुनरूज्जीवनासाठीचा खर्च आता तिप्पट झाला आहे. या उपसा ताब्यात घेण्याचा खर्चच ३५१ कोटींवर गेला आहे. जिल्ह्यातील २१ सहकारी उपसा योजनांसाठीच १५० कोटींच्या निधीची गरज भासणार आहे. त्यानंतर तापी महामंडळाकडून या उपसांची दुरूस्ती केली जाईल. त्यासाठी शासनाने विशेष निधी न दिल्यास पुनरूज्जीवनाची केलेली घोषणा निधीअभावी केवळ घोषणाच ठरण्याची शक्यता आहे. १९८९ साली सर्व उपसासिंंचन योजनांचे बांधकामपूर्ण झाल्यानंतर एक ते दोन वर्ष चालल्या व नंतर बंद झाल्या. फक्त दोन उपसा सिंंचन योजना अद्यापही व्यवस्थित सुरू आहेत. या योजना थकीत कर्ज, वीज बील न भरणे, पाण्याचे समान वाटप न होेणे या कारणांमुळे बंद पडल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या योजनांचे डिलीव्हरी व्हॉल्व गहाळ झाले असून सिमेंट पाईप तुटलेले आहेत.