शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

‘जलयुक्त’बाबत असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:47 IST

वार्तापत्र-महसूल

सुशील देवकरजलयुक्त शिवार योजनेच्या आता टप्पा ४ साठी गावांची नावे निश्चित करणे सुरू झालेले असताना अद्यापही टप्पा २ ची कामेच प्रलंबित आहेत.मात्र या कामांबाबत जिल्हा प्रशासन जितके असंवेदनशील आहे. तितकेच या जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील असंवेदनशील आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक विभागांची जलयुक्तची कामे रखडली आहेत. मात्र जशी जिल्हा प्रशासनाला त्याची फारशी फिकीर नाही, तशीच फिकीर राज्याच्या जलसंधारण विभागाला देखील नसल्याचे चित्र आहे. जळगाव येथील एका लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी जलसंधारण विभागाचे सचिव येणार होते. मात्र लग्नसमारंभास सरकारी खर्चाने यायचे तर शासकीय कामे हवी. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व त्यानंतर जामनेर तालुक्यातील जलयुक्तच्या कामांची पाहणी करण्याचा कार्यक्रम ठरला. जलसंधारण सचिव आढावा घेणार म्हटल्यावर जिल्हा प्रशासनाला जाग आली. जलयुक्तच्या २०१६-१७च्या टप्पा २ मधील तब्बल १४ कामे अद्यापही बाकी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांना धारेवर धरले. कृषी विभागाची दोन कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. मात्र जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. सिमेंट बंधाºयांचीच काही कामे बाकी आहेत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार? व त्यात पाणी कधी साठणार? असा सवाल उपस्थित होत आहे. १२ कामे वनविभागाच्या परवानगीअभावी अडली होती, त्यांची परवानगी २४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत तातडीने देण्यात आली. जर ही तत्परता संवेदनशील प्रशासनाने आधीच दाखविली असती तर हे काम मार्गी लागून वेळेत पूर्ण झाले असते. मात्र सचिव आढावा घेणार म्हटल्यावर हे काम मार्गी लागले. विशेष म्हणजे या राहिलेल्या कामांना परवानगी देताच टप्पा २ मधील सर्व २२२ गावे जलयुक्त झाल्याची घोषणाही प्रशासनाने करून टाकली. या टप्पा २ मध्ये जामनेर तालुक्यातील सर्वाधिक २६ गावे, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी २० गावांचा समावेश आहे. सध्या टंचाईची परिस्थितीही याच तालुक्यांमध्ये अधिक जाणवत आहे. सचिवांचा दौरा जाहीर झाल्याने त्यांना कोणते काम दाखवायचे? याचीही तयारी करण्यात आली. मात्र सचिवांनीही काही कामामुळे या दौºयाकडे पाठ फिरविली. आधीच दोन वर्षांपासून जिल्ह्यात अनेक भागात पुरेश्या प्रमाणात पाऊस न झाल्याने जलयुक्तचे काम झालेले बंधारे, तलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अशा परिस्थितीत निदान या पावसाळ्यापूर्वी तरी जलयुक्तची अपूर्ण कामे पूर्ण करून पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी साठविण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष झाल्याचेच चित्र आहे. आता पावसाळ्यापूर्वी ही राहिलेली कामे पूर्ण झाली तरच त्यात पाणी साठू शकेल.