शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात पुन्हा टोळीयुद्धाचा भडका ? कोंढव्यात गोळीबार; एकाचा मृत्यू
2
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
3
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
4
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
5
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
6
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
7
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
8
तुळशी विवाहाच्या शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
9
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
10
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
11
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
12
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
13
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
14
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
15
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
16
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
17
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
18
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
19
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
20
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या

‘जलयुक्त’बाबत असंवेदनशीलता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:47 IST

वार्तापत्र-महसूल

सुशील देवकरजलयुक्त शिवार योजनेच्या आता टप्पा ४ साठी गावांची नावे निश्चित करणे सुरू झालेले असताना अद्यापही टप्पा २ ची कामेच प्रलंबित आहेत.मात्र या कामांबाबत जिल्हा प्रशासन जितके असंवेदनशील आहे. तितकेच या जलसंधारण विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील असंवेदनशील आहेत. जळगाव जिल्ह्यातील अनेक विभागांची जलयुक्तची कामे रखडली आहेत. मात्र जशी जिल्हा प्रशासनाला त्याची फारशी फिकीर नाही, तशीच फिकीर राज्याच्या जलसंधारण विभागाला देखील नसल्याचे चित्र आहे. जळगाव येथील एका लग्न समारंभास उपस्थित राहण्यासाठी जलसंधारण विभागाचे सचिव येणार होते. मात्र लग्नसमारंभास सरकारी खर्चाने यायचे तर शासकीय कामे हवी. म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक व त्यानंतर जामनेर तालुक्यातील जलयुक्तच्या कामांची पाहणी करण्याचा कार्यक्रम ठरला. जलसंधारण सचिव आढावा घेणार म्हटल्यावर जिल्हा प्रशासनाला जाग आली. जलयुक्तच्या २०१६-१७च्या टप्पा २ मधील तब्बल १४ कामे अद्यापही बाकी असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीतांना धारेवर धरले. कृषी विभागाची दोन कामे तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन अधिकाºयांनी दिले. मात्र जिल्हा परिषदेची मोठ्या प्रमाणावर कामे बाकी आहेत. सिमेंट बंधाºयांचीच काही कामे बाकी आहेत. त्यामुळे ही कामे कधी पूर्ण होणार? व त्यात पाणी कधी साठणार? असा सवाल उपस्थित होत आहे. १२ कामे वनविभागाच्या परवानगीअभावी अडली होती, त्यांची परवानगी २४ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीत तातडीने देण्यात आली. जर ही तत्परता संवेदनशील प्रशासनाने आधीच दाखविली असती तर हे काम मार्गी लागून वेळेत पूर्ण झाले असते. मात्र सचिव आढावा घेणार म्हटल्यावर हे काम मार्गी लागले. विशेष म्हणजे या राहिलेल्या कामांना परवानगी देताच टप्पा २ मधील सर्व २२२ गावे जलयुक्त झाल्याची घोषणाही प्रशासनाने करून टाकली. या टप्पा २ मध्ये जामनेर तालुक्यातील सर्वाधिक २६ गावे, चाळीसगाव, पाचोरा, पारोळा तालुक्यातील प्रत्येकी २० गावांचा समावेश आहे. सध्या टंचाईची परिस्थितीही याच तालुक्यांमध्ये अधिक जाणवत आहे. सचिवांचा दौरा जाहीर झाल्याने त्यांना कोणते काम दाखवायचे? याचीही तयारी करण्यात आली. मात्र सचिवांनीही काही कामामुळे या दौºयाकडे पाठ फिरविली. आधीच दोन वर्षांपासून जिल्ह्यात अनेक भागात पुरेश्या प्रमाणात पाऊस न झाल्याने जलयुक्तचे काम झालेले बंधारे, तलाव कोरडेठाक आहेत. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे. अशा परिस्थितीत निदान या पावसाळ्यापूर्वी तरी जलयुक्तची अपूर्ण कामे पूर्ण करून पावसाळ्यात जास्तीत जास्त पाणी साठविण्याचा प्रयत्न होणे अपेक्षित असताना प्रशासनाकडून त्याकडे सोयीस्कर दूर्लक्ष झाल्याचेच चित्र आहे. आता पावसाळ्यापूर्वी ही राहिलेली कामे पूर्ण झाली तरच त्यात पाणी साठू शकेल.