शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

प्रभाग आरक्षणामध्ये गाव पुढाऱ्यांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 23:36 IST

आरक्षण काढताना प्रशासनाच्या दुटप्पी धोरणामुळे ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे.

ठळक मुद्देभुसावळ तालुक्यातील स्थितीनगरपालिकेसाठी एक तर ग्रामपंचायतींसाठी वेगळा न्यायग्रामीण भागात नाराजी

उत्तम काळेभुसावळ, जि.जळगाव : तालुक्यात वरणगाव नगर पंचायतीसह २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका यंदा होणार आहेत. त्यासाठी नुकतेच ग्रामपंचायतीसह नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षणही जाहीर करण्यात आले आहे. मात्र आरक्षण काढताना वरणगाव नगरपंचायतीच्या प्रभागासाठी चिठ्ठी काढून, तर ग्रामीण भागासाठी मात्र जिल्हाधिकारी कार्यालयातून आलेल्या आदेशाप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपंचायतीसाठी वेगळा, तर २६ ग्रामपंचायतींसाठी वेगळा न्याय का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. प्रशासनाच्या या दुटप्पी धोरणामुळे ग्रामीण भागातील इच्छुक उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.दरम्यान, ३ फेब्रुवारी रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या वेळी मंडळ अधिकाऱ्यांनी आपण अपिलात जा आणि तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयामध्ये हेलपाटे खा, अशी भूमिका का घेतली आहे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.या ठिकाणी होणार निवडणुकातालुक्यातील कुºहे (पानाचे), मन्यारखेडा, काहूरखेडा, साकेगाव, कंडारी, खडका, किन्ही, फेकरी, खंडाळे, शिदी, पिंपळगाव बुद्रूक, जोगलखेडा, बोहर्डी, टाहाकळी, कंडारी, पिंपळगाव खुर्द, बेलव्हाय, पिंपरी सेकम, दर्यापूूर, आचेगाव, सुसरी, बेलव्हाय, पिंपरी सेकम, वांजोळे, कठोरे या २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मुदत जुलै ते डिसेंबरमध्ये संपत आहे. यासाठी ३ फेब्रुवारी रोजी तालुक्यामध्ये प्रभागांचे आरक्षण काढण्यात आले.दवंडी न देताच सभामहसूल विभागाकडून सर्वच ग्रामपंचायतींना विशेष सभा घेण्याचे दवंडी देऊन सभेसाठी ग्रामस्थांना उपस्थित राहण्यासाठी आवाहन करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र कुºहे ( पानाचे) सह बहुतांशी ग्रामपंचायतीने दवंडी न देताच मर्जीतील लोकांना बोलावून विशेष सभा दाखविण्यात आल्या. यात मंडळ अधिकाºयांनी कागदावर तयार करून आणलेले प्रभागातील आरक्षण वाचून दाखवले.यावेळी हे आरक्षण कोणत्या पद्धतीने काढण्यात आले आहे. यासंदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातून हे आरक्षण काढण्यात आले आहे, असे सांगून काही अपील असल्यास तहसील कार्यालय, प्रांतांकडे अपील करावे, असे यावेळी सांगण्यात आले.वरणगाव येथील नगरपंचायतीच्या प्रभागांचे आरक्षण काढण्यासाठी नगरपंचायतीतर्फे विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी रामसिंग सुलाने होते. यावेळी इतर अधिकारी व पदाधिकारीही उपस्थित होते.वरणगाव नगरपंचायतीच्या एकूण १८ प्रभागांमधील आरक्षण काढताना एका लहान मुलीच्या हस्ते काढलेल्या चिठ्ठीवरून आरक्षण जाहीर करण्यात आले. ग्रामपंचायतीला मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या यादीनुसार आरक्षण जाहीर करण्यात आले. त्यामुळे हा दुजाभाव का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणBhusawalभुसावळ