शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
4
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
5
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
6
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
7
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
8
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
9
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
10
चर्चा युद्धबंदीची सुरू होती, रशियाने हल्ले वाढवले, प्रवाशांवर बॉम्ब टाकले; ९ जणांचा मृत्यू झाला
11
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
12
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
13
आता 'टीम इंडिया' पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आणणार; श्रीकांत शिंदेंसह सुप्रिया सुळेंना जबाबदारी
14
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?
15
Video: केदारनाथ धामला जाताना हेलिकॉप्टर क्रॅश; दैव बलवत्तर म्हणून वाचले
16
Coronavirus Outbreak: टेन्शन वाढलं! हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोनाचं थैमान, रुग्णांमध्ये मोठी वाढ; भारताला किती धोका?
17
Video - जॉर्जिया मेलोनींच्या स्वागतासाठी अल्बेनियाचे पंतप्रधान भर पावसात गुडघ्यावर बसले अन्...
18
"लग्नानंतर टिंडरवर अकाऊंट उघडून मी दोन तीन मुलींसोबत..."; अभिजीत सावंतची कबूली, म्हणाला-
19
UPI Lite, वॉलेट पेमेंट... युजर्सच्या पसंतीस का उतरत नाहीयेत हे नवे फीचर्स? कुठे येतेय समस्या
20
परेश रावल यांचा 'हेराफेरी ३'ला रामराम! सुनील शेट्टीनं सोडलं मौन, म्हणाला - "बाबू भैयाशिवाय श्याम..."

तक्रार निवारण समितीकडून तक्रारदारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:20 IST

जळगाव : गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी न्यायासाठी केलेल्या तक्रारींचे कामकाज पूर्ण झालेले आहे. मात्र, तरी सुध्दा विद्यापीठातील तक्रारी ...

जळगाव : गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी न्यायासाठी केलेल्या तक्रारींचे कामकाज पूर्ण झालेले आहे. मात्र, तरी सुध्दा विद्यापीठातील तक्रारी निवारण समितीने हेतूपुरस्कर निकाल प्रलंबित ठेवला असून तो देण्यास टाळाटाळ करित असल्याचा आरोप चार तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान, महिन्याभराच्या आत निकाल देण्यात यावा, अशी मागणी तक्रारदारांनी प्रभारी कुलगुरू ई-वायुनंदन यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तक्रारदार डॉ.संजय भोकरडोळे, डॉ.मंजुषा आयाती, राजेंद्र गाडगीळ व सुनील जंगले यांनी गेल्या चार ते पाच वर्षांपूर्वी न्यायायासाठी विद्यापीठात तक्रारी दाखल केल्या होत्या. कायद्यानुसार तक्रार दाखल झाल्यावर ९० दिवसांच्या आत निकाल देणे बंधनकारक आहे. तथापि, या मुदतीचे भान न ठेवता तक्रार निवारण समितीने मनमानी काम सुरू केले असून अनेकवेळा निकाल जाहीर केले जाईल, असे सांगण्यात आले. परंतु, निकाल देण्यात आला नाही. तर प्रत्यक्ष उपस्थित राहून कामकाज करण्याचे समिती अध्यक्ष जाहीर करतात. परंतु, तारखेच्या दिवशी येत नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे. समिती ही स्वतंत्रपणे कामकाज करीत नसून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्याशिवाय नकलेल्या प्रती मिळविण्यासाठी दिलेले अर्ज देखील प्रलंबित ठेवण्यात आले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे समितीच्या अध्यक्षांना प्रत्यक्ष येऊन कामकाज करणे शक्य नसल्यास नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात यावी व महिन्याभरात तक्रारींचा निकाल देण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

या आहेत तक्रारी

जनसंवाद व पत्रकारिता विभागात ईडब्ल्यूएस संवर्गाच्या पदावर एससी संवर्गाच्या उमेदवाराची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच जनसंवाद व पत्रकारिता विभागात सेवा बजावल्यानंतर वेतनाचा फरक दिलेला नाही. वेतनाच्या फरकाची रक्कम मिळावी ही मागणी तक्रारीत केली आहे.