शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
4
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
5
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
6
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
7
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
8
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
9
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
10
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
11
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
12
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
13
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
14
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
15
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
16
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
17
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
18
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
19
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
20
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...

कपाशीवर मिलीबगसह ’लाल्या’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:24 IST

जळगाव जिल्हय़ातील वाकोद ता. जामनेर परिसरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलहरी पावसामुळे खरीप हंगामाविषयी जीवाला घोर लागलेल्या शेतक:यांवर दुसरे संकट उशीरा येऊन बरसलेल्या पावसाच्या आनंदावर विरजण

लोकमतन ऑनलाईन वाकोद ता. जामनेर : या परिसरात मोठय़ा क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकावर मिलीबग आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी काढता पाय घेतलेल्या पावसाने 20 ते 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्याने बळीराजाने पै अन् पै जोडलेला पैसा लावून हातातून जात असलेला खरीप हंगाम वाचविण्यात मोठी मदत मिळाली. यंदा शेतकरी वर्गाने शेती मशागतीपासून तर बी-बियाणे, औषधी, खते आदींवर मोठा खर्च करून आपली सर्व गुंतवणूक शेतात केलेली होती़ तथापि पावसाने दडी मारल्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो, की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना पुन्हा पाऊस परतल्याने काही प्रमाणात का होईना शेतकरी वर्गाची मेहनत व पैसे वाचल्याची चिन्हे दिसत असतांना आता त्यावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात मिलीबग आणि लाल्या यांचे संकट मोठे आहे. आधीच खंडित पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आता आलेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाल आहे, परंतु रोगाच्या प्रादुर्भावाने उभ्या पिकांचे भवितव्य खराब असल्याचे चित्र वाकोदसह परिसरात दिसत आहे. या परिसरात कपाशी पिकांची लागवड प्रचंड प्रमाणात असून मुख्य पिक म्हणून कपाशीची लागवड केलेली असते. मात्र या कपाशीवर थ्रिप्स, मिलीबग व लाल्या रोगाने तसेच झाडावरील रस शोषक किडीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले असून शेतकरी वर्ग कमालीचा हैराण झालेला दिसून येत आहे. नेमकी काय उपाययोजना करावी या संभ्रमात तो पडला आहे. काय आहे मिलीबग ? कपाशीच्या झाडावर शेंडयापासून ते जमिनीलगतच्या खोडापर्यत पांढ:या रंगाच्या अत्यंत बारीक किडीचा प्रादुर्भाव असतो. यामुळे पाने गळणे , कै:यांची वाढ खुंटणे, तसेच झाडांची पाने पिवळी व लाल पडून झाड वाळणे किंवा काळवंडतात. यातून उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. जोरदार पावसाची प्रतिक्षा गत आठवडय़ात चांगला पाऊस झाला. या पावसाने पिके तरली, मात्र पाऊस पाहिजे तसा जोरदार नसल्याने उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्पन्नात घट येणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी पावसाने दडी मारल्याने चवळी, मूग, उडीद, मका पिकांवर परिणाम होऊन ही पिके शेतक:यांच्या हातातून निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कापसावरील रोग कमी होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.