शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीवर मिलीबगसह ’लाल्या’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:24 IST

जळगाव जिल्हय़ातील वाकोद ता. जामनेर परिसरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलहरी पावसामुळे खरीप हंगामाविषयी जीवाला घोर लागलेल्या शेतक:यांवर दुसरे संकट उशीरा येऊन बरसलेल्या पावसाच्या आनंदावर विरजण

लोकमतन ऑनलाईन वाकोद ता. जामनेर : या परिसरात मोठय़ा क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकावर मिलीबग आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी काढता पाय घेतलेल्या पावसाने 20 ते 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्याने बळीराजाने पै अन् पै जोडलेला पैसा लावून हातातून जात असलेला खरीप हंगाम वाचविण्यात मोठी मदत मिळाली. यंदा शेतकरी वर्गाने शेती मशागतीपासून तर बी-बियाणे, औषधी, खते आदींवर मोठा खर्च करून आपली सर्व गुंतवणूक शेतात केलेली होती़ तथापि पावसाने दडी मारल्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो, की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना पुन्हा पाऊस परतल्याने काही प्रमाणात का होईना शेतकरी वर्गाची मेहनत व पैसे वाचल्याची चिन्हे दिसत असतांना आता त्यावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात मिलीबग आणि लाल्या यांचे संकट मोठे आहे. आधीच खंडित पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आता आलेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाल आहे, परंतु रोगाच्या प्रादुर्भावाने उभ्या पिकांचे भवितव्य खराब असल्याचे चित्र वाकोदसह परिसरात दिसत आहे. या परिसरात कपाशी पिकांची लागवड प्रचंड प्रमाणात असून मुख्य पिक म्हणून कपाशीची लागवड केलेली असते. मात्र या कपाशीवर थ्रिप्स, मिलीबग व लाल्या रोगाने तसेच झाडावरील रस शोषक किडीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले असून शेतकरी वर्ग कमालीचा हैराण झालेला दिसून येत आहे. नेमकी काय उपाययोजना करावी या संभ्रमात तो पडला आहे. काय आहे मिलीबग ? कपाशीच्या झाडावर शेंडयापासून ते जमिनीलगतच्या खोडापर्यत पांढ:या रंगाच्या अत्यंत बारीक किडीचा प्रादुर्भाव असतो. यामुळे पाने गळणे , कै:यांची वाढ खुंटणे, तसेच झाडांची पाने पिवळी व लाल पडून झाड वाळणे किंवा काळवंडतात. यातून उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. जोरदार पावसाची प्रतिक्षा गत आठवडय़ात चांगला पाऊस झाला. या पावसाने पिके तरली, मात्र पाऊस पाहिजे तसा जोरदार नसल्याने उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्पन्नात घट येणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी पावसाने दडी मारल्याने चवळी, मूग, उडीद, मका पिकांवर परिणाम होऊन ही पिके शेतक:यांच्या हातातून निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कापसावरील रोग कमी होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.