शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

कपाशीवर मिलीबगसह ’लाल्या’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2017 22:24 IST

जळगाव जिल्हय़ातील वाकोद ता. जामनेर परिसरात चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देलहरी पावसामुळे खरीप हंगामाविषयी जीवाला घोर लागलेल्या शेतक:यांवर दुसरे संकट उशीरा येऊन बरसलेल्या पावसाच्या आनंदावर विरजण

लोकमतन ऑनलाईन वाकोद ता. जामनेर : या परिसरात मोठय़ा क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या कपाशी पिकावर मिलीबग आणि लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शेतक:यांमध्ये प्रचंड चिंता व्यक्त होत आहे. जुलै महिन्याच्या शेवटी काढता पाय घेतलेल्या पावसाने 20 ते 25 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुनरागमन केल्याने बळीराजाने पै अन् पै जोडलेला पैसा लावून हातातून जात असलेला खरीप हंगाम वाचविण्यात मोठी मदत मिळाली. यंदा शेतकरी वर्गाने शेती मशागतीपासून तर बी-बियाणे, औषधी, खते आदींवर मोठा खर्च करून आपली सर्व गुंतवणूक शेतात केलेली होती़ तथापि पावसाने दडी मारल्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला जातो, की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली असतांना पुन्हा पाऊस परतल्याने काही प्रमाणात का होईना शेतकरी वर्गाची मेहनत व पैसे वाचल्याची चिन्हे दिसत असतांना आता त्यावर विविध रोगांनी आक्रमण केले आहे. त्यात मिलीबग आणि लाल्या यांचे संकट मोठे आहे. आधीच खंडित पावसामुळे कपाशी, मका, सोयाबीन या पिकांच्या उत्पादनात घट येणार असल्याच्या पाश्र्वभूमीवर आता आलेल्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाल आहे, परंतु रोगाच्या प्रादुर्भावाने उभ्या पिकांचे भवितव्य खराब असल्याचे चित्र वाकोदसह परिसरात दिसत आहे. या परिसरात कपाशी पिकांची लागवड प्रचंड प्रमाणात असून मुख्य पिक म्हणून कपाशीची लागवड केलेली असते. मात्र या कपाशीवर थ्रिप्स, मिलीबग व लाल्या रोगाने तसेच झाडावरील रस शोषक किडीने मोठ्या प्रमाणावर थैमान घातलेले असून शेतकरी वर्ग कमालीचा हैराण झालेला दिसून येत आहे. नेमकी काय उपाययोजना करावी या संभ्रमात तो पडला आहे. काय आहे मिलीबग ? कपाशीच्या झाडावर शेंडयापासून ते जमिनीलगतच्या खोडापर्यत पांढ:या रंगाच्या अत्यंत बारीक किडीचा प्रादुर्भाव असतो. यामुळे पाने गळणे , कै:यांची वाढ खुंटणे, तसेच झाडांची पाने पिवळी व लाल पडून झाड वाळणे किंवा काळवंडतात. यातून उत्पन्नावर विपरीत परिणाम होतो. जोरदार पावसाची प्रतिक्षा गत आठवडय़ात चांगला पाऊस झाला. या पावसाने पिके तरली, मात्र पाऊस पाहिजे तसा जोरदार नसल्याने उभ्या पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. उत्पन्नात घट येणार हे निश्चित झाले आहे. यापूर्वी पावसाने दडी मारल्याने चवळी, मूग, उडीद, मका पिकांवर परिणाम होऊन ही पिके शेतक:यांच्या हातातून निघून गेल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे कापसावरील रोग कमी होण्यासाठी जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे.