शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

अवकाळी पावसाने वाढविली पुन्हा महागाईची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच असून त्याचे भाव कमी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून भाववाढ होत असलेल्या खाद्यतेलाचे भाव अजूनही चढेच असून त्याचे भाव कमी होण्याची प्रतीक्षा आहे. दुसरीकडे महिनाभरानंतर पुन्हा एकदा अवकाळी पाऊस झाल्याने भाजीपाल्याच्या आवकवर परिणाम होऊन भाववाढीची शक्यता वर्तविली जात आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलात भाववाढ होऊन तेलाचे भाव १३० ते १४० रुपये प्रति किलोवर पोहोचले. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते १८० ते १९० रुपये प्रति किलोवर पोहोचले तर सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १६० ते १६५ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. हे अद्यापही कायम असून यामुळे ग्राहकांना चांगलेच महागाईला सामोरे जावे लागत आहे.

इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर असल्याने तेवढा दिलासा आहे.

शेंगदाण्याचेही भाव चढेच

गेल्या आठवड्यात भगरचे भाव वाढून ते १०० ते ११० प्रति किलोवर पोहोचले होते. त्यात थोडी नरमाई आली आहे. मात्र शेंगदाण्याचे वाढलेले भाव अद्यापही कायम असून ते १२५ ते १३० रुपये प्रति किलोवर आहेत. मात्र साबुदाणा ६० ते ६५ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.

द्राक्षाचे भाव झाले कमी

द्राक्षाची आवक चांगली असल्याने त्यांचे भाव कमी होण्यास मदत होत आहे. गेल्या काही दिवसांपासून ८० रुपये प्रति किलोवर असलेली द्राक्षे आता ५० रुपयांवर आली आहेत.

लिंबू वधारले

उन्हाळ्यामध्ये लिंबूला मागणी वाढते. त्यानुसार आतादेखील लिंबूला मागणी वाढल्याने त्याचे भाव वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून ३० ते ४० रुपये प्रति किलो असलेले लिंबूचे भाव आता थेट ४० ते ५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत.

खाद्यतेलाचे भाव वाढलेले असताना ते भाव कमी होण्याची प्रतीक्षा आहे. त्यात आता अवकाळी पाऊस झाल्याने पुन्हा महागाईची चिंता आहे.

- दिलीप महाजन, ग्राहक

खाद्यतेलाचे भाव वाढलेलेच असून ते अजूनही कमी झालेले नाही. इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर आहे.

- मनोज वाणी, व्यापारी

अवकाळी पावसाने भाज्यांच्या आवकवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या लिंबूचे भाव वाढले आहेत.

- राजू चौधरी, भाजीपाला विक्रेते