शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यतेलाला पुन्हा महागाईची फोडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या आठवड्यातील भाववाढीनंतर या आठवड्यातदेखील खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोयाबीन तेल थेट ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या आठवड्यातील भाववाढीनंतर या आठवड्यातदेखील खाद्यतेलाच्या भावात पुन्हा वाढ झाली असून सोयाबीन तेल थेट १५० रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. याशिवाय डाळींचे भाव वाढल्याने बेसनपीठदेखील वधारले आहे. भाजीपाल्याचे भाव मात्र गेल्या आठवड्यात प्रमाणे स्थिर आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून खाद्यतेलाच्या भावात चढ-उतार होत असलेल्या खाद्य तेलामध्ये सलग दोन आठवड्यांपासून भाववाढ सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात सोयाबीन तेलात भाववाढ होऊन ते १४० ते १४५ रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. त्यानंतर याही आठवड्यात ही भाववाढ कायम राहत तेलाचे भाव १५० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते पुन्हा १८० ते १९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. तसेच सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १७५ ते १८० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. खाद्य तेलातील सततच्या भाववाढीने ग्राहक चांगलेच चिंतित झाले आहे.

साखर अजूनही स्थिर

या आठवड्यात डाळींचे भावदेखील वाढले असून यात हरभरा डाळीच्या भाववाढीने बेसनपीठदेखील वधारून ते ८० ते ९० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. साखर ३६ रुपये प्रतिकिलोवर स्थिर असून रवा ३५ ते ४० रुपये तर मैदा ३५ ते ३८ रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहे. याशिवाय इतर किराणा मालाचे भाव स्थिर आहे.

पालेभाज्यांचे भाव स्थिर

सध्या उन्हाळा सुरू झाला असला तरी भाजीपाल्याचे भाव गेल्या आठवड्याप्रमाणे स्थिर आहे. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४५ रुपये किलोवर आहे.

कांदे नियंत्रणात

गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २० रुपये प्रति किलोवर आहेत. यासोबतच कांद्याचे भावदेखील कमी होऊन ते २० रुपये प्रतिकिलोवर आले आहे. टमाटे ३५ ते ४० रुपये प्रतिकिलोवर असून त्यांची आवक चांगली आहे.

खाद्यतेलाचे भाव पुन्हा वाढल्याने दर आठवड्याला आर्थिक भार वाढतच आहे. इतर किराणा मालाचे भाव स्थिर असल्याने दिलासा आहे.

- सुरेश शिरसाठ, ग्राहक

खाद्यतेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. सोबतच डाळीदेखील महागल्या असून इतर किराणा माल स्थिर आहे.

- सचिन छाजेड, व्यापारी

सध्या भाजीपाल्याची आवक चांगली असल्याने या आठवड्यात त्यांचे भाव स्थिर आहे.

- गोपाल वाणी, भाजीपाला विक्रेते