शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
3
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
4
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
5
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
6
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
7
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
8
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
9
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
10
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
11
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
12
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
13
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
16
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
17
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
18
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
19
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
20
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...

बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:19 IST

जळगाव : बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी सनदी अधिकारी व ...

जळगाव : बहुआयामी महासत्ता होण्याची भारताची क्षमता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सदस्य आणि माजी सनदी अधिकारी व राजदूत डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले.

विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाच्या वतीने ‘महासत्ता भारत : वर्तमान कि भविष्य’ या विषयावर व्याख्यान पार पडले. त्याप्रसंगी ते बोलत होते. डॉ. मुळे पुढे म्हणाले की, भारत इतिहासातील एक महासत्ताच होता. केवळ आर्थिकच नव्हे तर जीवनाच्या विविध क्षेत्रांत भारतीयांचे प्रभावी योगदान राहिले आहे. सद्य:स्‍थितीत भारतीयांच्या कर्तृत्वाचा प्रभाव जगातील विविध देशांमध्ये दिसून येतो. क्षेत्रफळ, लोकसंख्या, सामाजिक सक्षमता या सर्व आपल्या जमेच्या बाजू आहेत. भारतीय संविधान आपणास महासत्ता कसे बनायचे, याचे मार्गदर्शनही करते. स्वतंत्रता, समता, न्याय व सुशासन या चतु:सूचीच्या आधारे भारतास वाटचाल करत राहावी लागेल, असे त्यांनी सांगितले.

युवक वर्ग जागृत झाला पाहिजे

अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू प्रा. पी.पी. माहुलीकर यांनी सांगितले की, भारतास जागतिक महासत्ता व्हायचे असेल तर सर्वोतपरी प्रयत्न होणे गरजेचे असून त्यासाठी देशातील जनता व युवक वर्ग जागृत झाला पाहिजे. तसेच शैक्षणिक क्षेत्रासोबत विविध संशोधन करून जास्तीत जास्त पेटंट मिळविण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत, तरच देश येणाऱ्या काळात जागतिक महासत्ता बनू शकतो. प्रास्ताविक विभागाचे प्रभारी संचालक डॉ. मनीष जोशी यांनी यांनी केले, तर सूत्रसंचालन श्याम महाजन यांनी केले. परिचय विद्यार्थिनी शुभांगी केदार हिने केला, तर आभार सुभाष पवार यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महेश जडे व समाधान अहिरे यांनी परिश्रम घेतले.