शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला
2
Delhi blast: हाडे तुटली, आतडी फाटली अन्...; दिल्ली स्फोटातील मृतकांचे भयावह पोस्टमोर्टम रिपोर्ट
3
Parvez Ansari: की-पॅड मोबाईल, आंतरराष्ट्रीय सीमकार्ड अन्...; अन्सारीच्या घरात 'एटीएस'ला काय काय मिळाले?
4
ChatGPT ची निर्माती कंपनी OpenAI ची भारतात एन्ट्री! 'या' शहरात उघडणार ऑफिस, काय आहेत योजना?
5
सोन्याचे भाव पुन्हा धडाम..., चांदी चमकली...! पटापट चेक करा १८ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट रेट
6
Govinda: "डॉक्टरांनी मला...", गोविंदाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, स्वत:च दिले हेल्थ अपडेट, चाहत्यांना दिलासा
7
VIDEO: स्वॅग..!! मुलींच्या वर्गात अचानक शिरला कुत्रा; बिनधास्तपणे चालत आत आला अन् मग...
8
संपूर्ण परिसर सजला, राम मंदिर झाले आणखी भव्य-दिव्य; तुम्ही नवीन लूक पाहिला का? पाहा, Photos
9
Tata Motors CV Listing: टाटाच्या 'या' शेअरचं लिस्टिंग २८% प्रीमिअमवर, गुंतवणूकदार मालामाल; तुमच्याकडे आहे का शेअर?
10
दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला...
11
Mumbai Local: धावत्या लोकलमध्ये ३० वर्षीय तरुणीसोबत घृणास्पद प्रकार, प्रवाशांमध्ये संताप!
12
Crime News : सांगलीत ‘मुळशी पॅटर्न’सारखी हत्या! वाढदिवसाच्या दिवशीच रक्तरंजित शेवट; धक्कादायक कारण आले समोर
13
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
14
हळव्या मनाचा कणखर बाप! लेकीसाठी ९०० किमीचा प्रवास, युनिव्हर्सिटीबाहेर लावला 'घरच्या जेवणा'चा स्टॉल
15
एकेकाळी दूरसंचार क्षेत्रात होतं वर्चस्व! आता २ लाख कोटी रुपये थकीत; सरकारकडे मदतीसाठी याचना
16
एका रात्रीत 'नॅशनल क्रश' बनली मराठमोळी गिरीजा ओक, निळ्या साडीतील फोटो व्हायरल, अभिनेत्रीचं वय ऐकून बसेल धक्का
17
Vastu Tips: पोपटाला आकर्षून घेणे म्हणजे धन-सुखाला आमंत्रण; तो नियमित यावा म्हणून खास टिप्स!
18
"तुम्हा दोघांना टीम इंडियात खेळायचं असेल तर..." रोहित-विराटला BCCIनी दिली शेवटची 'वॉर्निंग'
19
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
20
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर

भारत हा शरणार्थींना धर्म न विचारणारा देश - योगेंद्र यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 21:57 IST

स्वामी विवेकानंदांचा विचार स्विकारल्यास नागरीकत्व सुधारणा कायद्यास विरोध नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभुसावळ : शरणार्थींना कधीही धर्म, जात न विचारणारा हा भारत देश आहे, हा विचार स्वामी विवेकानंद यांनी यापूर्वीच सांगितला आहे. हेच पंतप्रधानांनी सांगणे गरजेचे आहे. शरणार्थींना धर्म, जात विचारणार नाही असे पंतप्रधानांनी जाहीर करावे, असा नागरीकत्व सुधारणा कायदा भाजप आणत असेल तर आम्ही या कायद्याचे स्वागत करू असे प्रतिपादन स्वराज्य अभियानाचे नेते योगेंद्र यादव यांनी येथे केले.८ रोजी दुपारी येथील भारतीय संविधान बचाव नागरी कृती समितीच्या वतीने खडका रोड भागातील जी.एन.जी. पार्क ग्राउंडवर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार संतोष चौधरी होते. याप्रसंगी लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, राष्ट्रवादीचे नेते गफ्फार मलिक, मराठा क्रांती मोर्चाचे विनोद देशमुख, संविधान जागर समितीचे मुकुंद सपकाळे, शेतकरी संघटनेचे सचिन धांडे, जळगावचे माजी उपमहापौर करिम सालार मंचावर उपस्थित होते.भाषण देताना यादव म्हणाले की, सीएए आणि एनआरसीला विरोधासाठी आज देशभरात मोठे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन आता दुसऱ्या टप्प्यात आले आहे. सीएए कायद्यात शरणार्थी, अल्पसंख्याक, पीडित, शेजारी या चार शब्दांचा उल्लेख नाही. मात्र, भाजपा ते उघडपणे सांगायला तयार नाही. इथेच खरी गुंतागुंत आहे. तिरंगा, संविधान व देशाच्या स्वातंत्र्यावर बोलणे हा गुन्हा आहे काय? महाराष्ट्र हा कधी उत्तर प्रदेश झाला? हेच कळत नाही, असा सवाल यादव यांनी केंद्र सरकार व स्थानिक पोलीस प्रशानाला विचारला.उमर खालीद यांना का घाबरतात?उमर खलीद यांना का घाबरतात... त्यांची सभा भिवंडी (मुंबई) येथे झाली. त्या ठिकाणी ते संत तुकाराम यांच्यावर बोलले. तेथे अशी कोणतीच अप्रिय घटना घडली नाही. पंतप्रधान म्हणतात की, मी कपड्यांवरून माणसे ओळखतो. पण पंतप्रधानांना फक्त टोपी दिसते. तिरंगा दिसत नाही. मोदी यांच्याऐवजी जर कोणी दुसरा पंतप्रधान राहिला असता त्याला तिरंगा पाहून, भारत मातेच्या जयघोषाच्या घोषणा ऐकून गर्व झाला असता. मात्र, मोदींना त्याचा गर्व वाटत नाही, अशी टिकाही यादव यांनी केली.फूट पाडणे हा सीएए व एनआरसी मागील उद्देशसीएए कायद्यानुसार मुस्लिम देशातील गैरमुस्लिम लोकांना शरणार्थी होता येणार आहे. त्यात नवीन बाब काय? सीएए कायदा म्हणजे जिलेबीसारखा आहे. भारतातील नागरिकांमध्ये फूट पाडणे, हा या कायद्याचा उद्देश आहे, अशा शब्दांत यादव यांनी केंद्र सरकारवर टीका केली.सर्वांंनी विरोध करावाएनआरसीसाठी जेव्हा कोणी तुमच्या घरी येईल तेव्हाच त्याला विरोध करा, अन्यथा पुढे जाऊन संकट वाढेल. महात्मा गांधीजींनी सांगितले आहे की अन्यायपूर्वक असलेल्या कायद्याला कडाडून विरोध केला पाहिजे.घटनेला हात घालण्याचाप्रयत्न- संतोष चौधरीअध्यक्षिय भाषणात माजी आ. संतोष चौधरी यांनी, धर्माच्या विरुद्ध असलेल्यांविरुद्ध हे आंदोलन आहे. सरकारला हा कायदा आणण्याची गरज नव्हती. डॉ. बाबासाहेबांच्या घटनेला हात घालण्याचा प्रयत्न सरकारने केला.यावेळी गफ्फार मलिक, करिम सलार, मकुंद सपकाळे आदींनीही मनोगत व्यक्त केले.सभेसाठी कॉंग्रेसचे संजय ब्राह्मणे, रवींद्र निकम, गटनेता उल्हास पगारे, भारिपचे विनोद सोनवणे आदी उपस्थित होते.तगडा पोलीस बंदोबस्तसभेदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून डिवायएसपी गजानन राठोड, पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, पोलिस निरीक्षक रामकृष्ठ कुंभार यांच्यासह १६ दुय्यम अधिकारी, दोन एसआरपी प्लाटून, चार पुरुष व एक महिला आरसीपी प्लाटून, दोन स्ट्रायकिंग फोर्स, १६५ पोलिस कर्मचारी (३१ महिला) असा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.सभेला महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती.दुसºया स्वातंत्र्याची लढाई- प्रतिभा शिंदेप्रतिभा शिंदे यांनी, आम्ही स्वतंत्र्य लढ्यात रक्त सांडलेल्यांचे वारसदार आहोत. शहरातील सभेला प्रशासनाने परवानगी नाकारली होती.मात्र आपण, परवाणगी द्या, अथवा नको द्या सभा होणारच असे पोलीस अधिक्षकांसमोर ठणकावून सांगितले होते. ‘एक पाव रेल में और एक पाव जेल मे’ असा आमचा नारा असल्याने आम्ही परिणामांना घाबरत नसल्याचा ईशारा त्यांनी दिला. आता देशात दुसºया स्वातंत्र्याची लढाई लढण्याची वेळ आली आहे.