शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
3
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
4
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
5
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
6
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
7
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
8
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
9
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
10
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
11
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
12
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
13
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
14
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
15
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
16
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
17
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
18
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
19
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
20
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज

... तर पाकव्याप्त काश्मीर देखील भारत काबीज करु शकतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 16:34 IST

योगी आदित्यनाथ : रावेर येथील सभेत प्रतिपादन

रावेर - पंतप्रधान नरेंद मोदी यांनी काश्मीरचे ३७० कलम हटवून धाडसी निर्णय घेतला आहे. याचप्रमाणे भविष्यात पाकव्याप्त काश्मीरवर देखील कब्जा भारत करु शकतो, असे प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी गुरूवारी येथे आयोजित सभेत केले.रावेर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे व मुक्ताईनगर मतदारसंघातील भाजप उमेदवार रोहीणी खडसे - खेवलकर यांच्या प्रचारार्थ शहरातील छोरीया मार्केटमधील भव्य प्रांगणात गुरूवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जि. प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, बेटी बचाओ बेटी पढाओ चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. राजेंद्र फडके, खासदार रक्षा खडसे, जि. प. उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख प्रल्हाद महाजन, रावेर पं.स. सभापती माधुरी नेमाडे व यावल पं.स. सभापती पल्लवी चौधरी, जि.प. सदस्या नंदा पाटील, रंजना पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, श्रीराम पाटील उपस्थित होते.यावेळी योगी पुढे म्हणाले, राष्ट्रवादाची चर्चा केली तर महाराष्ट्रातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींचे स्मरण होते. भगवान प्रभु रामचंद्रांच्या पावन भूमीतून मी आलो असलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराज्याभिषेक करतांना तिर्थक्षेत्र काशीचे तीर्थ आणले होते. काशीच्या घाटांना मराठी नावाचे नामकरण आजही आढळून येते. तसेच १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामात मराठी सेनेला उत्तर प्रदेशातील स्वातंत्र्यसेनांनींनी खांद्याला खांदा लावून योगदान दिले होते. दरम्यान ३७० कलम रद्द केल्याने तुम्ही प्रयागराज, मुंबईला जेवढ्या सहजपणे जाऊ शकतात तेवढ्याच सहजतेने जम्मु, काश्मिर, अमरनाथ यात्रा एवढेच काय लद्दाखपर्यंत जाऊ शकता, असेही योगी म्हणाले.विकास व राष्ट्रवाद या दोन पैलूंवर हिंदवी स्वराज्य व रामराज्याची नाड जोडून केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या द्रुतगतीचे इंजिन महाराष्ट्रात पुन्हा गतिमान करण्यासाठी भाजप उमेदवारांना विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.----केळी प्रश्नावर लढा दिलाराज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन वा माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांचा कोणताही नामोल्लेख न करता, हरिभाऊ जावळे यांना ’पुराणे - साथीदार’ असा परिचय असल्याचा आवर्जून उल्लेख करत त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकाळात लोकसभेत केळी, कापूस, सिंचनाचे प्रश्नावर त्यांनी अनेकदा लढा दिल्याचे स्पष्ट केले.