शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
3
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
4
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
5
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
6
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
7
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
8
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
9
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
10
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
11
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
12
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
13
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
14
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
15
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
16
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
17
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
18
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
19
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
20
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका

रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला

By admin | Updated: March 2, 2017 00:19 IST

सुधीर कुमार गुप्ता : एकत्र अर्थसंकल्पामुळे रेल्वेतील प्रकल्पांना निधी मिळेल

भुसावळ : सरकारच्या  वन नेशन वन बजेटमुळे रेल्वेच्या सुमारे पाच हजार ४०० कोटी रुपयांची बचत झाली आहे शिवाय एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्पांना पुरेसा निधी मिळेल व प्रकल्प पूर्ण होतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता यांनी  बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला असून भुसावळ रेल्वे विभागाने या क्षेत्रात चांगले काम केले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नाशिक येथील इरीन प्रकल्पात ३० केव्ही पॉवर, भुसावळ रेल्वे स्थानक दहा आणि भुसावळ येथील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत ५०० केव्ही पॉवरचे सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहे.एलईडी दिव्यांचा वापरभुुसावळ येथील रेल्वे स्थानकावर पूर्णपणे एलईडी दिव्यांचा झगमगाट आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरही ८० टक्के असे दिवे बसविण्यात आले आहे. नाशिक ते इगतपुरी पर्यंत एलईडी करण्यात आले आहे. पुढे ते मनमाड पर्यंत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.भुसावळ-जळगावात लिफ्टदेशातील ५०० रेल्वे स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकते जिण्यांची सोय राहील, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले भुसावळ विभागातील भुसावळ-२, नाशिक २,मनमाड-२, जळगाव-२, अकोला-२  व खंडवा- २ या प्रमाणे लिफ्टची सोय करण्यात आली आहे. अपूर्ण कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील.गुप्ता यांनी यावेळी २०२० पर्यंत मुख्य रेल्वे मार्गावर मानवरहित गेट बंद करण्यात येतील. भुसावळ विभागात केवळ खामगाव,जलंब या ठिकाणी तीन गेट आहेत. २०१७-१८ पर्यत देशातील ५०० रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.यात भुसावळ रेल्वे विभागातील एकाही स्थानकाचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. एसएमएस प्रणालीवर क्लीन माय कोच सर्व्हीस याबाबतही त्यांनी माहिती दिली. एक खिडकी योजने अंतर्गत कोच मित्र सुविधेची त्यांनी माहिती दिली. त्यांनी रेल्वेतील पार्सलसह विविध सेवांमध्ये ९९.९ टक्के व्यवहार धनादेशाद्वारे होत असल्याचे सांगितले. एडीआरएम अरुण धार्मिक,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एन. पिंपरीकर, सीनिअर डीईएन ए. के. सिंग, अरविंद कुमार, सिनिअर डीएमई दिनेश गजभिये, सिनिअर डीएफएम  विजय कदम, सिनिअर डीईई नरहरी निमजे, डीसीएम व्ही.पी.दहाट,एसीएम अजयकुमार, विजयकुमार पालवे आदी अधिकारी उपस्थित होते.रेल्वे अर्थसंकल्पाची  परंपरा खंडित४भारतीय रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची १९२० पासूनची परंपरा २०१७ मध्ये थांबल्याची माहिती डीआरएम गुप्ता यांनी यावेळी दिली.रेल्वेचा सहभाग जास्त असल्याने १९२० पासून वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात होता.आता एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्प पूर्ण होतील.