शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला

By admin | Updated: March 2, 2017 00:19 IST

सुधीर कुमार गुप्ता : एकत्र अर्थसंकल्पामुळे रेल्वेतील प्रकल्पांना निधी मिळेल

भुसावळ : सरकारच्या  वन नेशन वन बजेटमुळे रेल्वेच्या सुमारे पाच हजार ४०० कोटी रुपयांची बचत झाली आहे शिवाय एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्पांना पुरेसा निधी मिळेल व प्रकल्प पूर्ण होतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता यांनी  बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. रेल्वेत सौर ऊर्जेचा वापर वाढला असून भुसावळ रेल्वे विभागाने या क्षेत्रात चांगले काम केले आहे, अशीही माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नाशिक येथील इरीन प्रकल्पात ३० केव्ही पॉवर, भुसावळ रेल्वे स्थानक दहा आणि भुसावळ येथील क्षेत्रीय प्रशिक्षण संस्थेत ५०० केव्ही पॉवरचे सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात आले आहे.एलईडी दिव्यांचा वापरभुुसावळ येथील रेल्वे स्थानकावर पूर्णपणे एलईडी दिव्यांचा झगमगाट आहे. जळगाव रेल्वे स्थानकावरही ८० टक्के असे दिवे बसविण्यात आले आहे. नाशिक ते इगतपुरी पर्यंत एलईडी करण्यात आले आहे. पुढे ते मनमाड पर्यंत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.भुसावळ-जळगावात लिफ्टदेशातील ५०० रेल्वे स्थानकांवर दिव्यांग प्रवाशांसाठी लिफ्ट व सरकते जिण्यांची सोय राहील, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले भुसावळ विभागातील भुसावळ-२, नाशिक २,मनमाड-२, जळगाव-२, अकोला-२  व खंडवा- २ या प्रमाणे लिफ्टची सोय करण्यात आली आहे. अपूर्ण कामे मार्चपर्यंत पूर्ण होतील.गुप्ता यांनी यावेळी २०२० पर्यंत मुख्य रेल्वे मार्गावर मानवरहित गेट बंद करण्यात येतील. भुसावळ विभागात केवळ खामगाव,जलंब या ठिकाणी तीन गेट आहेत. २०१७-१८ पर्यत देशातील ५०० रेल्वे स्थानकांचा विकास केला जाणार आहे.यात भुसावळ रेल्वे विभागातील एकाही स्थानकाचा समावेश नसल्याचे त्यांनी सांगितले. एसएमएस प्रणालीवर क्लीन माय कोच सर्व्हीस याबाबतही त्यांनी माहिती दिली. एक खिडकी योजने अंतर्गत कोच मित्र सुविधेची त्यांनी माहिती दिली. त्यांनी रेल्वेतील पार्सलसह विविध सेवांमध्ये ९९.९ टक्के व्यवहार धनादेशाद्वारे होत असल्याचे सांगितले. एडीआरएम अरुण धार्मिक,मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. सी. एन. पिंपरीकर, सीनिअर डीईएन ए. के. सिंग, अरविंद कुमार, सिनिअर डीएमई दिनेश गजभिये, सिनिअर डीएफएम  विजय कदम, सिनिअर डीईई नरहरी निमजे, डीसीएम व्ही.पी.दहाट,एसीएम अजयकुमार, विजयकुमार पालवे आदी अधिकारी उपस्थित होते.रेल्वे अर्थसंकल्पाची  परंपरा खंडित४भारतीय रेल्वेचा स्वतंत्र अर्थसंकल्प सादर करण्याची १९२० पासूनची परंपरा २०१७ मध्ये थांबल्याची माहिती डीआरएम गुप्ता यांनी यावेळी दिली.रेल्वेचा सहभाग जास्त असल्याने १९२० पासून वेगळा अर्थसंकल्प सादर केला जात होता.आता एकच अर्थसंकल्प असल्याने रेल्वेतील प्रकल्प पूर्ण होतील.