शहरं
Join us  
Trending Stories
1
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
2
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
4
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
5
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
6
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
7
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
8
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
9
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
10
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
11
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
12
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
13
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
14
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
15
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
16
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
17
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
18
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
19
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
20
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण

महिलांमध्ये वाढतेय गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:23 IST

जळगाव : महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक महिन्याला किमान चार ते पाच रुग्ण समोर येत असल्याचे ...

जळगाव : महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. प्रत्येक महिन्याला किमान चार ते पाच रुग्ण समोर येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारात जितके लवकर निदान तितका पुढील धोका टाळता येऊ शकतो, त्यामुळे या आजाराची लक्षणे व त्यानंतर तातडीने तपासणी हे प्रतिबंधात्मक उपाय जीव वाचवू शकते. ग्रामीण भागात जनजागृतीचा अभाव यामुळे या कर्करोगाचे प्रमाण अधिक वाढत असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासाठी जनजागृती होऊन संबंधित आजार जीवघेणा होण्यापासून वाचविणे शक्य होते.

डॉक्टर काय म्हणतात?

- गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण जिल्ह्यात वाढत आहेत. यात लवकर तपासणी करणे म्हणजेच प्रतिबंध हाच यावर उपाय आहे. अनेक प्रकरणांमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यात हा कर्करोग गेल्यानंतर समजते व त्यानंतर खूप उशीर झालेला असतो. यासाठी महिलांनी लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करावी, असे स्त्री रोगतज्ञ डॉ. संजय बनसोडे यांनी सांगितले.

- स्थूलपणा, पोपीलोमा विषाणूचा संसर्ग, गर्भशयाच्या मुखावर होणारा संसर्ग, अधिक वेळा प्रसूती अशा विविध कारणांमुळे हा कर्करोग होण्याचा धोका असतो. ग्रामीण भागात याचे प्रमाण अधिक आहे. यासाठी जनजागृती करणे अधिक महत्त्वाचे आहे, अनेक वेळा रक्त जात असले तरी महिला दुर्लक्ष करतात, मात्र, हे धोकादायक ठरू शकते, असे औषधवैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी सांगितले.

पहिली महिला याच आजाराने त्रस्त

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ९ महिन्यानंतर नॉन कोविड उपचार सेवा सुरू झाली. यात पहिली नोंदणी करणारी रावेर तालुक्यातील एक महिला तपासणीला आली होती. या महिलेवर या ठिकाणी शस्त्रक्रिया करून तिला पुढील उपचारांसाठी औरंगाबाद पाठविण्यात आले. मात्र, ही महिला अत्यंत उशिरा रुग्णालयात दाखल झाली होती, असेही डॉक्टरांनी सांगितले.