शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

लपलेला विषाणू शोधण्यासाठी आरटीपीसीआर वाढविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनात आता ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के ॲन्टिजन चाचण्यांचे शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनात आता ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के ॲन्टिजन चाचण्यांचे शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी म्हणून जळगाव शहरात स्थानिक पातळीवर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवून ॲन्टिजन चाचणीसाठी निकष ठरवून देण्यात आले आहेत. सरसकट ॲन्टिजन चाचणी न करण्याचे नियोजन असून संसर्गाचे प्रमाण कमी असल्याने हा लपलेला विषाणू शोधण्यासाठी हे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोनाच्या चाचण्या होत असतात. जिल्ह्यात १३ जुलैपासून ॲन्टिजन तपासणीला सुरुवात झाली अगदी १५ ते २० मिनिटात अहवाल समोर येत असल्याने या चाचण्यांसाठी आग्रह वाढला व हळूहळू आरटीपीसीआरपेक्षा या चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. मात्र, आता नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार या चाचण्यांसाठी निकष ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण आहे.

किट पुरेसे

तपासणी केंद्रांवर ॲन्टिजन होत नसल्याने या किटचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या; मात्र प्रशासनाकडे तपासणी किट पुरेशा उपलब्ध आहेत; मात्र शासनाकडूनच तपासण्यांचे निकष ठरवून देण्यात आल्याने या तपासण्या कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे नेमके नियोजन?

तपासणीला येणाऱ्या प्रत्येकाची ॲन्टिजन चाचणी न करता, केवळ हायरिस्क कॉन्टॅक्ट, लक्षणे असलेले व उपचाराची गरज असणारे रुग्ण, एखाद्या आजाराचा उपचार करायचा असल्यास कोरोना चाचणी आवश्यक असणारे रुग्ण, शस्त्रक्रियेचे रुग्ण अशांचीच आता ॲन्टिजन चाचणी केली जात आहे. सरसकट तपासणीला येणा-या अन्य सर्वांची आरटीपीसीआर चाचणीच केली जात आहे; मात्र दुसरीकडे अहवाल प्रलंबित राहत असल्याने रुग्णांसमोरही वेगळा पेच निर्माण झाला आहे.

असे नियोजन का?

जेव्हा संसर्गाचे प्रमाण अधिक होते, तेव्हा बाधितांना तातडीने स्वतंत्र करणे गरजेचे होते. त्यामुळे सरसकट सर्वांची ॲन्टिजन तपासणी करून तातडीने विषाणूचा शोध घेऊन रुग्णाला विलगीकरणात ठेवले जात होते. आता एकत्रित वातावरणातच संसर्गाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाची ॲन्टिजन चाचणी केल्यास नेमके निदान होणार नाही. शरीरातील लपलेल्या विषाणूला शोधण्यासाठी आरटीपीसीआर हेच सध्या स्थितीत मुख्य माध्यम असल्याने त्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.