शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
3
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
4
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
5
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
6
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
7
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
8
Sheetal Devi : सुवर्णवेध! हातांशिवायही अचूक निशाणा; जागतिक तिरंदाजी स्पर्धेत शीतल देवीला गोल्ड मेडल, रचला इतिहास
9
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
10
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
12
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
13
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
14
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
15
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
16
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
17
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
18
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
19
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
20
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले

लपलेला विषाणू शोधण्यासाठी आरटीपीसीआर वाढविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनात आता ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के ॲन्टिजन चाचण्यांचे शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनात आता ६५ टक्के आरटीपीसीआर आणि ३५ टक्के ॲन्टिजन चाचण्यांचे शासनाकडून निर्देश प्राप्त झाल्यानंतर त्यांची अंमलबजावणी म्हणून जळगाव शहरात स्थानिक पातळीवर आरटीपीसीआर चाचण्यांचे प्रमाण वाढवून ॲन्टिजन चाचणीसाठी निकष ठरवून देण्यात आले आहेत. सरसकट ॲन्टिजन चाचणी न करण्याचे नियोजन असून संसर्गाचे प्रमाण कमी असल्याने हा लपलेला विषाणू शोधण्यासाठी हे नियोजन असल्याचे सांगण्यात येत आहे.

शहरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कोरोनाच्या चाचण्या होत असतात. जिल्ह्यात १३ जुलैपासून ॲन्टिजन तपासणीला सुरुवात झाली अगदी १५ ते २० मिनिटात अहवाल समोर येत असल्याने या चाचण्यांसाठी आग्रह वाढला व हळूहळू आरटीपीसीआरपेक्षा या चाचण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले होते. मात्र, आता नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार या चाचण्यांसाठी निकष ठरवून देण्यात आले आहे. त्यामुळे काहीसे गोंधळाचे वातावरण आहे.

किट पुरेसे

तपासणी केंद्रांवर ॲन्टिजन होत नसल्याने या किटचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी समोर येऊ लागल्या; मात्र प्रशासनाकडे तपासणी किट पुरेशा उपलब्ध आहेत; मात्र शासनाकडूनच तपासण्यांचे निकष ठरवून देण्यात आल्याने या तपासण्या कमी केल्याचे सांगण्यात येत आहे.

काय आहे नेमके नियोजन?

तपासणीला येणाऱ्या प्रत्येकाची ॲन्टिजन चाचणी न करता, केवळ हायरिस्क कॉन्टॅक्ट, लक्षणे असलेले व उपचाराची गरज असणारे रुग्ण, एखाद्या आजाराचा उपचार करायचा असल्यास कोरोना चाचणी आवश्यक असणारे रुग्ण, शस्त्रक्रियेचे रुग्ण अशांचीच आता ॲन्टिजन चाचणी केली जात आहे. सरसकट तपासणीला येणा-या अन्य सर्वांची आरटीपीसीआर चाचणीच केली जात आहे; मात्र दुसरीकडे अहवाल प्रलंबित राहत असल्याने रुग्णांसमोरही वेगळा पेच निर्माण झाला आहे.

असे नियोजन का?

जेव्हा संसर्गाचे प्रमाण अधिक होते, तेव्हा बाधितांना तातडीने स्वतंत्र करणे गरजेचे होते. त्यामुळे सरसकट सर्वांची ॲन्टिजन तपासणी करून तातडीने विषाणूचा शोध घेऊन रुग्णाला विलगीकरणात ठेवले जात होते. आता एकत्रित वातावरणातच संसर्गाचे प्रमाण कमी असल्याचे चित्र आहे. बाधितांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे प्रत्येकाची ॲन्टिजन चाचणी केल्यास नेमके निदान होणार नाही. शरीरातील लपलेल्या विषाणूला शोधण्यासाठी आरटीपीसीआर हेच सध्या स्थितीत मुख्य माध्यम असल्याने त्या चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत.