शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वधारलेल्या खाद्य तेलात नरमाई टमाटे, बटाटेही झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन तेलाचे भाव १२५ ते १३० रुपयांवरून ११५ ते १२० आले आहेत. शेंगदाणा तेल मात्र स्थिर असून शेंगदाण्याचे भाव वाढले आहे आहे तर साबुदाण्याचे भाव कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या भावात मात्र बहुतांश भाज्यांचे भाव मात्र स्थिर आहे तर टमाटे, बटाटे स्वस्त झाले आहेत.

दोन आठवड्यापूर्वी किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात खाद्य तेलाचे भाव कमी झाल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून १२५ ते १३० रुपयांवर असलेल्या सोयाबीन तेलाच्या भावात घसरण होऊन ते ११५ ते १२० रुपयांवर आले आहेत.

शेंगदाणा तेल मात्र अजूनही १६० ते १७० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. शेंगदाणे १०५ ते ११० रुपयांवरून ११० ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे तर साबुदाण्याचे भाव कमी होऊन ते ६५ ते ७० रुपयांवरून ५५ ते ६० रुपयांवर आले आहे.

साखर अजूनही स्थिर

तीन आठवड्यांपूर्वी भाव कमी झालेल्या साखरेचा गोडवा अजूनही कायम आहे. त्या वेळी ३८ रुपये प्रति किलोवरून ३६ रुपये प्रति किलोवर आली होती. ती अद्यापही याच भावावर कायम आहे. मकर संक्रांत झाली तरी या काळात साखरेचे भाव वाढले नव्हते.

टमाट्याची आवक वाढली

एरव्ही हिवाळ्यामध्ये टमाट्याचे भाव कमी असतात. डिसेंबरमध्ये अधिक भाव असलेल्या टमाट्याचे भाव कमी होऊन १० रुपये प्रति किलोवर आले आहेत.

बटाटे आवाक्यात

गेल्या दोन ते तीन महिन्यात बटाट्याचे भाव चांगलेच वधारून ते ५० रुपये प्रति किलोवर पोहचले होते. मात्र गेल्या महिन्यापासून नवीन बटाट्याची आवक वाढून हे भाव कमी-कमी होत गेले व आता तर लहान बटाटे १० ते १५ रुपये प्रति किलोवर आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ते ३० रुपये प्रति किलो होते.

खाद्य तेलासह बटाट्याचेही भाव कमी झाल्याने दिलासा आहे. विशेष म्हणजे टमाट्याचे भाव एकदच कमी झाल्याने व किराणा साहित्याचे भाव कमी झाल्याचा लाभ आहे.

- संजय चौधरी,

ग्राहक

गेल्या अनेक दिवसांपासून भाव वाढ झालेल्या सोयाबीन तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली आहे. शेंगदाण्याचे भाव वाढले असून साबुदाणा मात्र स्वस्त झाला आहे.

- सचिन छाजेड,

व्यापारी

सध्या टमाटे, बटाटे यांची आवक चांगलीच वाढली असून त्यामुळे त्यांचे भाव कमी झाले आहे. यासह कोथिंबीर व इतर भाज्याचे भाव स्थिर असून सध्या आवक चांगली आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते