शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

वधारलेल्या खाद्य तेलात नरमाई टमाटे, बटाटेही झाले स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या महिन्यापासून भाववाढ झालेल्या खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली असून सोयाबीन तेलाचे भाव १२५ ते १३० रुपयांवरून ११५ ते १२० आले आहेत. शेंगदाणा तेल मात्र स्थिर असून शेंगदाण्याचे भाव वाढले आहे आहे तर साबुदाण्याचे भाव कमी झाले आहेत. भाजीपाल्याच्या भावात मात्र बहुतांश भाज्यांचे भाव मात्र स्थिर आहे तर टमाटे, बटाटे स्वस्त झाले आहेत.

दोन आठवड्यापूर्वी किराणा साहित्यासह भाजीपाल्याच्या भावात चांगलीच वाढ झाली होती. मात्र या आठवड्यात खाद्य तेलाचे भाव कमी झाल्याने तेवढा दिलासा मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून १२५ ते १३० रुपयांवर असलेल्या सोयाबीन तेलाच्या भावात घसरण होऊन ते ११५ ते १२० रुपयांवर आले आहेत.

शेंगदाणा तेल मात्र अजूनही १६० ते १७० रुपये प्रति किलोवर स्थिर आहे. शेंगदाणे १०५ ते ११० रुपयांवरून ११० ते १२० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे तर साबुदाण्याचे भाव कमी होऊन ते ६५ ते ७० रुपयांवरून ५५ ते ६० रुपयांवर आले आहे.

साखर अजूनही स्थिर

तीन आठवड्यांपूर्वी भाव कमी झालेल्या साखरेचा गोडवा अजूनही कायम आहे. त्या वेळी ३८ रुपये प्रति किलोवरून ३६ रुपये प्रति किलोवर आली होती. ती अद्यापही याच भावावर कायम आहे. मकर संक्रांत झाली तरी या काळात साखरेचे भाव वाढले नव्हते.

टमाट्याची आवक वाढली

एरव्ही हिवाळ्यामध्ये टमाट्याचे भाव कमी असतात. डिसेंबरमध्ये अधिक भाव असलेल्या टमाट्याचे भाव कमी होऊन १० रुपये प्रति किलोवर आले आहेत.

बटाटे आवाक्यात

गेल्या दोन ते तीन महिन्यात बटाट्याचे भाव चांगलेच वधारून ते ५० रुपये प्रति किलोवर पोहचले होते. मात्र गेल्या महिन्यापासून नवीन बटाट्याची आवक वाढून हे भाव कमी-कमी होत गेले व आता तर लहान बटाटे १० ते १५ रुपये प्रति किलोवर आले आहेत. दोन आठवड्यांपूर्वी ते ३० रुपये प्रति किलो होते.

खाद्य तेलासह बटाट्याचेही भाव कमी झाल्याने दिलासा आहे. विशेष म्हणजे टमाट्याचे भाव एकदच कमी झाल्याने व किराणा साहित्याचे भाव कमी झाल्याचा लाभ आहे.

- संजय चौधरी,

ग्राहक

गेल्या अनेक दिवसांपासून भाव वाढ झालेल्या सोयाबीन तेलाच्या भावात या आठवड्यात घसरण झाली आहे. शेंगदाण्याचे भाव वाढले असून साबुदाणा मात्र स्वस्त झाला आहे.

- सचिन छाजेड,

व्यापारी

सध्या टमाटे, बटाटे यांची आवक चांगलीच वाढली असून त्यामुळे त्यांचे भाव कमी झाले आहे. यासह कोथिंबीर व इतर भाज्याचे भाव स्थिर असून सध्या आवक चांगली आहे.

- रमेश वाणी, भाजीपाला विक्रेते